शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

२०२ गावांना कृषी संजीवनीचे टॉनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:14 IST

लहान शेतकऱ्यांची शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी जिल्ह्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पोखरा) उपलब्धी आहे. पहिल्या टप्प्यात १२ गावसमूहाची निवड करण्यात आली. यामध्ये एकूण २०२ गावांचा समावेश करण्यात आला. प्रकल्पामध्ये समाविष्ट ५३२ गावांमध्ये येत्या सहा वर्षांत शाश्वत विकास साध्य करण्याचे आव्हान आहे.

ठळक मुद्देहवामानाकुल पीकपद्धती : पहिल्या टप्प्यात १२ गावसमूह, ३३ गावसमित्या स्थापित

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लहान शेतकऱ्यांची शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी जिल्ह्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पोखरा) उपलब्धी आहे. पहिल्या टप्प्यात १२ गावसमूहाची निवड करण्यात आली. यामध्ये एकूण २०२ गावांचा समावेश करण्यात आला. प्रकल्पामध्ये समाविष्ट ५३२ गावांमध्ये येत्या सहा वर्षांत शाश्वत विकास साध्य करण्याचे आव्हान आहे. यामध्ये खारपाणपट्यामधील ३५६, तर दुष्काळजन्य असणाऱ्या १७६ गावांचा समावेश आहे.पोखरा प्रकल्पात लहान क्षेत्रातील शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन सक्षम करण्यावर भर देण्यात आला. प्रकल्पांतर्गत गावसमूहातील प्रत्येक गावाचे सूक्ष्म नियोजन आराखडे तयार करून ग्रामसभेच्या मान्यतेने व सरपंचाच्या अध्यक्षतेखालील कृषी संजीवनी समितीद्वारे गावात कामे सुरू करण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ३३ ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापित करण्यात आल्या. हवामान बदलास अनुसरून कृषी पद्धती विकसित करणे, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादकतेत वृद्धी, कृषिमूल्य साखळीमध्ये सहभाग, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर शेती होण्यासाठी प्रयत्न करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे.शेतीसाठी या घटकांवर भरक्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, संरक्षित शेती, पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर, भूजल पुनर्भरण, काढणीपश्चात व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीमालाचे संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी-विक्री आदीबाबत सहाय्य, बियाणे वितरण प्रणालीची कार्यक्षमता वृद्धिंगत करणे, पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, पिकांचे हवामानाकूल वाण विकसित करणे आदी घटक आहेत.शेतीवर उपजीविका असणाऱ्यांना लाभकेवळ शेतीवर उपजीविका असलेल्या अत्यल्प व अल्प भूधारकांना आणि भूमिहीन शेतमजुरांना लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थींची निवड अनुसूचित जाती व जमाती, महिला, दिव्यांग व सर्वसाधारण या प्राधान्यक्रमानुसार करण्यात येईल. प्रथम अत्यल्प भूधारक व निधी शिल्लक राहिल्यास अल्पभूधारकाची निवड करण्यात येणार आहे.पाण्याचा कार्यक्षम, शाश्वत वापरमूलस्थानी जलसंधारण, ओघळीवरचे उपचार, पाणी साठवण संरचनांची निर्मिती, जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, भूजल पुनर्भरण, सूक्ष्म सिंचन व संरक्षित सिंचन सुविधेवर भर देण्यात येणार आहे.हवामानाकुल शेती पद्धतीहवामानानुकूल कृषी पद्धतीमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, जमिनीमध्ये कर्ब ग्रहणाचे प्रमाण वाढविणे, क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, संरक्षित शेतीसह एकात्मिक शेती पद्धतीवर भर देण्यात येणार आहे.काढणीपश्चात व्यवस्थापनशेती उत्पादक कंपन्यांचे सक्षमीकरण, क्षमता बांधणी, बाजार व्यवस्थेशी सांगड निर्माण करणे, भाडे तत्त्वावर कृषी औजारे केंद्र-सुविधा निर्मिती करण्यात येणार आहे.