शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

२०२ गावांना कृषी संजीवनीचे टॉनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:14 IST

लहान शेतकऱ्यांची शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी जिल्ह्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पोखरा) उपलब्धी आहे. पहिल्या टप्प्यात १२ गावसमूहाची निवड करण्यात आली. यामध्ये एकूण २०२ गावांचा समावेश करण्यात आला. प्रकल्पामध्ये समाविष्ट ५३२ गावांमध्ये येत्या सहा वर्षांत शाश्वत विकास साध्य करण्याचे आव्हान आहे.

ठळक मुद्देहवामानाकुल पीकपद्धती : पहिल्या टप्प्यात १२ गावसमूह, ३३ गावसमित्या स्थापित

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लहान शेतकऱ्यांची शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी जिल्ह्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पोखरा) उपलब्धी आहे. पहिल्या टप्प्यात १२ गावसमूहाची निवड करण्यात आली. यामध्ये एकूण २०२ गावांचा समावेश करण्यात आला. प्रकल्पामध्ये समाविष्ट ५३२ गावांमध्ये येत्या सहा वर्षांत शाश्वत विकास साध्य करण्याचे आव्हान आहे. यामध्ये खारपाणपट्यामधील ३५६, तर दुष्काळजन्य असणाऱ्या १७६ गावांचा समावेश आहे.पोखरा प्रकल्पात लहान क्षेत्रातील शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन सक्षम करण्यावर भर देण्यात आला. प्रकल्पांतर्गत गावसमूहातील प्रत्येक गावाचे सूक्ष्म नियोजन आराखडे तयार करून ग्रामसभेच्या मान्यतेने व सरपंचाच्या अध्यक्षतेखालील कृषी संजीवनी समितीद्वारे गावात कामे सुरू करण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ३३ ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापित करण्यात आल्या. हवामान बदलास अनुसरून कृषी पद्धती विकसित करणे, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादकतेत वृद्धी, कृषिमूल्य साखळीमध्ये सहभाग, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर शेती होण्यासाठी प्रयत्न करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे.शेतीसाठी या घटकांवर भरक्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, संरक्षित शेती, पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर, भूजल पुनर्भरण, काढणीपश्चात व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीमालाचे संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी-विक्री आदीबाबत सहाय्य, बियाणे वितरण प्रणालीची कार्यक्षमता वृद्धिंगत करणे, पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, पिकांचे हवामानाकूल वाण विकसित करणे आदी घटक आहेत.शेतीवर उपजीविका असणाऱ्यांना लाभकेवळ शेतीवर उपजीविका असलेल्या अत्यल्प व अल्प भूधारकांना आणि भूमिहीन शेतमजुरांना लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थींची निवड अनुसूचित जाती व जमाती, महिला, दिव्यांग व सर्वसाधारण या प्राधान्यक्रमानुसार करण्यात येईल. प्रथम अत्यल्प भूधारक व निधी शिल्लक राहिल्यास अल्पभूधारकाची निवड करण्यात येणार आहे.पाण्याचा कार्यक्षम, शाश्वत वापरमूलस्थानी जलसंधारण, ओघळीवरचे उपचार, पाणी साठवण संरचनांची निर्मिती, जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, भूजल पुनर्भरण, सूक्ष्म सिंचन व संरक्षित सिंचन सुविधेवर भर देण्यात येणार आहे.हवामानाकुल शेती पद्धतीहवामानानुकूल कृषी पद्धतीमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, जमिनीमध्ये कर्ब ग्रहणाचे प्रमाण वाढविणे, क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, संरक्षित शेतीसह एकात्मिक शेती पद्धतीवर भर देण्यात येणार आहे.काढणीपश्चात व्यवस्थापनशेती उत्पादक कंपन्यांचे सक्षमीकरण, क्षमता बांधणी, बाजार व्यवस्थेशी सांगड निर्माण करणे, भाडे तत्त्वावर कृषी औजारे केंद्र-सुविधा निर्मिती करण्यात येणार आहे.