शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२०२ गावांना कृषी संजीवनीचे टॉनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:14 IST

लहान शेतकऱ्यांची शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी जिल्ह्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पोखरा) उपलब्धी आहे. पहिल्या टप्प्यात १२ गावसमूहाची निवड करण्यात आली. यामध्ये एकूण २०२ गावांचा समावेश करण्यात आला. प्रकल्पामध्ये समाविष्ट ५३२ गावांमध्ये येत्या सहा वर्षांत शाश्वत विकास साध्य करण्याचे आव्हान आहे.

ठळक मुद्देहवामानाकुल पीकपद्धती : पहिल्या टप्प्यात १२ गावसमूह, ३३ गावसमित्या स्थापित

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लहान शेतकऱ्यांची शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी जिल्ह्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पोखरा) उपलब्धी आहे. पहिल्या टप्प्यात १२ गावसमूहाची निवड करण्यात आली. यामध्ये एकूण २०२ गावांचा समावेश करण्यात आला. प्रकल्पामध्ये समाविष्ट ५३२ गावांमध्ये येत्या सहा वर्षांत शाश्वत विकास साध्य करण्याचे आव्हान आहे. यामध्ये खारपाणपट्यामधील ३५६, तर दुष्काळजन्य असणाऱ्या १७६ गावांचा समावेश आहे.पोखरा प्रकल्पात लहान क्षेत्रातील शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन सक्षम करण्यावर भर देण्यात आला. प्रकल्पांतर्गत गावसमूहातील प्रत्येक गावाचे सूक्ष्म नियोजन आराखडे तयार करून ग्रामसभेच्या मान्यतेने व सरपंचाच्या अध्यक्षतेखालील कृषी संजीवनी समितीद्वारे गावात कामे सुरू करण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ३३ ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापित करण्यात आल्या. हवामान बदलास अनुसरून कृषी पद्धती विकसित करणे, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादकतेत वृद्धी, कृषिमूल्य साखळीमध्ये सहभाग, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर शेती होण्यासाठी प्रयत्न करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे.शेतीसाठी या घटकांवर भरक्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, संरक्षित शेती, पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर, भूजल पुनर्भरण, काढणीपश्चात व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीमालाचे संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी-विक्री आदीबाबत सहाय्य, बियाणे वितरण प्रणालीची कार्यक्षमता वृद्धिंगत करणे, पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, पिकांचे हवामानाकूल वाण विकसित करणे आदी घटक आहेत.शेतीवर उपजीविका असणाऱ्यांना लाभकेवळ शेतीवर उपजीविका असलेल्या अत्यल्प व अल्प भूधारकांना आणि भूमिहीन शेतमजुरांना लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थींची निवड अनुसूचित जाती व जमाती, महिला, दिव्यांग व सर्वसाधारण या प्राधान्यक्रमानुसार करण्यात येईल. प्रथम अत्यल्प भूधारक व निधी शिल्लक राहिल्यास अल्पभूधारकाची निवड करण्यात येणार आहे.पाण्याचा कार्यक्षम, शाश्वत वापरमूलस्थानी जलसंधारण, ओघळीवरचे उपचार, पाणी साठवण संरचनांची निर्मिती, जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, भूजल पुनर्भरण, सूक्ष्म सिंचन व संरक्षित सिंचन सुविधेवर भर देण्यात येणार आहे.हवामानाकुल शेती पद्धतीहवामानानुकूल कृषी पद्धतीमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, जमिनीमध्ये कर्ब ग्रहणाचे प्रमाण वाढविणे, क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, संरक्षित शेतीसह एकात्मिक शेती पद्धतीवर भर देण्यात येणार आहे.काढणीपश्चात व्यवस्थापनशेती उत्पादक कंपन्यांचे सक्षमीकरण, क्षमता बांधणी, बाजार व्यवस्थेशी सांगड निर्माण करणे, भाडे तत्त्वावर कृषी औजारे केंद्र-सुविधा निर्मिती करण्यात येणार आहे.