शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

बहिरमबुवांच्या दर्शनाला आता टोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 22:19 IST

महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या विदर्भातील ऐतिहासिक बहिरम यात्रेवर टोलचे सावट पसरले आहे. यात्रेकरूंसह ग्रामस्थांना यापुढे टोल भरावा लागेल. त्याचा फटका गोरगरीब आदिवासींना बसणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरणारी यात्रा उद्ध्वस्त होण्याचीदेखील भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांनाही भुर्दंड : यात्रेचे स्वरूप बदलण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या विदर्भातील ऐतिहासिक बहिरम यात्रेवर टोलचे सावट पसरले आहे. यात्रेकरूंसह ग्रामस्थांना यापुढे टोल भरावा लागेल. त्याचा फटका गोरगरीब आदिवासींना बसणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरणारी यात्रा उद्ध्वस्त होण्याचीदेखील भीती निर्माण झाली आहे.बहिरम यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही यात्रा अंजनगाव ते बैतुल मार्गाच्या दुतर्फा भरते. केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्रालयाने या मार्गाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले आहे. १४ जून २०१७ रोजी दिलेले २७० कोटींचे कंत्राट दोन वर्षांत पूर्ण करायचे आहे. रस्त्याच्या नव्या कामामुळे रुंदी ६० फूट होणार असल्याने वनविभागाचा नाका, मनकर्णा विहीर, पंचायत समितीची इमारत पाडली जाणार आहे. यात्रेदरम्यान लागणाऱ्या दुकानांचा प्रश्नही निर्माण होणार आहे.दरम्यान टोल नाका यात्रा परिसर सोडून बैलबाजाराच्या पुढे किंवा आरटीओ चेक पोस्ट परिसरातच मोकळ्या जागेत टोल नाका उभारून वसुली करावी. रस्ताच यात्रेच्या मागच्या बाजूने वळता करीत तिरंगा सभागृह व रेस्ट हाऊससमोरून पुढे न्यावा, जेणेकरून यात्रेचे स्वरूप अबाधित राहील, असे ग्रामस्थांनी सुचविले आहे. टोल नाक्याचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणीदेखील जोर धरत आहे.यात्रेवर डोळाबहिरम यात्रा डोळ्यांपुढे ठेवून त्याच्या अगदी जवळ टोल नाका प्रस्तावित करण्यात आला आहे. या टोलकरिता गट क्रमांक ४३३ मधील खासगी शेतजमिनीची मोजणी महामार्ग अधिकाऱ्यांनी नुकतीच केली. मार्गावर टोलचे संकेत पिवळ्या पेंटने स्पष्ट केले आहेत.

टोल नाक्यासंदर्भात पाहणी करताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी.