शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

२५० ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:53 IST

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रथमच थेट सरपंच निवडला जाणार असल्याने रंगतदार व प्रतिष्ठेच्या प्रचारानंतर सोमवारी उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

ठळक मुद्देथेट सरपंचाची होणार निवड : मतदान साहित्य गावागावांत पोहोचले

अमरावती : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रथमच थेट सरपंच निवडला जाणार असल्याने रंगतदार व प्रतिष्ठेच्या प्रचारानंतर सोमवारी उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या गावांमध्ये रविवारी मतदान साहित्य पोहचले आहेत.जिल्ह्यात एकूण २५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी पाच ग्रामपंचायती अविरोध आल्यामुळे २५० ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार आहेत. यावेळी सरपंचपद प्रथमच थेट जनतेमधून असल्यामुळे निवडणुकीला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. या निवडणुकीत सहा ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी एकच अर्ज दाखल झाला आहे. २४९ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी बहुरंगी लढत आहे. ५०७ सदस्यपदांची अविरोध निवड झाल्याने उर्वरित १,४६१ सदस्यपदासाठी ही निवडणूक होत आहे. मतदानादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी तालुका व पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे. पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावली आहे. निवडणूक प्रक्रियेवर एसडीओ, तहसीलदार यांची कडी नजर आहे.अचलपूर तालुक्यात २३, चिखलदरा २९, चांदूरबाजार २५, दर्यापूर २०, अंजनगाव १३, चांदूररेल्वे १७, वरूड २३, मोर्शी २४, तिवसा १२, धामणगाव ८, नांदगाव १७, धारणी १८, अमरावती १२, भातकुली ११ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी ३५५ उमेदवार रिंगणात आहेत.अमरावती तालुक्यात ९९, भातकुली ८७, नांदगाव खंडेश्वर ११५, तिवसा ९०, चांदूररेल्वे १३१, धामणगाव ५२, दर्यापूर १२५, अंजनगाव सुर्जी ९५, अचलपूर १४५, चांदूरबाजार १७१, मोर्शी १८६, वरूड १७८, धारणी १००, तर चिखलदरा तालुक्यातील १३६ सरपंचांसह सदस्यपदासाठी ही निवडणूक होत आहे.सोमवार १६ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. मंगळवार १७ आॅक्टोबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.