शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

२५० ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:53 IST

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रथमच थेट सरपंच निवडला जाणार असल्याने रंगतदार व प्रतिष्ठेच्या प्रचारानंतर सोमवारी उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

ठळक मुद्देथेट सरपंचाची होणार निवड : मतदान साहित्य गावागावांत पोहोचले

अमरावती : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रथमच थेट सरपंच निवडला जाणार असल्याने रंगतदार व प्रतिष्ठेच्या प्रचारानंतर सोमवारी उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या गावांमध्ये रविवारी मतदान साहित्य पोहचले आहेत.जिल्ह्यात एकूण २५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी पाच ग्रामपंचायती अविरोध आल्यामुळे २५० ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार आहेत. यावेळी सरपंचपद प्रथमच थेट जनतेमधून असल्यामुळे निवडणुकीला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. या निवडणुकीत सहा ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी एकच अर्ज दाखल झाला आहे. २४९ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी बहुरंगी लढत आहे. ५०७ सदस्यपदांची अविरोध निवड झाल्याने उर्वरित १,४६१ सदस्यपदासाठी ही निवडणूक होत आहे. मतदानादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी तालुका व पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे. पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावली आहे. निवडणूक प्रक्रियेवर एसडीओ, तहसीलदार यांची कडी नजर आहे.अचलपूर तालुक्यात २३, चिखलदरा २९, चांदूरबाजार २५, दर्यापूर २०, अंजनगाव १३, चांदूररेल्वे १७, वरूड २३, मोर्शी २४, तिवसा १२, धामणगाव ८, नांदगाव १७, धारणी १८, अमरावती १२, भातकुली ११ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी ३५५ उमेदवार रिंगणात आहेत.अमरावती तालुक्यात ९९, भातकुली ८७, नांदगाव खंडेश्वर ११५, तिवसा ९०, चांदूररेल्वे १३१, धामणगाव ५२, दर्यापूर १२५, अंजनगाव सुर्जी ९५, अचलपूर १४५, चांदूरबाजार १७१, मोर्शी १८६, वरूड १७८, धारणी १००, तर चिखलदरा तालुक्यातील १३६ सरपंचांसह सदस्यपदासाठी ही निवडणूक होत आहे.सोमवार १६ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. मंगळवार १७ आॅक्टोबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.