शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शहर स्वच्छतेचे आजपासून मुल्यांकन

By admin | Updated: January 17, 2017 00:08 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ५०० स्वच्छ शहर निवडण्यासाठी २००० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण : त्रिसदस्यीय पथक दाखल, २००० गुणांची परीक्षाअमरावती : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ५०० स्वच्छ शहर निवडण्यासाठी २००० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती महापालिका परीक्षार्थी म्हणून सहभागी झाली आहे. शहराची स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन तपासणीसाठी क्वॉलिटी कौन्सिल आॅफ इंडिया ‘क्युसीआय’ची टिम १७ ते १९ जानेवारीदरम्यान अमरावती येत असून त्यानिमित्ताने पालिकेने जोरदार तयारी केली आहे. घनकचरा संकलन, वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, प्रक्रिया अशा विविध घटकांवर ‘स्वच्छ’ शहराचे नामांकन ठरणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पालिकेने जोरकस प्रयत्न चालविले आहेत. वैयक्तिक शौचालय उभारणीसह शहर स्वच्छता, बायोगॅस, आर्गेनिक वेस्ट प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशनचे ‘सिनिअर अ‍ॅसेसर चारूदत्त पाठक व अन्य दोन अधिकाऱ्यांची क्युसीआयचे पथक मंगळवारी सकाळी शहरात दाखल होईल. तीन दिवसीय दौऱ्याचा मंगळवार पहिला दिवस आहे. पाठक हे महापालिकेत बसून स्वच्छता व्यवस्थापन प्रकल्प व अनुषंगिक सर्व ‘डाक्युमेंटेशन’ची पाहणी करणार आहे तर त्यांचे दोन सहकारी प्रत्यक्षात ‘स्पॉट व्हिजिट’ करतील. १७ ते १९ जानेवारीदरम्यान होणाऱ्या स्पॉट व्हिजिट आणि डॉक्युमेंटेशनवर देशातील ५०० शहरांमधील अमरावतीचे नामांकन ठरणार आहे. आयुक्त हेमंत पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी याबाबतची पूर्वतयारी पूर्ण केली आहे. (प्रतिनिधी)आरोग्य अधिकाऱ्यांकडे जबाबदारीशहरातील रस्ते, साफसफाई, सर्व्हिस लेन, गटारी खुल्या जागेतील कचरा कुंड्यांची केंद्रीय पथकाद्वारे तपासणी करण्यात येईल. त्याअनुषंगाने वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्वच्छता वैद्यकीय अधिकारी अजय जाधव यांच्यावरही अतिरिक्त आयुक्तांनी स्वच्छता विषयक धुरा सोपविली आहे.आगार, रेल्वे व्यवस्थापकांना पत्रस्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत केंद्रीय पथकाद्वारे शहरातील स्वच्छताविषयक व दैनंदिन साफसफाईची पाहणी केली जाईल. या अनुषंगाने मध्यवर्ती बसस्थानकासह बडनेरा आणि अमरावती रेल्वेस्टेशन, मास्टर्सला पत्र देण्यात आले आहे. १७ ते १९ दरम्यान होणाऱ्या या पाहणी दौऱ्यादरम्यान मध्यवर्ती बसस्थानकासह अमरावती व बडनेरा रेल्वे स्टेशनची विशेष स्वच्छता ठेवावी, असे पत्र महापालिकेद्वार करण्यात आले आहे.