शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

शहर स्वच्छतेचे आजपासून मुल्यांकन

By admin | Updated: January 17, 2017 00:08 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ५०० स्वच्छ शहर निवडण्यासाठी २००० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण : त्रिसदस्यीय पथक दाखल, २००० गुणांची परीक्षाअमरावती : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ५०० स्वच्छ शहर निवडण्यासाठी २००० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती महापालिका परीक्षार्थी म्हणून सहभागी झाली आहे. शहराची स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन तपासणीसाठी क्वॉलिटी कौन्सिल आॅफ इंडिया ‘क्युसीआय’ची टिम १७ ते १९ जानेवारीदरम्यान अमरावती येत असून त्यानिमित्ताने पालिकेने जोरदार तयारी केली आहे. घनकचरा संकलन, वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, प्रक्रिया अशा विविध घटकांवर ‘स्वच्छ’ शहराचे नामांकन ठरणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पालिकेने जोरकस प्रयत्न चालविले आहेत. वैयक्तिक शौचालय उभारणीसह शहर स्वच्छता, बायोगॅस, आर्गेनिक वेस्ट प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशनचे ‘सिनिअर अ‍ॅसेसर चारूदत्त पाठक व अन्य दोन अधिकाऱ्यांची क्युसीआयचे पथक मंगळवारी सकाळी शहरात दाखल होईल. तीन दिवसीय दौऱ्याचा मंगळवार पहिला दिवस आहे. पाठक हे महापालिकेत बसून स्वच्छता व्यवस्थापन प्रकल्प व अनुषंगिक सर्व ‘डाक्युमेंटेशन’ची पाहणी करणार आहे तर त्यांचे दोन सहकारी प्रत्यक्षात ‘स्पॉट व्हिजिट’ करतील. १७ ते १९ जानेवारीदरम्यान होणाऱ्या स्पॉट व्हिजिट आणि डॉक्युमेंटेशनवर देशातील ५०० शहरांमधील अमरावतीचे नामांकन ठरणार आहे. आयुक्त हेमंत पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी याबाबतची पूर्वतयारी पूर्ण केली आहे. (प्रतिनिधी)आरोग्य अधिकाऱ्यांकडे जबाबदारीशहरातील रस्ते, साफसफाई, सर्व्हिस लेन, गटारी खुल्या जागेतील कचरा कुंड्यांची केंद्रीय पथकाद्वारे तपासणी करण्यात येईल. त्याअनुषंगाने वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्वच्छता वैद्यकीय अधिकारी अजय जाधव यांच्यावरही अतिरिक्त आयुक्तांनी स्वच्छता विषयक धुरा सोपविली आहे.आगार, रेल्वे व्यवस्थापकांना पत्रस्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत केंद्रीय पथकाद्वारे शहरातील स्वच्छताविषयक व दैनंदिन साफसफाईची पाहणी केली जाईल. या अनुषंगाने मध्यवर्ती बसस्थानकासह बडनेरा आणि अमरावती रेल्वेस्टेशन, मास्टर्सला पत्र देण्यात आले आहे. १७ ते १९ दरम्यान होणाऱ्या या पाहणी दौऱ्यादरम्यान मध्यवर्ती बसस्थानकासह अमरावती व बडनेरा रेल्वे स्टेशनची विशेष स्वच्छता ठेवावी, असे पत्र महापालिकेद्वार करण्यात आले आहे.