शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

उमेदवारी अर्ज प्रक्रिया आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:09 IST

लोकसभा निवडणुकीकरीता मंगळवारपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे. सार्वजनिक सुटीचे दिवस वगळता २६ मार्चपर्यत सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत उमेदवारी अर्ज स्विकारल्या जाणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्याची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, अर्जाला २६ मार्च अंतिम तारीख

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीकरीता मंगळवारपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे. सार्वजनिक सुटीचे दिवस वगळता २६ मार्चपर्यत सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत उमेदवारी अर्ज स्विकारल्या जाणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्याची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.उमेदवार किंवा सुचकाला निवडणूक निर्णय अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी,अमरावती यांच्याकडे अर्ज दाखल करता येणार आहे व याच ठिकानी अर्ज उपलब्ध देखील आहेत. एका उमेदवाराला चार अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्जाची छाननी २७ मार्च, अर्जाची माघार २९ मार्चला उमेदवार किंवा त्याने लेखी प्राधिकार दिलेल्या सुचकाला घेता येईल. २८ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यत मतदान होणार आहे. मतदान यंत्र नेमानी गोडावून येथे ठेवण्यात येणार आहे व याच ठिकाणी २३ एप्रिल रोजी मतमोजणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.उमेदवारी अर्ज नमुना २ मध्ये सादर करणे आवश्यक आहे. एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज सादर करू शकतात. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कक्षात उमेदवारासहीत पाच व्यक्ती उपस्थित राहू शकतात. उमेदवारी अर्जासोबत आयोगाचे आदेशनुसार विहित प्रपत्रातील २६ व्या क्रमांकाचे शपथपत्र हे शपथआयुक्त, प्रथम श्रेणी दंडाधिकारी किंवा लेख प्रमाणक यांच्या समोर प्रमाणबद्ध करणे आवश्यक आहे. शपथपत्रातील कोणताही रकाना रिक्त असता कामा नये तसेच भाग ‘अ’ मध्ये नमुद ठिकाणी ई-मेल आयडी, संपर्क दुरध्वनी क्रमांक व समाजमाध्यम खाते असल्यास नमुद करणे आवश्यक आहे व उमेदवाराला अर्ज सादर करण्याचे किमान एक दिवस अगोदर निवडणूक खर्चासाठी स्वताचे बँकेचे खाते उघडणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.बॅलेट युनिटवर यंदा उमेदवारांचा फोटोमतदान यंत्रावरील बॅलेट युनिटवर यंदा उमेदवारांचा फोटो राहणार आहे. उमेदवाराचे नाव व चिन्ह यांच्या मधात हा फोटो राहणार आहे. उमेदवारांना अर्ज दाखल करतांना आचारसंहिते संदर्भात बुकलेट देण्यात येणार आहे तसेच सोमवारी राजकीय पक्षाचे प्रतिनिधीची बैठक घेण्यात येवून उमेदवारी अर्जातील माहितीसंदर्भात माहिती देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.सर्व्हिस व्होटरसाठी इलेक्ट्रॉनिक्स व्होटर सिस्टिमजिल्ह्यातील तीन हजार सैन्यदलातील जवानांनी मतदानासाठी आॅनलाईन नोंदणी केलेली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स व्होटर सिस्टिमद्वारे त्यांना मतदान करता येणार आहे. यावेळचे बॅलेट तयार झाल्यावर रेजिमेंटला पाठविले जाणार आहे. यापूर्वी सर्व्हीस व्होटरचे मतदान हे पोष्टल बॅलेट पद्धतीने व्हायचे त्यामुळे विलंब लागायचा, असे जिल्हाधिकारी म्हणाले.१९५० वर ७०० मतदारांच्या प्रक्रियामतदारांना त्यांचे मतदानविषयक माहितीसाठी जिल्हा प्रशासनाचेवतीने १९५० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे. यावर या आठवड्यात किमान ७०० मतदारांनी चौकशी केलेली आहे. आचारसंहितेच्या उल्लंघन होत असल्याबाबत ‘सी व्हिजिल’ या मोबाईल अ‍ॅपवर आतापर्यंत आठ तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.८८ मतदान केंद्र वाढले, एकूण २६९५या निवडणुकीसाठी ८८ मतदान केंद्रात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव आयोगाला पाठविला होता. त्यामुळे केंद्रवाढ होऊन जिल्ह्यात एकूण २६९५ केंद्र झाले आहेत. आतापर्यंत ४८६ शस्त्रे जप्त करण्यात आलेली आहेत. ४५ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. १९४ बेलेबल व नॉनबेलेबल वारंट बजावण्यात आले आहे व चेकपोस्टवर ६ केसेस मद्यवाहतूक व एक पिस्टल संदर्भात करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले.