शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

आज शाळांमध्ये प्रवेशोत्सव, विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

By admin | Updated: June 27, 2017 00:04 IST

आजपासून शाळांची पहिली घंटा वाजणार असून शाळांमध्ये प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

उत्साह : कुठे गुलाबपुष्प, कुठे रांगोळ्या, कुठे प्रभातफेरी लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आजपासून शाळांची पहिली घंटा वाजणार असून शाळांमध्ये प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अतिशय उत्साहवर्धक वातावरणात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणिय ठरणार आहे. नवप्रवेशित बालकांना शाळेची गोडी लगावी, याउद्देशाने प्रत्येक शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्याअनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून सर्व माध्यमांच्या शाळांचे शिक्षक व अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. पहिल्या दिवशी शाळांना भेटी देण्यासाठी अधिकाऱ्यांची भरारी पथके तत्पर राहणार असून तालुकास्तरावर स्वतंत्र पथके नियुक्त केली जाणार आहेत. मोफत व सक्तीचे शिक्षणहक्क कायद्यानुसार एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता विशेष प्रयत्न केले जात आहेत. मंगळवारी पहिल्या दिवशी नवप्रवेशित विद्यार्थ्यांसह इयत्ता पहिली व चौथीच्या बालकांचे गोड पदार्थ भरवून आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित प्राथमिक शाळांतील बालकांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाईल. मंगळवारी गावागावात प्रभातफेरीचे आयोजन करून तसेच नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन तसेच त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले जाईल. शाळा परिसर आकर्षक रांगोळ्यांनी सजविला जाणार आहे. पोषण आहारही गोड शाळेचा पहिला दिवस असल्याने पोषण आहारातील मेन्यूही गोड असणार आहे. यासंदर्भात सर्वच शाळांना शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत, ७ ते ७.३०-बालकांची प्रथम भेट, ८ ते ९ - पाठ्यपुस्तके वितरण, मान्यवरांच्या हस्ते बालकांचे स्वागत, ९ ते १०- वर्षभर १०० टक्के उपस्थिती ठेवण्याबाबत माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. पाठ्यपुस्तकांचा पुरवठासर्वशिक्षा अभियानापासून शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व बालकांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. तसेच मोफत गणवेश योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. दोन्ही गोष्टी एकत्रपणे देण्यात येतील.शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा, याउद्देशाने विशेष तयारी करण्यात आली आहे. रविवारपासून शाळांमध्ये लगबग सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले जाईल. - एस.एम.पानझाडे प्राथमिक शिक्षणाधिकारी