शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

आजपासून १२ रुपयांत दोन लाखांचा विमा

By admin | Updated: May 9, 2015 00:21 IST

पंतप्रधान जीवनज्योती तसेच सुरक्षा विमा योजनेचे शनिवार ९ मे रोजी लोकार्पण होत आहे. केंद्र शासनाच्या या ..

प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना : जिल्ह्यात १३ लाख नागरिकांना मिळणार लाभअमरावती : पंतप्रधान जीवनज्योती तसेच सुरक्षा विमा योजनेचे शनिवार ९ मे रोजी लोकार्पण होत आहे. केंद्र शासनाच्या या योजनेत एका वर्षासाठी १२ रुपयांमध्ये दोन लाख रुपयांच्या विम्याचा लाभ मिळणार यासाठी वयाची १८ ते ७० ही कालमर्यादा आहे. जिल्ह्यातील १९ बँकांना याबाबत खातेदार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात किमान १२ ते १३ लाख नगारिकांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाने बँकांच्या मदतीने विमा योजना सुरु केली आहे. याच योजनेअंतर्गत ३३० रुपयांमध्ये एक वर्षाचा विमा देण्याची योजना आहे यामध्ये ज्यांचे वय १८ ते ५० वर्षे आहे. अशा सर्व बचत खातेदारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच खातेदारांच्या पश्चात कुटुंबीयांना विमा रक्कम मिळणार आहे.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत वार्षिक प्रीमियम फक्त १२ रुपयांमध्ये दोन लाख रुपयांचा अपघात विमा आहे. सर्व बचत बँक खातेधारकांसाठी ही योजना आहे. विम्यात अपघातामुळे येणाऱ्या कायमस्वरुपी अपंगात्वाचाही समावेश करण्यात आला आहे. नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरदेखील दोन लाख रुपये मिळणार आहेत. यासाठीदेखील वयोमर्यादा १८ ते ७० आहे. दुसऱ्या योजनेत ३३ रुपयांमध्ये आजारपणात मृत्यू झाल्यास चार लाख रुपयांची मदत केंद्र शासनाकडून मिळणार आहे.१७ बँकांना दिले उद्दिष्टसर्वसामान्य नागरिकांना सुरक्षा कवच मिळावे यासाठी केंद्र शासनाने ही योजना सुरु केली आहे. यासाठी जिल्ह्यातील १७ बँकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ असा विम्याचा कालावधी राहणार आहे. यासाठी सर्वच बँकांनी पुढाकार घेतला आहे. बँकाद्वारा अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील किमान १२ लाख नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात शनिवारी लोकार्पणअटल पेंशन योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी बचत भवन येथे आयोजित कार्यक्रमात लोकार्पण होणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे खा. आनंदराव अडसूळ, आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. सेंट्रल बँकेद्वारा नोंदणी शिबिरया विमा योजनांकरिता सेंट्रल बँकेद्वारा शहरात नोंदणी शिबिर घेण्यात आले. यावेळी योजनेची माहिती नागरिकांना देण्यात आली. प्रत्येक नागरिकांनी बचत खाते उघडून योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन सहायक महाप्रबंधक संजय देवरस व अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक ए.बी. खोरगडे यांनी केले.