शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

आजपासून १२ रुपयांत दोन लाखांचा विमा

By admin | Updated: May 9, 2015 00:21 IST

पंतप्रधान जीवनज्योती तसेच सुरक्षा विमा योजनेचे शनिवार ९ मे रोजी लोकार्पण होत आहे. केंद्र शासनाच्या या ..

प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना : जिल्ह्यात १३ लाख नागरिकांना मिळणार लाभअमरावती : पंतप्रधान जीवनज्योती तसेच सुरक्षा विमा योजनेचे शनिवार ९ मे रोजी लोकार्पण होत आहे. केंद्र शासनाच्या या योजनेत एका वर्षासाठी १२ रुपयांमध्ये दोन लाख रुपयांच्या विम्याचा लाभ मिळणार यासाठी वयाची १८ ते ७० ही कालमर्यादा आहे. जिल्ह्यातील १९ बँकांना याबाबत खातेदार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात किमान १२ ते १३ लाख नगारिकांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाने बँकांच्या मदतीने विमा योजना सुरु केली आहे. याच योजनेअंतर्गत ३३० रुपयांमध्ये एक वर्षाचा विमा देण्याची योजना आहे यामध्ये ज्यांचे वय १८ ते ५० वर्षे आहे. अशा सर्व बचत खातेदारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच खातेदारांच्या पश्चात कुटुंबीयांना विमा रक्कम मिळणार आहे.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत वार्षिक प्रीमियम फक्त १२ रुपयांमध्ये दोन लाख रुपयांचा अपघात विमा आहे. सर्व बचत बँक खातेधारकांसाठी ही योजना आहे. विम्यात अपघातामुळे येणाऱ्या कायमस्वरुपी अपंगात्वाचाही समावेश करण्यात आला आहे. नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरदेखील दोन लाख रुपये मिळणार आहेत. यासाठीदेखील वयोमर्यादा १८ ते ७० आहे. दुसऱ्या योजनेत ३३ रुपयांमध्ये आजारपणात मृत्यू झाल्यास चार लाख रुपयांची मदत केंद्र शासनाकडून मिळणार आहे.१७ बँकांना दिले उद्दिष्टसर्वसामान्य नागरिकांना सुरक्षा कवच मिळावे यासाठी केंद्र शासनाने ही योजना सुरु केली आहे. यासाठी जिल्ह्यातील १७ बँकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ असा विम्याचा कालावधी राहणार आहे. यासाठी सर्वच बँकांनी पुढाकार घेतला आहे. बँकाद्वारा अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील किमान १२ लाख नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात शनिवारी लोकार्पणअटल पेंशन योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी बचत भवन येथे आयोजित कार्यक्रमात लोकार्पण होणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे खा. आनंदराव अडसूळ, आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. सेंट्रल बँकेद्वारा नोंदणी शिबिरया विमा योजनांकरिता सेंट्रल बँकेद्वारा शहरात नोंदणी शिबिर घेण्यात आले. यावेळी योजनेची माहिती नागरिकांना देण्यात आली. प्रत्येक नागरिकांनी बचत खाते उघडून योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन सहायक महाप्रबंधक संजय देवरस व अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक ए.बी. खोरगडे यांनी केले.