शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
4
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
5
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
9
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
10
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
11
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
12
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
13
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
14
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
15
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
16
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
17
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
18
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
19
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा

आज अधिकारी कर्मचारी करणार गावात मुक्काम

By admin | Updated: December 9, 2014 22:42 IST

जिल्ह्यातील टंचाई नापिकी आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा ग्रामजिवनावर होत असलेला परिणाम व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचे आकलन करून उपाययोजना करण्यासाठी अधिकारी,

अमरावती : जिल्ह्यातील टंचाई नापिकी आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा ग्रामजिवनावर होत असलेला परिणाम व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचे आकलन करून उपाययोजना करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व ८४३ ग्रामपंचायतींमध्ये मुक्काम करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशांनुसार उद्या १० डिसेंबर रोजी अधिकारी-कर्मचारी गाव-खेड्यांमध्ये मुक्काम करतील.यावर्षी बळीराजाला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला. त्यामध्ये कमी पर्जन्यमान, अवकाळी पाऊस, दुष्काळ सदृश्य परिस्थिती अशा संकटामुळे जिल्ह्यातील १९८१ गावांवर संकट आले आहे. महसूल विभागाने हा प्रकार हेरला. एरवी ही प्रक्रिया शासकीयच. मात्र, यावेळी या प्रक्रियेत सकारात्मकता व संवादाची भर पडली. यासाठी नुकसानग्रस्त शेतकरी, गावकऱ्यांशी चर्चा करण्याचा निर्णय झाला आणि त्यातून गाव मुक्कामाची संकल्पना पुढे आली. त्यानुसार सर्व ८४३ ग्रामपंचायतींमध्ये वरिष्ठ शासकीय वर्ग १ व २ चे अधिकारी, महसूलमधील मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी व इतरही सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना गावात मुक्काम करावा लागणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी गित्ते व निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांनी दिले. यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे नियोजन तहसीलदार व गटविकास अधिकारी करीत आहेत. अतिरिक्त मनुष्यबळाची देखील जुळवाजुळव सुरू आहे. गाव मुक्कामातून हाती येणाऱ्या माहितीतून पुढील कृती आराखडा तयार करण्यासाठी १५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. या सर्वांचे नियोजन व अंमलबजावणी निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार करीत आहेत. गावकऱ्यांचा अहवाल कागदोपत्री तयार करण्याऐवजी प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर समस्या अधिक प्रखरपणे समोर येण्यास मदत होईल, असा उद्देश यातून साध्य होणार आहे. (प्रतिनिधी)