शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

तिवसा बसस्थानक बनले समस्यांचे माहेरघर

By admin | Updated: March 11, 2016 00:29 IST

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तिवसा बसस्थानकास उतरती कळा लागली आहे.

दुर्गंधी, अस्वच्छतेचा कहर : विद्युत दिवे बंद, अंधाराचे साम्राज्यरोशन कडू तिवसा‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तिवसा बसस्थानकास उतरती कळा लागली आहे. हे बसस्थानक जणू समस्यांचे माहेरघर बनले आहे. प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळणे तर दूरच पण सायंकाळनंतर अंधाराचा सामना करावा लागत असल्याने प्रवाशांसह बसस्थानकाच्या परिसरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सुमारे २० हजार लोकसंख्येचा टप्पा गाठत असलेले आणि अमरावती-नागपूर महामार्गावर वसलेले तिवसा पंचक्रोशीतील मध्यवर्ती गाव. तिवसासह तालुक्यातील तळेगाव ठाकूर, शेंदूरजनाबाजार, सुरवाडी, वरखेड, भारवाडी या गावांसह प्रवासी वर्गाची नेहमी वर्दळ असते. प्रशस्त जागा असलेल्या येथील स्थानकातून लांब पल्ल्याच्या बसेसही मोठ्या प्रमाणात धावतात. मात्र बसस्थानकात प्रवाशांच्या दृष्टिकोनातून सुविधा नसल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत वाहनचालकांकडे विचारपूस केली असता सायंकाळी अंधार पडल्यानंतर स्थानकात दिवे नसताना येथे कोण बसची वाट पाहत उभे राहील. त्यामुळे आम्ही बस सरळ तीनपाटीवर घेऊन जातो, अशी प्रतिक्रिया काही चालकांनी दिली. स्थानकात विविध सुविधांचा अभाव आहे. दिवसा अनेक प्रवासी बसस्थानकात बसची वाट पाहत थांबलेले असतात. परंतु येथे प्रवाशांसाठी म्हणावी तशी सुविधा उपलब्ध नाही. पिण्याच्या टाकी आहे पण नळांना तोट्या नाही. पूर्वी येथे प्रवाशांना नाश्त्यासाठी एक कॅन्टीन होती. पण ती सात ते आठ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. बसस्थानकालगत स्वच्छतेअभावी त्याची बिकट अवस्था झाली आहे. स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य असून त्यात प्रवेश करताच उग्र दुर्गंधीमुळे प्रवासी नाकाला हात लावत सरळ बाहेर पडतात. स्वच्छतागृहात साफसफाई नसल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. पाय ठेवायलाही स्वच्छ जागा नसल्याने प्रवासी स्वच्छतागृहाच्या बाहेर आडोसा बघून आपली सोय करून घेताना दिसतात. बसस्थानकात सायंकाळी काळोखानंतर बस प्रवेश करीत नसल्याने प्रवासी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला बसची वाट बघत उभे असतात. दिवसभरही अनेक प्रवासी बाहेरच उभे राहून बसची वाट बघतात. संबंधित विभागाकडून समस्यांबाबत तत्काळ निर्णय घेऊन गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.