शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
2
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
3
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
4
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
5
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
6
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
7
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
8
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
9
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
10
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
11
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
12
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
13
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
14
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
15
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
16
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
17
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
18
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
19
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
20
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या दिल्या टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 00:12 IST

मानव- वन्यजीव संघर्ष टाळणे, वन्यजीवांचे संरक्षण आणि वन्यप्राणी स्थलांतर रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, ....

रेस्क्यू आॅपरेशन पथक कार्यशाळा : वन्यजीवांचे संरक्षण,स्थलांतरविषयी मागदर्शनअमरावती : मानव- वन्यजीव संघर्ष टाळणे, वन्यजीवांचे संरक्षण आणि वन्यप्राणी स्थलांतर रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, उपाययोजना आदींविषयी रेस्क्यू आॅपरेशन पथकाला तज्ञांकडून टिप्स देण्यात आल्या आहेत. मानव-वन्यजीव संघर्ष टाळताना रेस्क्यू आॅपरेशन पथकातीेल चमुने सुरक्षित कसे राहावे, याविषयी मार्गदर्शन देण्यात आले.येथील वनविभागाच्या कुलाढाप संकुलात रेस्क्यू आॅपरेशन पथकाच्या आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा मंगळवारी समारोप झाला. उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा पार पडली. अमरावती, मेळघाट, नागपूर, यवतमाळ व बुलडाणा येथील रेस्कयू आॅपरेशन पथकाची चमू उपस्थित होती. या दोन दिवसीय कार्यशाळेत कार्मिक विभागाचे के. सिन्हा यांनी वन्यजीवांचे स्थलांतर, सामाजिक वनीकरणाचे रवींद्र वानखडे यांनी रानडुकराचे राहणीमान, सवयी, मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी माहिती दिली. व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांनी नरभक्षी वनप्राण्यांपासून बचाव करताना घ्यावयाची काळजी, राजू मैथ्यू यांनी अद्ययावत रायफल चालविणे, हाताळणे आणि वन्यजीवांचे पगमार्कवरुन नोंदी घेतांना ते वन्यप्राणी कोणते आदींबाबत मार्गदर्शन केले. वन्यजीव संरक्षक राघवेंद्र नांदे यांनी सापांची काळजी, वन्यजीवांचे संरक्षण करण्याविषयी मार्गदर्शन केले. रेस्क्यू आॅपरेशन पथकाची निर्मिती ही वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी झाली असल्याने या चमुला बारीकसारीक माहिती मिळावी, यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. वनविभागाच्या पुढाकाराने रेस्क्यू आॅपरेशन पथकाचे दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. एकूण ४० जवानांना वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.- हेमंत मीणाउपवनसंरक्षक, अमरावती.