शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

यंदा फळांचा राजा आंबा रुसला

By admin | Updated: April 21, 2016 00:07 IST

वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाच्या फटक्याने यंदा फळांचा राजा आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.

आवक घटली : वादळी पावसाचा फटका, भावही प्रचंड वधारलेअमरावती : वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाच्या फटक्याने यंदा फळांचा राजा आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. बाजारात आंब्यांची चढ्या भावाने विक्री होत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात सर्वाधिक आवक असणारा आंबा यंदा रुसला असा भास अमरावतीकरांना होत आहे. उन्हाळा आला की, सर्वप्रथम आंबा फळाची आठवण येते, चवदार व रसाळ आंबा बाजारात पाहून नागरिकांना मोह आवरत नाही. मात्र, यंदा बाजारातून आंबा गायब झाल्यासारखेच चित्र आहे. दरवर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची प्रतिष्ठाने थाटली जातात. तसेच चौकाचौकात व गल्याबोळ्यामध्येही आंब्यांच्या हातगाड्या फिरताना दिसतात. मात्र, यंदा ती परीस्थिती दिसून येत नाही. यंदा बाजारात आंबा विक्रीचे प्रतिष्ठाने व हातगाड्या कमी झाल्या आहे. दरवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक असते. मात्र, यंदा अवकाळी पावसासह गारपीटीच्या तडाख्याने आंबा उत्पादकाचे ७० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे केवळ ३० टक्केच आंबा बाजारात आला आहे. एप्रिल २०१५ मध्ये बाजार समितीकडे दररोज ३०० ते ५०० क्विटंल आंब्याची आवक होती. मात्र, यंदाच्या एप्रिलमध्ये ती आवक कमी होऊन २०० ते ३०० क्विंटलवर आली आहे. सद्यस्थितीत कर्नाटक राज्यातून आंबा येत असून अद्यापपर्यंत महाराष्ट्रातील आंब्याची आवक सुरु झाली नाही. त्यातच विदर्भातील आंबाही अद्यापर्यंत बाजारात आला नसून केवळ कैऱ्याच बाजारात उपलब्ध आहेत. गेल्या वर्षांत २ ते ३ हजार रुपये भावात मिळणार आंबा यंदा ३ ते ६ हजारापर्यंत गेला आहे. त्यामुळे यंदा आंब्याची चढ्या भावाने विक्री केली जात आहे.