शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

हजारो हेक्टरवरील बहरलेल्या संत्र्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:01 IST

तालुक्यातील शिरजगाव कसबा, घाटलाडकी, ब्राह्मणवाडा थडी, करजगाव, सोनोरी, नानोरी भगत मोठ्या प्रमाणात संत्राबागा आहेत. या भागातील शेतकरी संत्रापिकालाच मुख्य व नगदी पीक मानतात. गतवर्षीच्या उन्हाळ्यात अस्मानी संकटामुळे अतिउष्णता व जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे संत्राबागांना पाणी पुरवणे कठीण झाले होते.

ठळक मुद्देसंत्राउत्पादक हवालदिल : अतिपावसाचा फटका

सुमित हरकूट।लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : यंदा तालुक्यात कोसळलेल्या अतिपावसामुळे संत्रा पिकांना चांगलीच गळती लागली आहे. बहरलेल्या संत्राबागेत मोठ्या प्रमाणात संत्राचा सडा पडलेला आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.तालुक्यातील शिरजगाव कसबा, घाटलाडकी, ब्राह्मणवाडा थडी, करजगाव, सोनोरी, नानोरी भगत मोठ्या प्रमाणात संत्राबागा आहेत. या भागातील शेतकरी संत्रापिकालाच मुख्य व नगदी पीक मानतात. गतवर्षीच्या उन्हाळ्यात अस्मानी संकटामुळे अतिउष्णता व जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे संत्राबागांना पाणी पुरवणे कठीण झाले होते. वीज उपकरणासह सर्व सुविधा उपलब्ध असताना केवळ पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे चांदूर बाजार तालुक्यातील हजारो हेक्टरमधील संत्राझाडे वाळून गेली होती. यंदाच्या पावसाळ्यामध्ये अतिपाऊस झाल्यामुळे संत्रा झाडावरील आंबिया बहराची संत्राफळे कुजायला लागली आहेत. संत्रावर पिवळे डाग पडून संत्रा मोठ्या प्रमाणात जमिनीवर गळून पडत असल्याचे चित्र या भागात दिसून येत आहे. यात ब्राम्हणवाडा पाठक, सोनोरी, नोनोरी आदी परिसरात या रोगाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिक पाऊस झाला असून अद्यापही पाऊसाचा जोर कमी झाला नाही. मागील वर्षी ५८७.०३ मिमी. एवढा पाऊस झाला होता. यावर्षी एकूण ९६१.२७ मिमी. पाऊस झाला आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे संत्रा पिकाचा आंबिया बहर चांगलाच बहरला होता. तसेच संत्र्याला चांगली मागणी असून भावदेखील चांगले मिळत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांना यावर्षी चांगले पीक होण्याची खात्री होती. परंतु अति पावसामुळे संत्रा पीक कुजण्यात सुरुवात झाली आहे.शेतकऱ्यांना चिंता सतावतेयप्रचंड फळगळतीमुळे पीक हाती येईस्तोवर झाडावर संत्रा टिकणार की नाही, या विवंचनेत संत्राउत्पादक शेतकरी सापडला आहे. तालुक्यातील संत्रातोड करण्यासाठी पितृपक्ष संपताच शुभारंभ होतो. याकरिता दिल्ली, केरळ, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, गोवा येथून मोठमोठे खरेदीदार येतात. अनेक संत्राबागांतील संत्रा खरेदी - विक्री व्यवहार सुरू झाले आहे. मात्र, यावर्षी निसर्गाने संत्रा पिकावर वक्रदृष्टी दाखवल्यामुळे संत्राफळांची गळती वाढली आहे. नेमके यामुळेच संत्र्याचे सौदे घेण्याकरिता व्यापारी मागेपुढे पाहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

टॅग्स :agricultureशेती