शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जुळ्या शहरात पावसाळापूर्व नियोजनाचे तीनतेरा

By admin | Updated: June 2, 2016 01:49 IST

पावसाळा सुरू होण्यास अवघे पाच ते सहा दिवस शिल्लक असताना जुळ्या शहराच्या स्वच्छतेचे नियोजन पुरते कोलमडले आहे.

पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष : नदी-नाल्यांची साफसफाई नाहीसुनील देशपांडे अचलपूरपावसाळा सुरू होण्यास अवघे पाच ते सहा दिवस शिल्लक असताना जुळ्या शहराच्या स्वच्छतेचे नियोजन पुरते कोलमडले आहे. पालिकेकडून नदी-नाल्यांची स्वच्छता करणे तर सोडाच अद्याप रस्त्याच्या कडेला पडलेले कचऱ्याचे व खताचे ढिगारेदेखील उचलण्यात आलेले नाही. सापन व बिच्छन नदीची साफसफाई पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे असते. मात्र, या सर्वच बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने संकट उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात कचरा व घाण कुजून त्यातून रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी जुळ्या शहरातील काही भागात नाले काढण्यात आले आहेत. त्यांची वर्षातून एकदा सफाई करणे आवश्यक असते. वर्षभर या नाल्यांमध्ये गाळ साचतो. या गाळावर वनस्पती उगवतात. काही दिवसांनी नाल्याचे संपूर्ण पात्रच वनस्पतींनी व्यापून जाते. अचलपूर शहरातील माळवेशपुरा, सिटी हायस्कूल, विदर्भ मिल कॉलनी तर परतवाडा येथे लाकूड बाजार परिसरासह असे नाले दृष्टीस पडतात. या उगवलेल्या वनस्पतींमुळे पाणी वाहून नेण्याची नाल्यांची क्षमता अवरूध्द होते. परिणामी पावसाळ्यात नाला ओव्हरफ्लो होतो व नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. यापूर्वीदेखील याच प्रकारामुळे वित्तहानी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नाल्यातील घाण इतस्तत: पसरलेली असल्याने तेथे वराहांचा मुक्त संचार दिसून येतो. डासांचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे. कचरा उचलण्याच्या बाबतीतही पालिकेचे योग्य नियोजन नसल्याने शहरातील रस्त्यांलगत ठिकठिकाणी कचरा व खतांचे ढिग साचले आहेत. हाच कचरा पावसाच्या प्रवाहाने नाल्यांमध्ये पडतो आणि पाणी अडविले जाते.