शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

जुळ्या शहरात पावसाळापूर्व नियोजनाचे तीनतेरा

By admin | Updated: June 2, 2016 01:49 IST

पावसाळा सुरू होण्यास अवघे पाच ते सहा दिवस शिल्लक असताना जुळ्या शहराच्या स्वच्छतेचे नियोजन पुरते कोलमडले आहे.

पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष : नदी-नाल्यांची साफसफाई नाहीसुनील देशपांडे अचलपूरपावसाळा सुरू होण्यास अवघे पाच ते सहा दिवस शिल्लक असताना जुळ्या शहराच्या स्वच्छतेचे नियोजन पुरते कोलमडले आहे. पालिकेकडून नदी-नाल्यांची स्वच्छता करणे तर सोडाच अद्याप रस्त्याच्या कडेला पडलेले कचऱ्याचे व खताचे ढिगारेदेखील उचलण्यात आलेले नाही. सापन व बिच्छन नदीची साफसफाई पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे असते. मात्र, या सर्वच बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने संकट उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात कचरा व घाण कुजून त्यातून रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी जुळ्या शहरातील काही भागात नाले काढण्यात आले आहेत. त्यांची वर्षातून एकदा सफाई करणे आवश्यक असते. वर्षभर या नाल्यांमध्ये गाळ साचतो. या गाळावर वनस्पती उगवतात. काही दिवसांनी नाल्याचे संपूर्ण पात्रच वनस्पतींनी व्यापून जाते. अचलपूर शहरातील माळवेशपुरा, सिटी हायस्कूल, विदर्भ मिल कॉलनी तर परतवाडा येथे लाकूड बाजार परिसरासह असे नाले दृष्टीस पडतात. या उगवलेल्या वनस्पतींमुळे पाणी वाहून नेण्याची नाल्यांची क्षमता अवरूध्द होते. परिणामी पावसाळ्यात नाला ओव्हरफ्लो होतो व नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. यापूर्वीदेखील याच प्रकारामुळे वित्तहानी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नाल्यातील घाण इतस्तत: पसरलेली असल्याने तेथे वराहांचा मुक्त संचार दिसून येतो. डासांचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे. कचरा उचलण्याच्या बाबतीतही पालिकेचे योग्य नियोजन नसल्याने शहरातील रस्त्यांलगत ठिकठिकाणी कचरा व खतांचे ढिग साचले आहेत. हाच कचरा पावसाच्या प्रवाहाने नाल्यांमध्ये पडतो आणि पाणी अडविले जाते.