शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

तर तीन लक्ष टीव्ही संच होणार बंद !

By admin | Updated: July 15, 2015 00:10 IST

केंद्र शासनाच्या निर्णयानुसार महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतील केबल ग्राहकांनी डिजिटायजेशनसाठी वेळीच पावले न उचलल्यास..

शासनाची सक्ती : ३१ डिसेंबर डेडलाईन, ग्रामीण भागात सवलतअमरावती : केंद्र शासनाच्या निर्णयानुसार महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतील केबल ग्राहकांनी डिजिटायजेशनसाठी वेळीच पावले न उचलल्यास ३१ डिसेंबरनंतर तब्बल तीन लक्ष ग्राहकांचे दूरचित्रवाणी संच बंद पडू शकतात.स्थानिक केबल कनेक्शनद्वारे विविध वाहिन्यांची सेवा घेणाऱ्या ग्राहकांची संख्या अमरावती महापालिका हद्दीत सुमारे एक लक्ष आणि पालिका क्षेत्रात सुमारे दोन लक्ष इतकी व्यापक आहे. केंद्र शासनाने डिजिटायजेशन सक्तीचे केले आहे. काय आहे डिजिटायजेशन?जे ग्राहक आतापर्यंत केबलद्वारे विविध वाहिन्यांची सेवा घेत आहेत, त्यांना आता सेट टॉप बॉक्स लावून घेणे गरजेचे आहे. ही डिजिटल प्रणाली असल्यामुळे त्याला डिजिटायजेशन असे संबोधण्यात येते.ग्राहकांकडून वसूल होणारा करमणूक कर हा शासन दरबारी पूर्णपणे गोळा होत नव्हता. मात्र डिजिटायजेशन झाल्यास यामध्ये पारदर्शकता येईल. - सुरेश बगळे, तहसीलदार, अमरावती.कुणाला काय लाभ?टीव्हीसंबंधीच्या मनोरंजन सेवेचे देशभरात डिजिटायजेशन झाल्यास विविध आवश्यक कार्यांसाठी इंटरनेट सर्व्हिसेसची जादा डिजिटल स्पेस शासनाला उपलब्ध होईल. त्याचा उपयोग उपग्रहाशी संबंधित अत्यावश्यक सेवांसाठी करता येईल. या सेवेमुळे ग्राहकला पूर्वीच्याच बजेटमध्ये अतिसुस्पष्ट चित्र बघता येईल. पूर्वी केबलद्वारे केवळ ९० चॅनेल्स बघण्याची सोय असलेल्यांना डिजिटायजेशनमुळे तब्बल १००० चॅनेल्स बघता येतील. ढगाळ वातावरण वा अतिपावसातही सेवा खंडित होणार नाही. या डिजिटायजेशनचा अविभाज्य घटक असलेल्या सेट टॉप बॉक्ससाठी सुरुवातीला दीड ते दोन हजार रुपयांचा खर्च येऊ शकतो.