शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

तीन लाख विद्यार्थ्यांचा होणार स्वमूल्यांकन अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:23 IST

कार्पोरेट कंपन्यांमधील अधिकारी, कर्मचाºयांप्रमाणेच आता जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते नववीतील एकूण ३ लाख ७९ हजार ३६४ विद्यार्थ्यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कार्पोरेट कंपन्यांमधील अधिकारी, कर्मचाºयांप्रमाणेच आता जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते नववीतील एकूण ३ लाख ७९ हजार ३६४ विद्यार्थ्यांचा स्वमूल्यांकन अहवाल (केआरए) लवकरच तयार होणार आहे. विशेष म्हणजे हा ‘केआरए’ आॅनलाईन दिसणार असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती लक्षात घेऊन ठोस कार्यक्रम पुढील काळात राबविला जाणार आहे.शालेय विद्यार्थ्याने त्याच्या वयानुसार मुलभूतक्षमता प्राप्त केली आहे किंवा नाही, याची तपासणी विविध शैक्षणिक प्रगती चाचण्यांद्वारे केली जाणार आहे.पायाभूत चाचणी हा त्याचाच एक भाग आहे. शिक्षण विभागाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व माध्यम मिळून २ हजार ८५२ शाळांमध्ये ७ सप्टेंबरपासून याचा श्रीगणेशा झाला. पहिल्या दिवशी प्रथम भाषा मराठी, शुक्रवारी गणिताची चाचणी पार पडली त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी इंग्रजी तर मंगळवार १२ सप्टेंबर रोजी विज्ञान विषयाची चाचणी होणार आहे. जिल्ह्यातील मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये ही चाचणी बंधनकारक आहे. लेखी व तोंडी चाचणी घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण संकेतस्थळावर भरले जातील. त्यासाठी चार दिवसांची मुदत आहे. शाळास्तरावर आणि नंतर तालुका व अन्य पथकांच्या माध्यमातून मुलांची फेरतपासणी केली जाईल. शाळा, तालुका आणि जिल्हास्तरीय पथक स्वतंत्ररीत्या विद्यार्थ्यांचे गुण संकेतस्थळावर भरणार आहेत. परिणामी एका विद्यार्थ्याची पायाभूत चाचणी, शैक्षणिक प्रगती, तोंडी चाचणीबाबतचे विद्यार्थी व शिक्षकांचेही अभिप्राय नोंदविले जाणार आहेत. जिल्ह्यात एकाचवेळी पायाभूत चाचणी घेण्यात येत आहे.लेखी परीक्षेसाठी वर्गानुसार गुण आहेत. मात्र तोंडी परीक्षेत सर्वांना १० गुण आहेत. जिल्हा शिक्षण विभागाने स्वतंत्र पथक तयार केले आहे. शाळांना भेटी देऊन त्यांनीही त्यांचा अहवाल १३ सप्टेंबरपर्यंत सादर करावा, असे शिक्षण विभागाचे आदेश आहेत. या अहवालात शाळेची इत्यंभूत माहिती द्यावी लागणार आहे.विद्यार्थ्यांचे गुणही ‘अ‍ॅप’वर कृती कार्यक्रम सोयीचा होणारशालेय विद्यार्थ्यांचे प्रश्ननिहाय गुणांच्या नोंदणीसाठी शासनाने स्वतंत्र ‘अ‍ॅप’ विकसित केले आहे. त्यावर आॅनलाईन किंवा आॅफलाईन पद्धतीने गुणांची नोंदणी शिक्षकांना करता येणार आहे. अशी नोंद केल्यानंतर निकाल लगेच विद्यार्थ्यांना कळेल. यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती कळणार असून त्यामुळे कृती कार्यक्रम सोपा होईल.तफावत आढळल्यास कारवाईशिक्षक, केंद्रप्रमुख जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पथकाच्या तपासणीत २० टक्क्यांपेक्षा अधिक तफावत आढळल्यास संबंधित शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे.