शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

तीन लाख विद्यार्थ्यांचा होणार स्वमूल्यांकन अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:23 IST

कार्पोरेट कंपन्यांमधील अधिकारी, कर्मचाºयांप्रमाणेच आता जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते नववीतील एकूण ३ लाख ७९ हजार ३६४ विद्यार्थ्यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कार्पोरेट कंपन्यांमधील अधिकारी, कर्मचाºयांप्रमाणेच आता जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते नववीतील एकूण ३ लाख ७९ हजार ३६४ विद्यार्थ्यांचा स्वमूल्यांकन अहवाल (केआरए) लवकरच तयार होणार आहे. विशेष म्हणजे हा ‘केआरए’ आॅनलाईन दिसणार असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती लक्षात घेऊन ठोस कार्यक्रम पुढील काळात राबविला जाणार आहे.शालेय विद्यार्थ्याने त्याच्या वयानुसार मुलभूतक्षमता प्राप्त केली आहे किंवा नाही, याची तपासणी विविध शैक्षणिक प्रगती चाचण्यांद्वारे केली जाणार आहे.पायाभूत चाचणी हा त्याचाच एक भाग आहे. शिक्षण विभागाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व माध्यम मिळून २ हजार ८५२ शाळांमध्ये ७ सप्टेंबरपासून याचा श्रीगणेशा झाला. पहिल्या दिवशी प्रथम भाषा मराठी, शुक्रवारी गणिताची चाचणी पार पडली त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी इंग्रजी तर मंगळवार १२ सप्टेंबर रोजी विज्ञान विषयाची चाचणी होणार आहे. जिल्ह्यातील मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये ही चाचणी बंधनकारक आहे. लेखी व तोंडी चाचणी घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण संकेतस्थळावर भरले जातील. त्यासाठी चार दिवसांची मुदत आहे. शाळास्तरावर आणि नंतर तालुका व अन्य पथकांच्या माध्यमातून मुलांची फेरतपासणी केली जाईल. शाळा, तालुका आणि जिल्हास्तरीय पथक स्वतंत्ररीत्या विद्यार्थ्यांचे गुण संकेतस्थळावर भरणार आहेत. परिणामी एका विद्यार्थ्याची पायाभूत चाचणी, शैक्षणिक प्रगती, तोंडी चाचणीबाबतचे विद्यार्थी व शिक्षकांचेही अभिप्राय नोंदविले जाणार आहेत. जिल्ह्यात एकाचवेळी पायाभूत चाचणी घेण्यात येत आहे.लेखी परीक्षेसाठी वर्गानुसार गुण आहेत. मात्र तोंडी परीक्षेत सर्वांना १० गुण आहेत. जिल्हा शिक्षण विभागाने स्वतंत्र पथक तयार केले आहे. शाळांना भेटी देऊन त्यांनीही त्यांचा अहवाल १३ सप्टेंबरपर्यंत सादर करावा, असे शिक्षण विभागाचे आदेश आहेत. या अहवालात शाळेची इत्यंभूत माहिती द्यावी लागणार आहे.विद्यार्थ्यांचे गुणही ‘अ‍ॅप’वर कृती कार्यक्रम सोयीचा होणारशालेय विद्यार्थ्यांचे प्रश्ननिहाय गुणांच्या नोंदणीसाठी शासनाने स्वतंत्र ‘अ‍ॅप’ विकसित केले आहे. त्यावर आॅनलाईन किंवा आॅफलाईन पद्धतीने गुणांची नोंदणी शिक्षकांना करता येणार आहे. अशी नोंद केल्यानंतर निकाल लगेच विद्यार्थ्यांना कळेल. यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती कळणार असून त्यामुळे कृती कार्यक्रम सोपा होईल.तफावत आढळल्यास कारवाईशिक्षक, केंद्रप्रमुख जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पथकाच्या तपासणीत २० टक्क्यांपेक्षा अधिक तफावत आढळल्यास संबंधित शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे.