शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पश्चिम विदर्भात अतिवृष्टीने तिघांचा मृत्यू, ९,९१४ हेक्टरमध्ये नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST

अमरावती : पश्चिम विदर्भात ४८ तासात झालेल्या मुसळधार पावसाने १९ तालुके बाधित झाले. या आपत्तीत तिघांचा मृत्यू झाला, तर ...

अमरावती : पश्चिम विदर्भात ४८ तासात झालेल्या मुसळधार पावसाने १९ तालुके बाधित झाले. या आपत्तीत तिघांचा मृत्यू झाला, तर २,२९७ घरांची पडझड झालेली आहे. याशिवाय ९,९१४ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.

विभागात गुरुवारी सरासरी ४२ मिमी व शुक्रवारी १७ मिमी पावसाची नोंद झाली. यात संपूर्ण अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यात दोन तालुके बाधित झाले. यामध्ये ४६ घरांची पडझड झाली, तर २६३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. वाशिम जिल्ह्यात सहा तालुके बाधित झाली, यामध्ये १४ घरांचे अंशत: नुकसान व २,६७१ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे.

अकोला जिल्ह्यात पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली. २,२३७ घरांचे नुकसान तर ६,२०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. बुलडाणा जिल्ह्यात नुकसान निरंक आहे. यवतमाळ जिल्ह्यात २१ जुलैला पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. यात ४० घरांची पडझड व ७८० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. याशिवाय २२ ला पावसामुळे चार घरांची पडझड झालेली आहे.

बॉक्स

भिंत पडून एकाचा मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यात घराची भिंत अंगावर कोसळल्याने देऊळगावनगर येथील ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. याशिवाय भिंगारा बीटमध्ये ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला. सारा येथील एका शेतातील पोलमध्ये वीज प्रवाह संचारल्याने दोन बैल दगावले व सोनार गव्हाण येथे आग लागल्याने दोन गायी दगावल्या. अकोला जिल्ह्यात अकोट येथे ४५ वर्षीय व्यक्ती पठार नदीच्या पुरात वाहून गेला.