मोर्शी : मंगळवारी संध्याकाळपासून वाढलेला पावसाचा जोर. शाळेची वेळ संपून कित्येक तास उलटून गेल्यावरही रात्रीपर्यंत शाळकरी मुले घरी पोहोचलीच नाहीत, बसस्थानकावर लावलेला फोन उचलला जात नाही, पालकांची घालमेल वाढत चाललेली. उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. शेवटी प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रात्री पावणेनऊच्या सुमारास विद्यार्थी आपापल्या घरी पोहोचले आणि पालकांचा जीव भांड्यात पडला. मोर्शी तालुक्यात मंगळवारी हा प्रकार घडला. तालुक्यातील गोराळा, सावरखेड, लेहगाव, निंभी, शिरखेड या अमरावती मार्गावर दुपारी ४ वाजतापासून कोणतीच बस धावली नसल्याने विद्यार्थ्यांना ताटकळावे लागल्याची बाब उघडकीस आली आणि पालकांचा एसटी महामंडळाविरूध्दचा संताप अधिकच अनावर झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोर्शी शहरातील शाळांमध्ये शिक्षण घेताहेत. पालकांनी त्यांना एसटीच्या पासेस काढून दिल्या आहेत. करतात. आगार व्यवस्थापकाचे पद रिक्त राज्य परीवहन महामंडळाचे येथील आगार व्यवस्थापक जयकुमार इंगोले यांनी वाहकांच्या खाबुुगिरीला लगाम लावल्यामुळे चिडलेल्या दोन संघटनांनी त्यांना हटविण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. थेट मुंबईहून राजकीय दडपण आल्यामुळे शेवटी आगार व्यवस्थापकांची येथून बदली करण्यात आली. त्यामुळे आगार व्यवस्थापकाचे येथील पद रिक्त आहे. जबाबदार अधिकाऱ्याविना येथील व्यवस्थापन बारगळले आहे. महसूल प्रशासनाची तयारी ! एसडीओ वऱ्हाडे यांनी बसस्थानक गाठण्यापूर्वीच एसटी बस विद्यार्थ्यांना घेऊन अमरावती मार्गाने निघून गेली होती. परंतु बस पोहोचली नसती तर विद्यार्थ्यांना महसूल प्रशासनाच्या वाहनातून त्यांच्या गावी पोहोचवून देण्याची तयारी एसडीओ वऱ्हाडे यांनी केली होती.
तीन तास ताटकळले शाळकरी विद्यार्थी!
By admin | Updated: August 13, 2015 00:52 IST