शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

तीन फुटाखालून वितरण वाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:27 IST

उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी अधिकतम वापर हे शासनाचे धोरण आहे. कालव्याचे पाणी वहन व वितरण ही खर्चीक प्रणाली असल्याने आता जमिनीच्या १.२ मीटर खोलीवरून नलिका टाकण्यात येणार आहे. यादरम्यान शेतात उभे पीक असल्यास नुकसान झालेल्या क्षेत्राची भरपार्ई शेतकऱ्यांना मिळणार आहे.

ठळक मुद्देसिंचनाची कार्यक्षमता वाढली : नलिका वितरणासाठी मिळणार भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी अधिकतम वापर हे शासनाचे धोरण आहे. कालव्याचे पाणी वहन व वितरण ही खर्चीक प्रणाली असल्याने आता जमिनीच्या १.२ मीटर खोलीवरून नलिका टाकण्यात येणार आहे. यादरम्यान शेतात उभे पीक असल्यास नुकसान झालेल्या क्षेत्राची भरपार्ई शेतकऱ्यांना मिळणार आहे.सध्या वाढते नागरिकरण व औद्योगिकीकरणामुळे बिगर सिंचनासाठी पाण्याचा वापर वाढला आहे. साहजिकच पाण्यात घट झाल्याने सिंचनासाठी पाणी कमी मिळू लागले आहे व भविष्यातही ही तूट वाढणारच आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा अधिकतम वापर करून सिंचनक्षेत्र वाढ करण्यासाठी नलिका वितरण प्रणाली उपयुक्त पर्याय ठरणार आहे. शेतकऱ्यांचा यामध्ये रोष ओढवू नये, यासाठी ज्या शेतामधून नलिका वाहिनी जाणार आहे, त्या शेतामध्ये जर उभे पीक असेल, त्याचे मूल्यांकन संबंधित विभागाकडून केले जाऊन शेतकºयांना पिकाची भरपाई मिळणार आहे. शेतकºयाची जरी स्वमालकीची जमीन असली तरी जमिनीच्या १.२ मीटर खोलीवरून नलिका वाहिनी टाकण्याचे अधिकार प्रशासनाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.प्रचलित कालवे वितरण प्रणालीमध्ये कालवे, लघुकालवे, शेतचरी आदीसाठी जमिनीची पातळी पाहून कामे होतात. यामुळे काही शेतकऱ्यांची जमीन यामध्ये अधिक अधिग्रहीत होते. यामुळे कालवे शेतातून न नेता बांधावरून न्यावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांना विरोध होतो. तो योग्यही असतो. अनेकदा यामुळे वर्षानुवर्षे कामेदेखील रेंगाळत असल्याने उद्दिष्टपूर्ती होत नसल्याचे वास्तव आहे.जून २०१९ पर्यंत ११,११९ हेक्टरचे साध्यजलसंपदा विभागाकडून नलिका वितरणाद्वारे जून २०१९ पर्यंत ११ हजार ११९ हेक्टरचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत १,३८७ हेक्टर, पाक नदी ८३३, चांदस वाठोडा १,४८९, गुरुकुंज उपसा १०००, टाकली कलान ७७८, पंढरी ३००, करजगाव १,०१९, बेंबळा २,५४१, दहेगाव ४४९, पाचपहूर ४,३१३ हेक्टरचा समावेश आहे. यासाठी २३,८२५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. जुलै २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत ५,६९३ हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे. मार्च २०१९ पर्यंत ५,४२६ हेक्टर क्षेत्र अपेक्षित साध्य आहे.