शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

तीन फुटाखालून वितरण वाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:27 IST

उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी अधिकतम वापर हे शासनाचे धोरण आहे. कालव्याचे पाणी वहन व वितरण ही खर्चीक प्रणाली असल्याने आता जमिनीच्या १.२ मीटर खोलीवरून नलिका टाकण्यात येणार आहे. यादरम्यान शेतात उभे पीक असल्यास नुकसान झालेल्या क्षेत्राची भरपार्ई शेतकऱ्यांना मिळणार आहे.

ठळक मुद्देसिंचनाची कार्यक्षमता वाढली : नलिका वितरणासाठी मिळणार भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी अधिकतम वापर हे शासनाचे धोरण आहे. कालव्याचे पाणी वहन व वितरण ही खर्चीक प्रणाली असल्याने आता जमिनीच्या १.२ मीटर खोलीवरून नलिका टाकण्यात येणार आहे. यादरम्यान शेतात उभे पीक असल्यास नुकसान झालेल्या क्षेत्राची भरपार्ई शेतकऱ्यांना मिळणार आहे.सध्या वाढते नागरिकरण व औद्योगिकीकरणामुळे बिगर सिंचनासाठी पाण्याचा वापर वाढला आहे. साहजिकच पाण्यात घट झाल्याने सिंचनासाठी पाणी कमी मिळू लागले आहे व भविष्यातही ही तूट वाढणारच आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा अधिकतम वापर करून सिंचनक्षेत्र वाढ करण्यासाठी नलिका वितरण प्रणाली उपयुक्त पर्याय ठरणार आहे. शेतकऱ्यांचा यामध्ये रोष ओढवू नये, यासाठी ज्या शेतामधून नलिका वाहिनी जाणार आहे, त्या शेतामध्ये जर उभे पीक असेल, त्याचे मूल्यांकन संबंधित विभागाकडून केले जाऊन शेतकºयांना पिकाची भरपाई मिळणार आहे. शेतकºयाची जरी स्वमालकीची जमीन असली तरी जमिनीच्या १.२ मीटर खोलीवरून नलिका वाहिनी टाकण्याचे अधिकार प्रशासनाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.प्रचलित कालवे वितरण प्रणालीमध्ये कालवे, लघुकालवे, शेतचरी आदीसाठी जमिनीची पातळी पाहून कामे होतात. यामुळे काही शेतकऱ्यांची जमीन यामध्ये अधिक अधिग्रहीत होते. यामुळे कालवे शेतातून न नेता बांधावरून न्यावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांना विरोध होतो. तो योग्यही असतो. अनेकदा यामुळे वर्षानुवर्षे कामेदेखील रेंगाळत असल्याने उद्दिष्टपूर्ती होत नसल्याचे वास्तव आहे.जून २०१९ पर्यंत ११,११९ हेक्टरचे साध्यजलसंपदा विभागाकडून नलिका वितरणाद्वारे जून २०१९ पर्यंत ११ हजार ११९ हेक्टरचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत १,३८७ हेक्टर, पाक नदी ८३३, चांदस वाठोडा १,४८९, गुरुकुंज उपसा १०००, टाकली कलान ७७८, पंढरी ३००, करजगाव १,०१९, बेंबळा २,५४१, दहेगाव ४४९, पाचपहूर ४,३१३ हेक्टरचा समावेश आहे. यासाठी २३,८२५ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. जुलै २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत ५,६९३ हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे. मार्च २०१९ पर्यंत ५,४२६ हेक्टर क्षेत्र अपेक्षित साध्य आहे.