शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

तीन दिवसांपासून चार हजार घरे अंधारात

By admin | Updated: July 26, 2014 01:08 IST

तीन दिवसांच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील हजारो घरांतील

पावसाचा कहर : विद्युत विभागाचा भोंगळ कारभारवैभव बाबरेकर अमरावतीतीन दिवसांच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील हजारो घरांतील विद्युत पुरवठा खंडित होऊन वीज वितरण कंपनीच्या ढिसाळघाई कारभारामुळे वीज ग्राहकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. तीन दिवसांमध्ये एकट्या अमरावती शहरात चार हजारांवर तक्रारी विद्युत विभागाला प्राप्त झाल्या. परंतु या तक्रारींचा निपटारा करण्यात नियोजन शून्य विद्युत विभागाला तीन दिवसांंनंतरही यश मिळाले नाही. अद्यापही अर्ध्याअधिक तक्रारींचा खच वीज तक्रार निवारण केंद्रात पडून आहेत. वादळी पावसाने जिल्हाभरात अनेक ठिकाणी घरे व झाडे कोसळली. त्याचबरोबर विद्युत तारा व खांबसुद्धा तुटल्याने काही भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे हजारो कुटुंबीय अंधारात आहेत. आता पाऊस ओसरल्याने वीज कंपनीने तुटलेले विद्युत खांब व तारा दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मुख्य लाईन दुरुस्तीचे काम कत्रांटदारामार्फत केले जात आहे. मात्र मुख्य लाईनचा वीजपुरवठा सुरु झाला तरीसुध्दा हजारो नागरिकांच्या घरातील वीजपुरवठा अजूनही बंद आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष नाहीपावसाळ्यात वादळाने दरवर्षी मोठे नुकसान कंपनीला सहन करावे लागते. पावसाळ्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही कार्यप्रणाली कंपनीकडून राबविण्यात आली नाही. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या अडचणींना नागरिकांनाच तोंड द्यावे लागत आहे. बालक व रुग्णांचे हालशहरातील हजारो घरांतील विद्युत प्रवाह खंडीत असल्यामुळे सर्वाधिक त्रास बालक व वयोवृध्द रुग्णांना होत आहे. डासांमुळे लहान बालकांसह घरातील मंडळी हैराण झाली आहे. काही ठिकाणी आॅक्सिजनवर रुग्ण आहेत तर काही ठिकाणी वृध्द आजारी अवस्थेत आहेत. त्यांना खंडीत विजेचा सामना करावा लागत आहे.तक्रारीचे पाने फाडल्याचा आरोपवीज तक्रार निवारण केंद्राकडे तक्रारीचा खच झाल्याने नोंद वहीतील पानेच कर्मचाऱ्याने फाडल्याचे प्रकार झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील एका केंद्रावर तक्रार केलेल्या नागरिकांच्या तक्रारीची नोंद नसल्याचे सांगण्यात आले.प्रत्येक तक्रार निवारण कें द्रात २०० च्या वर तक्रारीजिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे चार विभागीय कार्यालये असून त्यापैकी १ शहरात व ३ ग्रामीण भागात आहेत. या कार्यालयांतर्गत २३ सबडिव्हीजन असून त्यापैकी ३ शहर व अन्य ग्रामीण भागात आहेत. शहरात १९ तक्रार निवारण केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रात सुमारे दोनशेच्या वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील अर्ध्याही तक्रारींचा निपटारा करण्यात विद्युत विभागाला यश मिळाले नाही.