शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूला तीन दिवसांपासून ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 05:00 IST

जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबळीची नोंद ४ एप्रिल रोजी झाली. त्यानंतरच्या आठ महिन्यांत तब्बल ३६४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू जिल्ह्यात झाला. ही टक्केवारी २.२० अशी आहे. सुरुवातीच्या काळात हॉटस्पॉट ठरलेल्या भागात एप्रिल महिन्यात संक्रमितांच्या सर्वाधिक ह्यहोमडेथह्ण झाल्या. त्यावेळी जिल्ह्याचा मृत्युदर हा आठ टक्क्यांवर पोहोचला होता. कोरोना आजाराविषयी गैरसमज व अंगावर दुखणे काढणे यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले होते.

ठळक मुद्देसप्टेंबर ७५६०, ऑक्टोबरमध्ये २७४५ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील कोरोना संसर्गाचा उद्रेक महिनाभरापासून कमी झाला असताना, आता पहिल्यांदा मृत्युसंख्येलाही ब्रेक लागला आहे. सलग तीन दिवसांत कोरोनाने एकाही मृत्यूची वार्ता नसल्याने जिल्ह्याला कमालीचा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबळीची नोंद ४ एप्रिल रोजी झाली. त्यानंतरच्या आठ महिन्यांत तब्बल ३६४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू जिल्ह्यात झाला. ही टक्केवारी २.२० अशी आहे. सुरुवातीच्या काळात हॉटस्पॉट ठरलेल्या भागात एप्रिल महिन्यात संक्रमितांच्या सर्वाधिक ह्यहोमडेथह्ण झाल्या. त्यावेळी जिल्ह्याचा मृत्युदर हा आठ टक्क्यांवर पोहोचला होता. कोरोना आजाराविषयी गैरसमज व अंगावर दुखणे काढणे यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले होते. मात्र, त्यानंतर आरोग्य विभागाचे सर्वेक्षण व उपाययोजनांतील सातत्याने मृत्युदर नियंत्रणात आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले.कोरोना संसर्गाचा सर्वाधिक विस्फोट हा सप्टेंबर महिन्यात झाला. या एका महिन्यात ७५६९ रुग्णांची नोंद झाली व १५२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात प्रोटोकॉलनुसार नमुने घेण्यास सुरुवात झाल्यानंतर चाचण्याही कमी झाल्यात आणि मृत्युसंख्याही कमी झाली. मात्र, रोज कोरोनाग्रस्तांचे मृत्यू होत आहेत. आता ३० ऑक्टोबरपासून मृत्यूला ब्रेक लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.दरम्म्यान, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार मंगळवारी तळवेल येथील ५७ वर्षीय रुग्णाचे उपचारादरम्यान निधन झाले.सप्टेंबर ७५६०, ऑक्टोबरमध्ये २७४५ रुग्णकोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर सर्वाधिक ७५६० रुग्ण सप्टेंबर महिन्यात निष्पन्न झालेत, या महिन्यात दैनंदिन रुग्ण सरासरी २५५ अशी होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात २७४५ रुग्णांची नोंद झाली. या महिन्यात रोजची सरासरी ८८.५४ अशी राहिलेली आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेटदेखील उच्चांकी ९४.२० टक्क्यांवर पोहोचला आहे. २ नोव्हेंबरपर्यंत १५,४१४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. डबलिंगचा रेट हा २३४ दिवसांवर गेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या