शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

लग्न समारंभातील मिरवणुकीतून तीन बालकामगारांची सुटका

By admin | Updated: April 19, 2017 00:09 IST

लग्न समारंभातील मिरवणुकीत लाईटिंग हाती घेणाऱ्या ३ बाल कामगारांची सुटका करण्यात आली.

लाईटिंग कंत्राटदाराविरुद्ध कारवाई : रुद्रेश मंगल कार्यालयासमोरील घटनाअमरावती : लग्न समारंभातील मिरवणुकीत लाईटिंग हाती घेणाऱ्या ३ बाल कामगारांची सुटका करण्यात आली. सरकारी कामगार अधिकारी, चाईल्ड लाईन व राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प अधिकाऱ्यांनी सोमवारी नवाथेनगरस्थित रुदे्रश मंगल कार्यालय ते रंगोली हॉटेलदरम्यान ही कारवाई केली. या कारवाईत जय बालाजी लाईटिंग अ‍ॅन्ड रथचे संचालक सुभाष साहू यांना राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तिन्ही मुलांना बाल निरीक्षण गृहात पाठविण्यात आले आहे. १४ वर्षांखालील बालकांकडून कुठल्याही श्रेत्रात काम करून घेण्यास शासनाने प्रतिबंध लावला आहे. मात्र, शहरात अजूनही अनेक व्यापारी फायद्यासाठी बाल कामगारांचा वापर करीत आहेत. सोमवारी रुद्रेश मंगल कार्यालयातील लग्न समारंभाच्या मिरवणुकीत नवरदेव रथावर बसलेले होते. त्याच्यासमोर डीजेच्या तालावर वऱ्हाड नाचत मारोतीवर जात होते. याच मिरवणुकीत तीन बालकामगाराच्या हातात लाईटिंगच्या छत्र्या आढळल्या. याची माहिती चाईल्ड लाईनला मिळताच त्यांनी सरकारी कामगार अधिकारी डी.बी.जाधव यांना कळविले. त्यानुसार जाधव यांच्यासह राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाचे संचालक प्रविण येवतीकर, प्रकल्प व्यवस्थापक पंकज देशमुख, चाईल्ड लाईनचे अजय देशमुख व राजापेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तिन्ही बालकामगारांची चौकशी केली. ते १४ वर्षांच्या आतील असल्याचे कळले तसेच ते बालकामगार साहू यांच्याकडे १०० रुपये रोजंदारीने ठेवल्याचे निदर्शनास आले. तेथून तीन्ही बालकामगारांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधिन करण्यात आल्याची माहिती डी.बी.जाधव यांनी दिली. याप्रकरणात साहू यांच्याविरुद्ध अधिनियम २०१६ ची कलम ३ चा भंग झाल्याची कारवाई करण्यात आली.२० हजारांचा दंड, दोन वर्षांची शिक्षा१४ वर्षांआतील मुलांकडून कुठल्याही क्षेत्रात काम करून घेण्यास प्रतिबंध आहे. असे आढळून आल्यास बाल कामगार अधिनियम १९८६, सुधारणा अधिनियम २०१६ ची कलम ३ चा भंग होतो. ही बाब सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीला २० हजारांचा दंड व दोन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बालकामगार ठेवणे हे कायद्याने गुन्हा असून याकडे नागरिकांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी डी.बी.जाधव यांनी केले.