शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी हत्याकांडात ३६ आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : शहरात सोमवारी घडलेल्या घटनेनंतर दाखल दोन गुन्ह्यांत एकूण ३६ आरोपींना अटक करण्यात आली. आर्म्स ...

ठळक मुद्देआर्म्स अ‍ॅक्ट, दगडफेकीचे स्वतंत्र गुन्हे दाखल : अफवा पसरविणारे ताब्यात, पाचशे पोलीस तैनात, आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरात सोमवारी घडलेल्या घटनेनंतर दाखल दोन गुन्ह्यांत एकूण ३६ आरोपींना अटक करण्यात आली. आर्म्स अ‍ॅक्ट आणि दगडफेकीचे स्वतंत्र गुन्हे काही जणांवर दाखल केले आहेत. त्यांची ७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविली असून, २५ जणांची तुरुंगात रवानगी झाली आहेत. बुधवारी दुपारी तीन तासांकरिता संचारबंदी शिथिल करण्यात आली. मात्र, गुरुवारचा आठवडी बाजार भरणार नाही, असे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढले.शहरात मंगळवारी सायंकाळी ७ वाजतापासून जिल्ह्याबाहेरही अफवांचा बाजार पसरला होता. भीतीपोटी पोलीस ठाण्यालाही अनेकांनी फोन केलेत. यातच पोलिसांनी आरोपींना पकडण्याकरिता कोम्बिंग आॅपरेशन राबविले. पोलीस सुरक्षा अधिक कडक करण्यात आली. यादरम्यान अफवा पसरविणाऱ्यांसह अन्य प्रकारात ३० ते ४० जणांना मंगळवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना परतवाडा पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. मंगळवारी रात्री राबविलेल्या कोम्बिंग आॅपरेशनदरम्यान खुद्द विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे परतवाडा पोलीस ठाण्यात बसून होते. जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी रात्रभर शहरात पोलिसांचे नेतृत्व सांभाळले. अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्याम घुगे सोबतीला होते.दरम्यान, विभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी शहराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.संचारबंदी शिथिलसंचारबंदी बुधवारी दुपारी ३.३० नंतर तीन तासांकरिता शिथिल करताच शहरातील रस्ते, दुकानांवर नागरिकांनी एकच गर्दी केली. दोन दिवसांपासून ओस पडलेल्या बाजारपेठा, रस्ते गर्दीने गजबजले. दोन दिवसांपासून तणावात असलेले पोलीसही तणावमुक्त झाल्याचे आढळले. पेट्रोल पंप, एटीएम, किराणा दुकान, पीठ गिरणी यावर रांगा लागल्याचे दिसून आले. संचारबंदीपूर्वी जो भाजीपाला बाजारात शिल्लक होता, त्यावर नागरिक तुटून पडले. दोन दिवसांत शहरात नेमके काय घडले, याची माहिती काहींनी जाणून घेतली.ठाणेदारांची बदलीपरतवाड्याचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांची बदली करण्यात आली आहे. नवे ठाणेदार म्हणून सदानंद मानकर रुजू होत आहेत. ते सध्या अकोला येथे कार्यरत आहेत. शहरात उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने त्यांना अकोल्यावरून परतवाड्यात बोलावण्यात आले.शहर शांत ठेवूया; बच्चू कडू यांचे आवाहनआपण सारे मिळून शहर शांत ठेवूया. शहरात कायदा सुव्यवस्था कायम राहील, याकरिता सर्वांनी आपापल्या परीने भूमिका वठवू या, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी जुळ्या शहरातील नागरिकांना केले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याकरिता करण्यात आलेले रॅलीचे नियोजन रद्द करुन रक्तदानाद्वारे उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय आमदार बच्चू कडू यांनी घेतला आहे.विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणीलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी बुधवारी अचलपूर येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अब्दागिरे यावेळी उपस्थित होते. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अशी कुठलीही अफवा निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना ०७२२३ - २२०००२ किंवा ०७२१ - २२६५०४१ या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दागिरे यांनी केले आहे.दरम्यान, शहरात शांतता राखण्याचे आवाहन मराठी पत्रकार संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, जेसीआय, सराफा असोसिएशन, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ हेल्पलाईन, मुव्हमेंट आॅफ पीस अँड जस्टिस, संकल्प सेवा समिती, भूमी बहुउद्देशीय मंडळ, पुनर्जीवन फाऊंडेशन यांसह विविध संस्था- संघटनांनी केले आहे.२७० पोलीस कर्मचारी, ३४ अधिकाऱ्यांसह राज्य राखीव पोलीस दलाचे १९० कर्मचारी व सात अधिकारी परतवाडा शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. शहरातील संचारबंदी व कलम १४४ मुळे या तैनात पोलीस कर्मचारी पहाटेच्या चहा, नास्त्यापासून तर दुपारी व सायंकाळच्या जेवणापासूनही वंचित राहिलेत. यातील काहींना ४८ तासांत झोपदेखील घेता आली नाहीत.

टॅग्स :Murderखून