शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

तिहेरी हत्याकांडात ३६ आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : शहरात सोमवारी घडलेल्या घटनेनंतर दाखल दोन गुन्ह्यांत एकूण ३६ आरोपींना अटक करण्यात आली. आर्म्स ...

ठळक मुद्देआर्म्स अ‍ॅक्ट, दगडफेकीचे स्वतंत्र गुन्हे दाखल : अफवा पसरविणारे ताब्यात, पाचशे पोलीस तैनात, आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरात सोमवारी घडलेल्या घटनेनंतर दाखल दोन गुन्ह्यांत एकूण ३६ आरोपींना अटक करण्यात आली. आर्म्स अ‍ॅक्ट आणि दगडफेकीचे स्वतंत्र गुन्हे काही जणांवर दाखल केले आहेत. त्यांची ७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविली असून, २५ जणांची तुरुंगात रवानगी झाली आहेत. बुधवारी दुपारी तीन तासांकरिता संचारबंदी शिथिल करण्यात आली. मात्र, गुरुवारचा आठवडी बाजार भरणार नाही, असे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढले.शहरात मंगळवारी सायंकाळी ७ वाजतापासून जिल्ह्याबाहेरही अफवांचा बाजार पसरला होता. भीतीपोटी पोलीस ठाण्यालाही अनेकांनी फोन केलेत. यातच पोलिसांनी आरोपींना पकडण्याकरिता कोम्बिंग आॅपरेशन राबविले. पोलीस सुरक्षा अधिक कडक करण्यात आली. यादरम्यान अफवा पसरविणाऱ्यांसह अन्य प्रकारात ३० ते ४० जणांना मंगळवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना परतवाडा पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. मंगळवारी रात्री राबविलेल्या कोम्बिंग आॅपरेशनदरम्यान खुद्द विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे परतवाडा पोलीस ठाण्यात बसून होते. जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी रात्रभर शहरात पोलिसांचे नेतृत्व सांभाळले. अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्याम घुगे सोबतीला होते.दरम्यान, विभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी शहराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.संचारबंदी शिथिलसंचारबंदी बुधवारी दुपारी ३.३० नंतर तीन तासांकरिता शिथिल करताच शहरातील रस्ते, दुकानांवर नागरिकांनी एकच गर्दी केली. दोन दिवसांपासून ओस पडलेल्या बाजारपेठा, रस्ते गर्दीने गजबजले. दोन दिवसांपासून तणावात असलेले पोलीसही तणावमुक्त झाल्याचे आढळले. पेट्रोल पंप, एटीएम, किराणा दुकान, पीठ गिरणी यावर रांगा लागल्याचे दिसून आले. संचारबंदीपूर्वी जो भाजीपाला बाजारात शिल्लक होता, त्यावर नागरिक तुटून पडले. दोन दिवसांत शहरात नेमके काय घडले, याची माहिती काहींनी जाणून घेतली.ठाणेदारांची बदलीपरतवाड्याचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांची बदली करण्यात आली आहे. नवे ठाणेदार म्हणून सदानंद मानकर रुजू होत आहेत. ते सध्या अकोला येथे कार्यरत आहेत. शहरात उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने त्यांना अकोल्यावरून परतवाड्यात बोलावण्यात आले.शहर शांत ठेवूया; बच्चू कडू यांचे आवाहनआपण सारे मिळून शहर शांत ठेवूया. शहरात कायदा सुव्यवस्था कायम राहील, याकरिता सर्वांनी आपापल्या परीने भूमिका वठवू या, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी जुळ्या शहरातील नागरिकांना केले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याकरिता करण्यात आलेले रॅलीचे नियोजन रद्द करुन रक्तदानाद्वारे उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय आमदार बच्चू कडू यांनी घेतला आहे.विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणीलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी बुधवारी अचलपूर येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अब्दागिरे यावेळी उपस्थित होते. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अशी कुठलीही अफवा निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना ०७२२३ - २२०००२ किंवा ०७२१ - २२६५०४१ या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दागिरे यांनी केले आहे.दरम्यान, शहरात शांतता राखण्याचे आवाहन मराठी पत्रकार संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, जेसीआय, सराफा असोसिएशन, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ हेल्पलाईन, मुव्हमेंट आॅफ पीस अँड जस्टिस, संकल्प सेवा समिती, भूमी बहुउद्देशीय मंडळ, पुनर्जीवन फाऊंडेशन यांसह विविध संस्था- संघटनांनी केले आहे.२७० पोलीस कर्मचारी, ३४ अधिकाऱ्यांसह राज्य राखीव पोलीस दलाचे १९० कर्मचारी व सात अधिकारी परतवाडा शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. शहरातील संचारबंदी व कलम १४४ मुळे या तैनात पोलीस कर्मचारी पहाटेच्या चहा, नास्त्यापासून तर दुपारी व सायंकाळच्या जेवणापासूनही वंचित राहिलेत. यातील काहींना ४८ तासांत झोपदेखील घेता आली नाहीत.

टॅग्स :Murderखून