शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी हत्याकांडात ३६ आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : शहरात सोमवारी घडलेल्या घटनेनंतर दाखल दोन गुन्ह्यांत एकूण ३६ आरोपींना अटक करण्यात आली. आर्म्स ...

ठळक मुद्देआर्म्स अ‍ॅक्ट, दगडफेकीचे स्वतंत्र गुन्हे दाखल : अफवा पसरविणारे ताब्यात, पाचशे पोलीस तैनात, आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरात सोमवारी घडलेल्या घटनेनंतर दाखल दोन गुन्ह्यांत एकूण ३६ आरोपींना अटक करण्यात आली. आर्म्स अ‍ॅक्ट आणि दगडफेकीचे स्वतंत्र गुन्हे काही जणांवर दाखल केले आहेत. त्यांची ७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविली असून, २५ जणांची तुरुंगात रवानगी झाली आहेत. बुधवारी दुपारी तीन तासांकरिता संचारबंदी शिथिल करण्यात आली. मात्र, गुरुवारचा आठवडी बाजार भरणार नाही, असे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढले.शहरात मंगळवारी सायंकाळी ७ वाजतापासून जिल्ह्याबाहेरही अफवांचा बाजार पसरला होता. भीतीपोटी पोलीस ठाण्यालाही अनेकांनी फोन केलेत. यातच पोलिसांनी आरोपींना पकडण्याकरिता कोम्बिंग आॅपरेशन राबविले. पोलीस सुरक्षा अधिक कडक करण्यात आली. यादरम्यान अफवा पसरविणाऱ्यांसह अन्य प्रकारात ३० ते ४० जणांना मंगळवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना परतवाडा पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. मंगळवारी रात्री राबविलेल्या कोम्बिंग आॅपरेशनदरम्यान खुद्द विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे परतवाडा पोलीस ठाण्यात बसून होते. जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी रात्रभर शहरात पोलिसांचे नेतृत्व सांभाळले. अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्याम घुगे सोबतीला होते.दरम्यान, विभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी शहराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.संचारबंदी शिथिलसंचारबंदी बुधवारी दुपारी ३.३० नंतर तीन तासांकरिता शिथिल करताच शहरातील रस्ते, दुकानांवर नागरिकांनी एकच गर्दी केली. दोन दिवसांपासून ओस पडलेल्या बाजारपेठा, रस्ते गर्दीने गजबजले. दोन दिवसांपासून तणावात असलेले पोलीसही तणावमुक्त झाल्याचे आढळले. पेट्रोल पंप, एटीएम, किराणा दुकान, पीठ गिरणी यावर रांगा लागल्याचे दिसून आले. संचारबंदीपूर्वी जो भाजीपाला बाजारात शिल्लक होता, त्यावर नागरिक तुटून पडले. दोन दिवसांत शहरात नेमके काय घडले, याची माहिती काहींनी जाणून घेतली.ठाणेदारांची बदलीपरतवाड्याचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांची बदली करण्यात आली आहे. नवे ठाणेदार म्हणून सदानंद मानकर रुजू होत आहेत. ते सध्या अकोला येथे कार्यरत आहेत. शहरात उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने त्यांना अकोल्यावरून परतवाड्यात बोलावण्यात आले.शहर शांत ठेवूया; बच्चू कडू यांचे आवाहनआपण सारे मिळून शहर शांत ठेवूया. शहरात कायदा सुव्यवस्था कायम राहील, याकरिता सर्वांनी आपापल्या परीने भूमिका वठवू या, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी जुळ्या शहरातील नागरिकांना केले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याकरिता करण्यात आलेले रॅलीचे नियोजन रद्द करुन रक्तदानाद्वारे उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय आमदार बच्चू कडू यांनी घेतला आहे.विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणीलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी बुधवारी अचलपूर येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अब्दागिरे यावेळी उपस्थित होते. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अशी कुठलीही अफवा निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना ०७२२३ - २२०००२ किंवा ०७२१ - २२६५०४१ या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दागिरे यांनी केले आहे.दरम्यान, शहरात शांतता राखण्याचे आवाहन मराठी पत्रकार संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, जेसीआय, सराफा असोसिएशन, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ हेल्पलाईन, मुव्हमेंट आॅफ पीस अँड जस्टिस, संकल्प सेवा समिती, भूमी बहुउद्देशीय मंडळ, पुनर्जीवन फाऊंडेशन यांसह विविध संस्था- संघटनांनी केले आहे.२७० पोलीस कर्मचारी, ३४ अधिकाऱ्यांसह राज्य राखीव पोलीस दलाचे १९० कर्मचारी व सात अधिकारी परतवाडा शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. शहरातील संचारबंदी व कलम १४४ मुळे या तैनात पोलीस कर्मचारी पहाटेच्या चहा, नास्त्यापासून तर दुपारी व सायंकाळच्या जेवणापासूनही वंचित राहिलेत. यातील काहींना ४८ तासांत झोपदेखील घेता आली नाहीत.

टॅग्स :Murderखून