शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
4
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
5
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
6
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
7
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
8
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
9
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
10
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
11
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
12
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
13
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
14
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
15
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
16
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
17
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
18
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
19
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
20
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर

बहुसदस्यीय प्रभागात ‘तू-तू, मै-मै’ चा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 00:09 IST

पुढील वर्षीच्या पूर्वार्धात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाने बहुसदस्यीय प्रभाग प्रणालीला हिरवी झेंडी दिली आहे.

राजकीय तोटा : श्रेयवादाची लढाईअमरावती : पुढील वर्षीच्या पूर्वार्धात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाने बहुसदस्यीय प्रभाग प्रणालीला हिरवी झेंडी दिली आहे. एका प्रभागातून दोन महिला आणि दोन पुरुष असे चार नगरसेवक निवडून जातील. मात्र चारही नगरसेवक एकाच प्रभागाचे प्रतिनिधित्व करणार असल्याने परस्परात तू-तू, मै-मै होण्याची चिन्हे आहेत. प्रभाग विकासाची जबाबदारी सांघिक असल्याने यात नागरिकांचे खऱ्या अर्थाने गोची होण्याची भीती जाणकार सूत्रांकडून व्यक्त होत आहे.राज्य सरकारने सर्व महापालिकेसाठी चार सदस्यीय प्रभागाची अधिसूचना मे च्या तिसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध केली. त्यावर आता साधकबाधक आणि तेवढ्याच संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. चार पैकी कुणीही जबाबदारी घेणारही नाही आणि पूर्णपणे झटकणार नाही. अशा परिस्थितीत तीस हजारी प्रभागातील समस्या आणि मतदारांचा वाली कोण असेल? यावर चर्वितचर्वण होत आहे. महापालिकेच्या प्रत्येक चेंबरमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धतीवर चर्चा झडत असून बड्या पक्षांच्या सदस्यांव्यतिरिक्त बहुतांश जण या चार प्रभाग पद्धतीचे तोटे मोठ्या कसोशीने मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. रिपाइं पाठोपाठ अन्य अपक्ष व छोट्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या अध्यादेशातील महापालिकेसंदर्भातील तरतुदीला आव्हान देण्याचा पवित्रा जाहीर केला आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचे समर्थन करताना नानाविध फायदे आणि लोकशाही सुदृढ होण्याचा दावा केला जात असताना संभाव्य परिणामही दृष्टीआड करता येणार नाही. महापालिकेच्या सन २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग होता. त्यावेळी एका प्रभागात निरनिराळ्या पक्षांचे नगरसेवक निवडून आल्याने विकास कामावरून वाद उफाळल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे २००७ च्या निवडणुका एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने झाल्या तर २०१२ मध्ये पुन्हा द्विसदस्यीय प्रभाग पद्धती कार्यान्वित झाली. या रचनेमध्ये तर एकाच प्रभागात निवडून आलेल्या एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांमध्ये फारसे सख्य नसल्याचे दिसून येत आहे. यात नागरिकांची मात्र उगाचच फरफट होत असल्याचे चित्र आहे. चारचा प्रभाग झाल्यानंतर यात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. आताच्या द्विसदस्यीय प्रभाग प्रणालीमध्ये अनेक ठिकाणी वरिष्ठ आणि अनुभवी नगरसेवक तुलनेत नवख्या नगरसेवकांचा निधी आपल्याच कामांसाठी वळवीत असल्याचे प्रतिनिधीक उदाहरणे आहेत. चार सदस्यीय प्रणालीमध्ये त्यात भर पडणार असल्याचे साशंक भीती महापालिका वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)