शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

बहुसदस्यीय प्रभागात ‘तू-तू, मै-मै’ चा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 00:09 IST

पुढील वर्षीच्या पूर्वार्धात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाने बहुसदस्यीय प्रभाग प्रणालीला हिरवी झेंडी दिली आहे.

राजकीय तोटा : श्रेयवादाची लढाईअमरावती : पुढील वर्षीच्या पूर्वार्धात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाने बहुसदस्यीय प्रभाग प्रणालीला हिरवी झेंडी दिली आहे. एका प्रभागातून दोन महिला आणि दोन पुरुष असे चार नगरसेवक निवडून जातील. मात्र चारही नगरसेवक एकाच प्रभागाचे प्रतिनिधित्व करणार असल्याने परस्परात तू-तू, मै-मै होण्याची चिन्हे आहेत. प्रभाग विकासाची जबाबदारी सांघिक असल्याने यात नागरिकांचे खऱ्या अर्थाने गोची होण्याची भीती जाणकार सूत्रांकडून व्यक्त होत आहे.राज्य सरकारने सर्व महापालिकेसाठी चार सदस्यीय प्रभागाची अधिसूचना मे च्या तिसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध केली. त्यावर आता साधकबाधक आणि तेवढ्याच संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. चार पैकी कुणीही जबाबदारी घेणारही नाही आणि पूर्णपणे झटकणार नाही. अशा परिस्थितीत तीस हजारी प्रभागातील समस्या आणि मतदारांचा वाली कोण असेल? यावर चर्वितचर्वण होत आहे. महापालिकेच्या प्रत्येक चेंबरमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धतीवर चर्चा झडत असून बड्या पक्षांच्या सदस्यांव्यतिरिक्त बहुतांश जण या चार प्रभाग पद्धतीचे तोटे मोठ्या कसोशीने मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. रिपाइं पाठोपाठ अन्य अपक्ष व छोट्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या अध्यादेशातील महापालिकेसंदर्भातील तरतुदीला आव्हान देण्याचा पवित्रा जाहीर केला आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचे समर्थन करताना नानाविध फायदे आणि लोकशाही सुदृढ होण्याचा दावा केला जात असताना संभाव्य परिणामही दृष्टीआड करता येणार नाही. महापालिकेच्या सन २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग होता. त्यावेळी एका प्रभागात निरनिराळ्या पक्षांचे नगरसेवक निवडून आल्याने विकास कामावरून वाद उफाळल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे २००७ च्या निवडणुका एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने झाल्या तर २०१२ मध्ये पुन्हा द्विसदस्यीय प्रभाग पद्धती कार्यान्वित झाली. या रचनेमध्ये तर एकाच प्रभागात निवडून आलेल्या एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांमध्ये फारसे सख्य नसल्याचे दिसून येत आहे. यात नागरिकांची मात्र उगाचच फरफट होत असल्याचे चित्र आहे. चारचा प्रभाग झाल्यानंतर यात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. आताच्या द्विसदस्यीय प्रभाग प्रणालीमध्ये अनेक ठिकाणी वरिष्ठ आणि अनुभवी नगरसेवक तुलनेत नवख्या नगरसेवकांचा निधी आपल्याच कामांसाठी वळवीत असल्याचे प्रतिनिधीक उदाहरणे आहेत. चार सदस्यीय प्रणालीमध्ये त्यात भर पडणार असल्याचे साशंक भीती महापालिका वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)