शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

शेतकऱ्यांना कोरडवाहूसाठी हेक्टरी साडेचार हजार

By admin | Updated: January 13, 2015 22:52 IST

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील कोरडवाहू, बागायती आणि फळबागधारक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन नेहमीच्या

अमरावती : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील कोरडवाहू, बागायती आणि फळबागधारक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन नेहमीच्या पद्धतीप्रमाणे केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी ४ हजार ५०० रूपये, बागायती क्षेत्राला हेक्टरी ९ हजार तर फळबागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी १२ हजार ५०० रूपयांची मदत प्रस्तावित केली आहे. अल्प आणि बहू भूधारकांना दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत दिली जाणार आहे. जिल्ह्यातील व अन्य भागात दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे पीक आणि फळबागाचे झालेले नुकसान लक्षात घेता त्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने चार हजार कोटी रूपये निधी मागण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला होता. यासाठी ३० पानांचे सविस्तर निवेदन तयार केले होते. सदर प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठविला असता महसूल व कृषी विभागाने जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली असून विभागीय आयुक्त यांच्याकडून त्याबाबतचे अहवाल पाठविण्यात आला होता. सदर प्राप्त अहवालांचे अवलोकन केल्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने सुमारे चार हजार कोटी रूपये केंद्राकडे मागण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कोरडवाहू अल्पभूधारकांना प्रति हेक्टरी ४ हजार ५०० रूपये मदत देण्याचा निकष आहे. अल्पभूधारकांना प्रति हेक्टरी ९ हजार रूपये मदत देण्याचा निकष आहे. या प्रकाराच्या नुकसानग्रस्त भागाचे जेवढे क्षेत्र अमरावतीसह राज्यभरात २ लाख ७७ हजार १७८ हेक्टर आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ३६२ कोटी २९ लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच बागायत बहूभुधारकांच्या एकूण ५८,५४० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी २४८ कोटी ९३ लाख रूपयांची मागणी करण्यात येणार आहेत. बहूवर्षी फळपिके घेणाऱ्या अल्पभुधारकांना प्रति हेक्टरी १२ हजार ३०० रूपये मदत देण्याचा निकष आहे. या प्रकारच्या नुकसानग्रस्त भागाचे क्षेत्र ८६.०६४ हेक्टर आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १९९ कोटी ९० लाख रूपयांची मागणी केली होती. याशिवाय बहुवर्षीय फळपिके घेणाऱ्या बहूभुधारकांच्या एकूण ४४,११७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ७४ कोटी ७५ लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र दोन हजार कोटीचेच पॅकेज तूर्तास जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही तूटपुंजी असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)