शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

हजारो मराठ्यांची मुंबईकडे कू च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 23:32 IST

सकल मराठा समाजाच्यावतीने ९ आॅगस्ट या क्रांतीदिनी मुंबई येथे आझाद मैदानावर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआज विराट मोर्चा : महिला, युवती, युवकांची लक्षणीय गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सकल मराठा समाजाच्यावतीने ९ आॅगस्ट या क्रांतीदिनी मुंबई येथे आझाद मैदानावर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून हजारो मराठ्यांनी मंगळवारी मुंबईकडे कूच केली. ‘मी मराठा, लाख मराठा’, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ - जय शिवराय, ‘रक्ता रक्तात भिनलयं काय, जय जिजाऊ- जय शिवराय’ या गगनभेदी नाºयांनी आसमंत दणाणून गेला होता.मुंबईत मराठा समाजाचा विशाल मोर्चा निघणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा मंगळवारी सकाळपासून सजग होती. मुंबईकडे जाणाºया मोर्चेकरांची वाहने, मराठा समाज बांधवांची संख्या, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने यावर गोपनीय विभाग लक्ष ठेवून होता. दुसरीकडे मोर्चेकरांसाठी ठिकठिकाणी पाणी, चहा, नास्ता वाटपाचा कार्यक्रमही राष्ट्रीय, राज्य महामार्गावर मोर्चा नियोजकांनी केले होते. बडनेरा रेल्वे स्थानकावरून हावडा-मुंबई गितांजली एक्सप्रेसने मराठा समाज बांधव मुंबईच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाल्याची नोंद रेल्वे सुरक्षा दलाने केली आहे.काही मराठा बांधवांनी सोमवारी खासगी वाहने, रेल्वे, ट्रॅव्हल्सने मुंबईकडे ेकूच केली. बडनेरा रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता हावडा-कुर्ला शालीमार एक्सप्रेसला जिल्ह्यातील मराठा मोर्चेकरांसाठी दोन विशेष कोच लावण्यात आलेत. ही सुविधा खा.आनंदराव अडसूळ यांच्या पुढाकाराने केल्याची माहिती नियोजकांनी दिली. धामणगावातून मराठा समाज मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्याची नोंद झाली आहे. गोंदिया- मुंबई विदर्भ एक्सप्रेस, हावडा-मुंबई मेल, अमरावती-मुंबई एक्सप्रेस, नागपूर-दादर एक्सप्रेसनेही मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना झालेत. मोर्चात युवक, युवती, महिलांची मोठी गर्दी असल्याचे पोलीस विभागाने शासनाला कळविले आहे.मोर्चेकरांसाठी चोख सुरक्षा व्यवस्थामुंबई येथे मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणाºया मराठा समाज बांधवांच्या चोख सुरक्षा व्यवस्थेसाठी बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी, कर्मचारी तैणात होते. कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी गोपनीय यंत्रणादेखील सज्ज करण्यात आली आहे.रेल्वेत दोन स्वतंत्र कोचजिल्हातील मराठा मोर्चेकरांसाठी हावडा-कुर्ला शालीमार एक्सप्रेसमध्ये स्वंतत्र दोन कोच लावल्यामुळे मोर्चेकरांना दिलासा मिळाला. या कोचला अमरावती जिल्हा मराठा मोर्चा, असे बॅनर लावले होते. रेल्वे गाड्यांत स्वतंत्र कोचची व्यवस्था केल्यामुळे मुंबईकडे जाताना होणारी गैरसोय दूर झाली. मराठा बांधव रेल्वेंनीच मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.