शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' सरपंच कुटुंबांना अद्यापही मदत नाही

By admin | Updated: February 15, 2016 00:35 IST

आपले संपूर्ण आयुष्य गाव विकासासाठी अर्पण केल्यानंतर आज ही ना शासनाने ना प्रशासनाने कोणतीही मदत देण्यासाठी पुढाकार घेतला नाही.

अपघाताला दोन वर्ष पूर्ण : भीषण अपघाताच्या आठवणी आजही कायममोहन राऊत  धामणगाव रेल्वेआपले संपूर्ण आयुष्य गाव विकासासाठी अर्पण केल्यानंतर आज ही ना शासनाने ना प्रशासनाने कोणतीही मदत देण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्या पाचही सरपंचाच्या कुटुंबांतील सदस्य शासकीय मदतीसाठी लालफीत शाहीचा दरवाजा ठोठावत आहेत़ सर्वांनी दिलेले त्यावेळेचे आश्वासन हवेतच विरले असल्याची खंत या कुटुंबांनी व्यक्त केली आहे़ दोन वर्षांपूर्वी १५ फेब्रुवारी रोजी रात्री जळगाव येथे सरपंच परिषदेला जात असताना चिखलीजवळ स्कार्पिओ वाहन झाडावर आदळल्याने यात जुना धामणगाव येथील सरपंच प्रवीण गुल्हाने, वाठोड्याचे सरपंच नरेंद्र बहुरूपी, ढाकुलगावचे सरपंच मंगेश म्हात्रे व गुंजी येथील रहिवासी अरूण टाले हे जागीच ठार झाले होते़ दीड महिन्यांनी या अपघातात जखमी झालेले झाडा येथील सरपंच अतुल कोंबे यांची प्राणज्योत उपचारा दरम्यान मालवली होती़ या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाले असतानाही कोणत्याच प्रकारची शासनाने मदत केली नसल्याचे तालुक्यातील चारही सरपंचांचा संसाराचा गाडा केवळ शेतीच्या भरवशावर चालत होता़ वर्षभर शेतात राबून आलेल्या उत्पादनातून जन्मदात्यासोबत आपल्या कुटुंबांचा खर्च चालविताना त्यांना मोठ्या कसरतीला सामोरे जावे लागत होते. ग्रामपंचायतमधील पाणीपुरवठ्याचे थकीत वीज बिल भरले नाही, तर दुसऱ्या दिवशी गावातील वीजपुरवठा खंडित होतो त्यामुळे वेळप्र्रसंगी उसनवारीचे पैसे घेवून गावातील वीज देयक भरण्यासाठी या सरपंचासह गुंजी येथील मृत अरूण टाले यांचा पुढाकार राहत असे. घरावर तुळशीपत्र ठेवून गावाच्या विकासासाठी धावणारे व्यक्तिमत्त्व म्हणून तालुक्यात या पाचही जणांची ओळख होती़ या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाले असले तरी या कुटुंंबातील बोबडे शब्द आजही अनेक प्रश्न करीत आहे़ मात्र, त्यांना या नियतीच्या चक्रव्यूहामुळे एकच उत्तर कुटूंबप्रमुखाला द्यावे लागत आहे़ जुना धामणगाव येथील अपघातात ठार झालेल्या प्रवीण गुल्हाने यांचा छोटा मुलगा हिमांशू व मुलगी हे आपल्या आईला आजही वडिलांविषयी अनेक प्रश्न विचारतात. हीच स्थिती वाठोडा येथील मृत सरपंच नरेंद्र बहुरूपी तसेच झाडा येथील मृत सरपंच अतुल कोंबे यांच्या घरची आहे़