शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

‘त्या’ नऊ कोटींच्या कामांना मान्यता नाही

By admin | Updated: October 24, 2015 00:09 IST

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील सुमारे नऊ कोटींची कामे ..

जिल्हा परिषद : जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात निर्णयअमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील सुमारे नऊ कोटींची कामे जिल्हा परिषद सिंचन विभागाकडे कामनिहाय मंजूर केली होती. मात्र, या यादीला जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी विरोध करून ही यादी रद्द केल्याचा ठराव घेऊन जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. मात्र त्यानंतर जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन सभागृहाने सदर यादीतील कामावर एकमताने शिक्कामोर्तब केले. परंतु आता याबाबतचा अंतिम निर्णय हा जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारीच यादीला नव्याने मान्यता कधी मिळणार याची प्रतीक्षा करीत आहेत.जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जलयुक्त शिवार योजनेतील कामे ही विविध यंत्रणांकडे सोपविली होती. यासाठी गावनिहाय कामे मंजूर करून या कामांची यादी संबंधित विभागाकडे पाठविली होती. यापैकीच जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाला तलावातील गाळ काढण्यासाठी सुमारे नऊ कोटी रूपयांच्या निधीचा कामे पूर्ण करण्यासाठी दिला होता. मात्र जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांना यामध्ये विश्र्वासात न घेतल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेली ही यादी रद्द करण्याचा ठराव जलव्यवस्थापन, सर्वसाधारण सभेत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ठराव पाठविला होता. मात्र जलयुक्त शिवार हा शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून ही कामे जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारी यांनी पाठविलेल्या यादीनुसार करू द्यावीत, असा आग्रह जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा होता. यावर शेवटी दोन सभांमध्ये विस्तृत चर्चा केल्यानंतर जिल्ह्याचा विकासाचा हा प्रश्न लक्षात घेता यापुढील जलयुक्त शिवारच्या कामात जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य यांच्या सहमतीने सर्कलनिहाय मागवून या कामाची यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून यामधील कामे घेण्याबाबत त्यांना विनंती करू, असे मत मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी मांडले. ही बाब लक्षात घेऊन अखेर जलयुक्त शिवारच्या सुमारे नऊ कोटींच्या कामांना जिल्हा परिषद सभागृहाने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे आता या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु यापूर्वी जो जिल्हा परिषदेच्या सभेत घेण्यात आलेला ठराव जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यामुळे याचा कामांचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेणार असल्याने त्यांच्या निर्णयाची जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे. (प्रतिनिधी)