शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

‘त्या’ नऊ कोटींच्या कामांना मान्यता नाही

By admin | Updated: October 24, 2015 00:09 IST

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील सुमारे नऊ कोटींची कामे ..

जिल्हा परिषद : जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात निर्णयअमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील सुमारे नऊ कोटींची कामे जिल्हा परिषद सिंचन विभागाकडे कामनिहाय मंजूर केली होती. मात्र, या यादीला जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी विरोध करून ही यादी रद्द केल्याचा ठराव घेऊन जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. मात्र त्यानंतर जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन सभागृहाने सदर यादीतील कामावर एकमताने शिक्कामोर्तब केले. परंतु आता याबाबतचा अंतिम निर्णय हा जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारीच यादीला नव्याने मान्यता कधी मिळणार याची प्रतीक्षा करीत आहेत.जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जलयुक्त शिवार योजनेतील कामे ही विविध यंत्रणांकडे सोपविली होती. यासाठी गावनिहाय कामे मंजूर करून या कामांची यादी संबंधित विभागाकडे पाठविली होती. यापैकीच जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाला तलावातील गाळ काढण्यासाठी सुमारे नऊ कोटी रूपयांच्या निधीचा कामे पूर्ण करण्यासाठी दिला होता. मात्र जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांना यामध्ये विश्र्वासात न घेतल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेली ही यादी रद्द करण्याचा ठराव जलव्यवस्थापन, सर्वसाधारण सभेत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ठराव पाठविला होता. मात्र जलयुक्त शिवार हा शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून ही कामे जिल्हा परिषदेने जिल्हाधिकारी यांनी पाठविलेल्या यादीनुसार करू द्यावीत, असा आग्रह जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा होता. यावर शेवटी दोन सभांमध्ये विस्तृत चर्चा केल्यानंतर जिल्ह्याचा विकासाचा हा प्रश्न लक्षात घेता यापुढील जलयुक्त शिवारच्या कामात जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य यांच्या सहमतीने सर्कलनिहाय मागवून या कामाची यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून यामधील कामे घेण्याबाबत त्यांना विनंती करू, असे मत मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी मांडले. ही बाब लक्षात घेऊन अखेर जलयुक्त शिवारच्या सुमारे नऊ कोटींच्या कामांना जिल्हा परिषद सभागृहाने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे आता या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु यापूर्वी जो जिल्हा परिषदेच्या सभेत घेण्यात आलेला ठराव जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यामुळे याचा कामांचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेणार असल्याने त्यांच्या निर्णयाची जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे. (प्रतिनिधी)