शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘त्या’ नरभक्षक वाघाला जेरबंद करा अथवा ठार मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:43 IST

धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर आणि अंजनसिंगी येथील दोघांना तीन दिवसांत नरभक्षक वाघाने ठार केले. या वाघाला तात्काळ जेरबंद करा अथवा ठार मारा, अन्यथा कायदा हातात घेऊ, असा निर्वाणीचा इशारा आ. वीरेद्र जगताप यांनी शासनाला दिला आहे.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : तर कायदा हातात घेऊ

अमरावती : धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर आणि अंजनसिंगी येथील दोघांना तीन दिवसांत नरभक्षक वाघाने ठार केले. या वाघाला तात्काळ जेरबंद करा अथवा ठार मारा, अन्यथा कायदा हातात घेऊ, असा निर्वाणीचा इशारा आ. वीरेद्र जगताप यांनी शासनाला दिला आहे. वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांना त्यांनी पत्र दिले आहे.तीन दिवसांत दोघांना वाघाने ठार केल्याने धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत. हा वाघ किती जणांचे बळी घेणार, असा सवाल विचारू लागले आहेत. त्यामुळे वन विभागाने नरभक्षक वाघाला जेरबंद करावे अथवा ठार मारावे, अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊन वाघाला ठार मारू, अशा धमकीचे पत्र आ. जगताप यांनी शासनाला दिले. शेतीची कामे वाघाच्या दहशतीमुळे पूर्णत: बंद आहेत. आणखी किती दिवस असे गावकऱ्यांनी जगावे, या महत्त्वाच्या प्रश्नाकडे आ. जगताप यांनी लक्ष वेधले. शाळेत मुले जात नाही. महिलांमध्ये भीती आहे. परिसरातील गावकºयांचे जगणे असह्य झाले आहे. प्रसंगी गावकरी कायदा हातात घेऊन त्याला ठार मारतील. धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यात वाघामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या वस्तुस्थितीबाबत आ. जगताप यांनी वनसचिवांना अवगत केली. दरम्यान, ग्रामस्थांना वाघासंदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन आ. जगताप यांनी केले आहे.