शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्त कार्यालयातून चंदन झाडाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:25 IST

येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दर्शनी भागातील उद्यानातून रविवारी मध्यरात्री चंदन झाडाची कत्तल करण्यात आली. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक तैनात असताना चंदन वृक्षाची चोरी झाली कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयाचे नाझर राजू पेठे यांनी गाडगेनगर ठाण्यात सोमवारी तक्रार नोंदविली आहे.

ठळक मुद्देरविवारी रात्री कत्तल : गाडगेनगर पोलिसात तक्रार, चंदनचोर सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दर्शनी भागातील उद्यानातून रविवारी मध्यरात्री चंदन झाडाची कत्तल करण्यात आली. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक तैनात असताना चंदन वृक्षाची चोरी झाली कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयाचे नाझर राजू पेठे यांनी गाडगेनगर ठाण्यात सोमवारी तक्रार नोंदविली आहे.विभागीय आयुक्त कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी चंदन झाडाची चोरीस गेल्याची बाब नमूद केली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्यांनी लंपास केलेले चंदनाचे झाड हे परिपक्व होते. मात्र, अचानक झाड चोरीस गेल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बंगले, निवासस्थान परिसरातून चंदन झाडाची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. चंदनवृक्ष चोरीचे रॅकेट औरंगाबाद, अकोला येथील असल्याची विश्वसनीय माहिती आहे. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हा व सत्र न्यायाधीश, पोलीस अधीक्षक, मुख्य वनसंरक्षक आदी अतिमहत्त्वाच्या अधिकाºयांचे बंगले चंदन तस्करांनी लक्ष्य केले होते. मध्यंतरी पोलिसांनी प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांच्या वसाहती, बंगला परिसरात गस्त वाढविली होती. काही दिवस हा प्रकार थांबला होता. मात्र, पोलिसांनी रात्रची गस्त बंद करताच पुन्हा चंदन चोरटी शहरात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.वनविभागाची जबाबदारी वाढलीअमरावतीत पुन्हा चंदन तस्कर सक्रिय झाल्याच्या पार्श्वभूमिवर पोलिसांसह वन विभागाची जबाबदारी वाढली आहे. चंदनाची झाडे अधिकाºयांच्या वसाहतीत अथवा बंगल्यांमध्ये आहे. चंदनवृक्षांची कत्तल करण्यात तस्कर पटाईत आहेत. त्यांच्याकडे आवाजविरहीत साहित्य असल्यामुळे रात्रीला अवघ्या पाच मिनिटांतच ते झाडांची कत्तल करून मोहीम फत्ते करतात. सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यात धूळफेक करुन तत्क्षण चंदनवृक्ष चोरण्याचा प्रताप करतात.