शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पावसाळ्याच्या दिवसात ११ गावांची तहान टँकरवर टंचाई कायम

By जितेंद्र दखने | Updated: July 6, 2023 18:56 IST

: ७८ गावांमध्ये ८६ विहिरींचे अधिग्रहण

अमरावती : यावर्षी जून संपून जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरीही सार्वत्रिक चांगला पाऊस बरसलेला नाही. परिणामी पेरण्या खोळंबल्या असून, जिल्ह्यातील पाणीटंचाईचे ढगही कायम आहेत. अद्यापही जिल्ह्यातील ११ गावांत पावसाळ्याच्या दिवसात टँकरद्वारेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

याशिवाय ७८ गावांतही पाणीटंचाईची समस्या कायम असल्याने या ठिकाणी ८६ विहिरींचे अधिग्रहण केलेले आहे. त्यामुळे टंचाईची मुदत संपत असताना पुरेसा पाऊस न झाल्याने टॅंकर आणि विहीर अधिग्रहणाला वाढीव कालावधीत पाणी पुरवठ्यासाठी कंत्राटदाराला मुदतवाढ द्यावी लागणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वाढीव निधी मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागाला उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईची झळ सोसावी लागू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या ७६६ गावांत पाणी पुरवठ्याच्या विविध ८०० उपाययोजनांचे नियोजन करून एकूण १२.४४ कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली. टंचाई आराखडयानुसार उपाययोजना केल्या. मात्र, आता टंचाईचा कालावधी संपुष्टात आला असतानाही जिल्ह्यात पाणीटंचाईचे ढग तूर्तास कायम आहेत. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील नागरिकांची तहान टॅंकर व विहीर अधिग्रहणाच्या माध्यमातून भागविली जात आहे. त्यामुळे टंचाईची समस्या अजून किती दिवस कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या गावात होतोय टॅंकरने पाणी पुरवठा

चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरामधील आकी, मोथा, खोंगडा, रायपूर, साेमवारखेडा, बगदरी, धरमडोह, खडीमल, एकझिरा, गौलखेडा बाजार या गावांचा समावेश आहे.पाणीटंचाई आराखडयाची मुदत ३० जून रोजी संपली आहे. मात्र, ग्रामीण भागातील काही गावांत अजूनही पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झालेले नाही. सध्या पावसाळयाचे दिवस आहेत. मात्र, नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी मुदतीनंतर पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. शासनाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविला आहे.

- संदीप देशमुख कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,जिल्हा परिषद