शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

पावसाळ्याच्या दिवसात ११ गावांची तहान टँकरवर टंचाई कायम

By जितेंद्र दखने | Updated: July 6, 2023 18:56 IST

: ७८ गावांमध्ये ८६ विहिरींचे अधिग्रहण

अमरावती : यावर्षी जून संपून जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरीही सार्वत्रिक चांगला पाऊस बरसलेला नाही. परिणामी पेरण्या खोळंबल्या असून, जिल्ह्यातील पाणीटंचाईचे ढगही कायम आहेत. अद्यापही जिल्ह्यातील ११ गावांत पावसाळ्याच्या दिवसात टँकरद्वारेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

याशिवाय ७८ गावांतही पाणीटंचाईची समस्या कायम असल्याने या ठिकाणी ८६ विहिरींचे अधिग्रहण केलेले आहे. त्यामुळे टंचाईची मुदत संपत असताना पुरेसा पाऊस न झाल्याने टॅंकर आणि विहीर अधिग्रहणाला वाढीव कालावधीत पाणी पुरवठ्यासाठी कंत्राटदाराला मुदतवाढ द्यावी लागणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वाढीव निधी मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागाला उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईची झळ सोसावी लागू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या ७६६ गावांत पाणी पुरवठ्याच्या विविध ८०० उपाययोजनांचे नियोजन करून एकूण १२.४४ कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली. टंचाई आराखडयानुसार उपाययोजना केल्या. मात्र, आता टंचाईचा कालावधी संपुष्टात आला असतानाही जिल्ह्यात पाणीटंचाईचे ढग तूर्तास कायम आहेत. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील नागरिकांची तहान टॅंकर व विहीर अधिग्रहणाच्या माध्यमातून भागविली जात आहे. त्यामुळे टंचाईची समस्या अजून किती दिवस कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या गावात होतोय टॅंकरने पाणी पुरवठा

चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरामधील आकी, मोथा, खोंगडा, रायपूर, साेमवारखेडा, बगदरी, धरमडोह, खडीमल, एकझिरा, गौलखेडा बाजार या गावांचा समावेश आहे.पाणीटंचाई आराखडयाची मुदत ३० जून रोजी संपली आहे. मात्र, ग्रामीण भागातील काही गावांत अजूनही पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झालेले नाही. सध्या पावसाळयाचे दिवस आहेत. मात्र, नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी मुदतीनंतर पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. शासनाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविला आहे.

- संदीप देशमुख कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,जिल्हा परिषद