शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याच्या दिवसात ११ गावांची तहान टँकरवर टंचाई कायम

By जितेंद्र दखने | Updated: July 6, 2023 18:56 IST

: ७८ गावांमध्ये ८६ विहिरींचे अधिग्रहण

अमरावती : यावर्षी जून संपून जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरीही सार्वत्रिक चांगला पाऊस बरसलेला नाही. परिणामी पेरण्या खोळंबल्या असून, जिल्ह्यातील पाणीटंचाईचे ढगही कायम आहेत. अद्यापही जिल्ह्यातील ११ गावांत पावसाळ्याच्या दिवसात टँकरद्वारेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

याशिवाय ७८ गावांतही पाणीटंचाईची समस्या कायम असल्याने या ठिकाणी ८६ विहिरींचे अधिग्रहण केलेले आहे. त्यामुळे टंचाईची मुदत संपत असताना पुरेसा पाऊस न झाल्याने टॅंकर आणि विहीर अधिग्रहणाला वाढीव कालावधीत पाणी पुरवठ्यासाठी कंत्राटदाराला मुदतवाढ द्यावी लागणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वाढीव निधी मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागाला उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईची झळ सोसावी लागू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या ७६६ गावांत पाणी पुरवठ्याच्या विविध ८०० उपाययोजनांचे नियोजन करून एकूण १२.४४ कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली. टंचाई आराखडयानुसार उपाययोजना केल्या. मात्र, आता टंचाईचा कालावधी संपुष्टात आला असतानाही जिल्ह्यात पाणीटंचाईचे ढग तूर्तास कायम आहेत. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील नागरिकांची तहान टॅंकर व विहीर अधिग्रहणाच्या माध्यमातून भागविली जात आहे. त्यामुळे टंचाईची समस्या अजून किती दिवस कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या गावात होतोय टॅंकरने पाणी पुरवठा

चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरामधील आकी, मोथा, खोंगडा, रायपूर, साेमवारखेडा, बगदरी, धरमडोह, खडीमल, एकझिरा, गौलखेडा बाजार या गावांचा समावेश आहे.पाणीटंचाई आराखडयाची मुदत ३० जून रोजी संपली आहे. मात्र, ग्रामीण भागातील काही गावांत अजूनही पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झालेले नाही. सध्या पावसाळयाचे दिवस आहेत. मात्र, नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी मुदतीनंतर पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. शासनाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविला आहे.

- संदीप देशमुख कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,जिल्हा परिषद