शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

जिल्हा परिषद विभागात ठरली तिसरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:23 IST

निकालदर्शक अभिलेखाद्वारे विभागीय आयुक्तांनी केलेल्या मूल्यांकनात अमरावती जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) चे सर्वाधिक योगदान लाभल्याची प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी दिली.

ठळक मुद्देमूल्यांकन : स्वच्छ भारत अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निकालदर्शक अभिलेखाद्वारे विभागीय आयुक्तांनी केलेल्या मूल्यांकनात अमरावती जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) चे सर्वाधिक योगदान लाभल्याची प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी दिली.विभागांतर्गत येणाऱ्या पाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कामकाजाच्या मूल्यमापनाकरिता गुगल ड्राईव्हवर ‘स्प्रेडशिट’ तयार करण्यात आली. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील योजनांचे उद्दिष्ट व साध्य याविषयी अचूक माहिती आॅनलाईन भरण्याबाबत सर्व सीईओंना सूचित करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा व तालुकास्तरावर आॅनलाईन भरलेल्या माहितीच्या आधारे गुणानुक्रम ठरविण्यात आले. त्यामध्ये अमरावती जिल्हा परिषदेला ६५.८० टक्के गुण मिळालेत. विभाग प्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांच्या विकास कामाबाबत नियमित बैठका घेणे, सोपविलेल्या कामाबाबत त्यांचा पाठपुरावा, कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणे यासोबतच अधिकारी-कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड आणि संगणकीकृत नस्ती व पत्रव्यवहार अनिवार्य करणे आदी निर्णयामुळे प्रशासकीय कामकाजाला गती आली आहे. मार्च महिन्यात झालेल्या मूल्यांकनात जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांक मिळविल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.सर्व विभागाचे सहकार्यजिल्हा परिषदेचा पदभार स्वीकारल्यापासून मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी गतिमान कार्यपद्धतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांना सर्व विभागप्रमुखांचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेला तृतीय क्रमांक मिळाला असल्याचे सुत्रांनी सांगितले.