शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

तिसरा दिवसही रांगांचाच !

By admin | Updated: November 13, 2016 00:05 IST

एटीएमचे शटर अर्ध्यावर : शनिवारी ३०० कोटींची उलाढाल, पाचशे-हजाराच्या नोटा बदलविण्याची लगबग

अमरावती : पाचशे आणि हजार रुपयांचे चलन रद्द झाल्याच्या पार्श्वभूमिवर शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी बँक आणि एटीएमबाहेर रांगा दिसून आल्यात. रोजच्या व्यवहारात निर्माण झालेल्या अडचणी आणि अनामिक भीती अशा मानसिकतेत बहुतांश नागरिकांनी शनिवारी सकाळपासूनच पाचशे व हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकामध्ये धाव घेतली. परिणामी शहर आणि जिल्ह्यात सर्वदूर बँका बाहेर दिवसभर लांबच लांब रांग राहिली. नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला. शनिवारी जिल्ह्यातील बँक व पोस्ट आॅफिसमध्ये सुमारे ३०० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती अग्रणी बँकेच्या सुत्रांनी दिली आहे.मंगळवारी मध्यरात्रीपासून पाचशे व एक हजारच्या नोटा चलनातून रद्द ठरविण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी देशभरातील बँका बंद राहिल्या. बुधवारी सारे आर्थिक व्यवहार कोलमडले. सर्वदूर ‘पैसा झाला खोटा’ अशी प्रचिती आली. पेट्रोल असो वा सराफा पाचशे-हजारांच्या नोटा चालवण्यासाठी गर्दी झाली. साध्या जेवणासाठीही लोकांना पाचशेची चिल्लर घेण्यासाठी मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. गुरुवारी बँका उघडल्या खऱ्या मात्र उत्सुकतेपोटी रांगाच रांगा लागल्या. इतक्या की पोलिसांना पाचारण करावे लागले. जिल्हा आणि बँक प्रशासनाला शांततेचे आवाहन करावे लागले. शुक्रवारचा तिसरा दिवसही चलनकल्लोळ माजला. शनिवारी बँका नेहमीप्रमाणे बंद राहणाऱ्या होत्या. मात्र बुधवारची सुटी घेतल्याने शनिवारी बँकांचे कामकाज नियमित करण्यात आले. प्रारंभीच्या दोन-तीन तासांमध्ये बहुतेकांना कमाल चार हजारांपर्यंत पैसे बदलून मिळाले. सुरुवातीचे काही ग्राहक दोन हजारांच्या नव्या करकरीत नोटा मिळाल्याने सुदैवी ठरले. शनिवारीही ग्राहकांनी बँकाबाहेर पहाटे सहापासून रांग लावली. (प्रतिनिधी)संभ्रम कायमनोट बदलून कशा मिळणार, किती मिळणार, कमाल किती रक्कम मिळणार, बँकेत खाते हवेच, पैसे किती जमा करता येईल, विड्रॉल करता येईल का? ५००-१००० नोटा बदलायच्या नाहीत. मात्र विड्रॉल करून १०० किंवा ५० च्या नोटा हव्या आहेत, असे अनेक प्रश्न ग्राहकांना पडले होते. त्याचे निरसन करता बँक अधिकाऱ्यांचीही भंबेरी उडाल्याचे चित्र शनिवारी दिसून आले.