शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

तिसऱ्या दिवशीही कचरा धगधगतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 21:52 IST

भातकुली रोडवरील सुकळी वनारसी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीचा बुधवारी सलग तिसरा दिवस होता. हा आगडोंब अद्याप थांबलेला नाही. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असलेल्या अग्निशमन दलाची मात्र पुरती दमछाक झाली आहे.

ठळक मुद्देसुकळी कम्पोस्ट डेपो : अग्निशमनची दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भातकुली रोडवरील सुकळी वनारसी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीचा बुधवारी सलग तिसरा दिवस होता. हा आगडोंब अद्याप थांबलेला नाही. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असलेल्या अग्निशमन दलाची मात्र पुरती दमछाक झाली आहे.सुकळी वनारसी कंपोस्ट डेपोत शहरातील संपूर्ण कचरा टाकला जातो. आता कचऱ्याचा ढीग शंभर ते दोनशे फुटांवर पोहोचला असून, त्याचा छोटेखानी डोंगरच तयार झाला आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात अद्याप स्थानिक प्रशासनाला यश मिळालेले नाही. या कचरा डेपोत सोमवारी आग लागली. आगीने हळूहळू भीषण रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट आसमंतात पसरल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन पथकाला कळविण्यात आले. अग्निशमन पथकाने सोमवारी प्रथम तीन बंबांनी पाण्याचा मारा करून आग नियंत्रण आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, आग नियंत्रणात आली नाही. मंगळवारीसुद्धा पाण्याचा मारा सुरूच ठेवला. बुधवारी आगीचा तिसरा दिवस उजाडला तरी अद्यापही आग आटोक्यात आलेली नाही. आतापर्यंत २१ बंब रिते झाले आहेत.आगीलाही प्लास्टिकची बाधाकचरा डेपोत सर्वाधिक प्लास्टिक फेकले जात असून, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिक अधिक आहे. प्लास्टिकमुळे आग नियंत्रणात आणण्यास बरेच परिश्रम घ्यावे लागत आहे. कचऱ्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या प्लास्टिक पन्नीमुळे पाणी खोलवर धुमसत असलेल्या आगीपर्यंत पोहोतच नसल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात अग्निशमन दलाने महापालिका उपायुक्त वानखडे यांच्याशी संपर्क केला. आता जेसीबीने कचरा उलथवून आगीवर पाण्याचा मारा केला जाणार आहे, जेणेकरून कचºयाच्या तळापर्यंत पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात येईल.