शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशीही कचरा धगधगतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 21:52 IST

भातकुली रोडवरील सुकळी वनारसी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीचा बुधवारी सलग तिसरा दिवस होता. हा आगडोंब अद्याप थांबलेला नाही. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असलेल्या अग्निशमन दलाची मात्र पुरती दमछाक झाली आहे.

ठळक मुद्देसुकळी कम्पोस्ट डेपो : अग्निशमनची दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भातकुली रोडवरील सुकळी वनारसी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीचा बुधवारी सलग तिसरा दिवस होता. हा आगडोंब अद्याप थांबलेला नाही. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असलेल्या अग्निशमन दलाची मात्र पुरती दमछाक झाली आहे.सुकळी वनारसी कंपोस्ट डेपोत शहरातील संपूर्ण कचरा टाकला जातो. आता कचऱ्याचा ढीग शंभर ते दोनशे फुटांवर पोहोचला असून, त्याचा छोटेखानी डोंगरच तयार झाला आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात अद्याप स्थानिक प्रशासनाला यश मिळालेले नाही. या कचरा डेपोत सोमवारी आग लागली. आगीने हळूहळू भीषण रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट आसमंतात पसरल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन पथकाला कळविण्यात आले. अग्निशमन पथकाने सोमवारी प्रथम तीन बंबांनी पाण्याचा मारा करून आग नियंत्रण आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, आग नियंत्रणात आली नाही. मंगळवारीसुद्धा पाण्याचा मारा सुरूच ठेवला. बुधवारी आगीचा तिसरा दिवस उजाडला तरी अद्यापही आग आटोक्यात आलेली नाही. आतापर्यंत २१ बंब रिते झाले आहेत.आगीलाही प्लास्टिकची बाधाकचरा डेपोत सर्वाधिक प्लास्टिक फेकले जात असून, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिक अधिक आहे. प्लास्टिकमुळे आग नियंत्रणात आणण्यास बरेच परिश्रम घ्यावे लागत आहे. कचऱ्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या प्लास्टिक पन्नीमुळे पाणी खोलवर धुमसत असलेल्या आगीपर्यंत पोहोतच नसल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात अग्निशमन दलाने महापालिका उपायुक्त वानखडे यांच्याशी संपर्क केला. आता जेसीबीने कचरा उलथवून आगीवर पाण्याचा मारा केला जाणार आहे, जेणेकरून कचºयाच्या तळापर्यंत पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात येईल.