शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार

By admin | Updated: October 26, 2014 22:32 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे. गेल्या वर्षीचे सोयाबीन अतिपाऊस, परतीचा पाऊस आणि गारपीट यामुळे गारद झाले. यंदा खंडित पावसामुळे दीड महिना उशिरा झालेली पेरणी व नंतर पावसाची दडी

२०१३-१४ मधील बियाणे निकृष्ट : यंदा शेंगा पोचट, दाणे झाले बारीक गजानन मोहोड - अमरावतीजिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे. गेल्या वर्षीचे सोयाबीन अतिपाऊस, परतीचा पाऊस आणि गारपीट यामुळे गारद झाले. यंदा खंडित पावसामुळे दीड महिना उशिरा झालेली पेरणी व नंतर पावसाची दडी यामुळे सोयाबीन बाधित झाले. मागीलवर्षीचे सोयाबीन डागी व केवळ ५० टक्के उगवण शक्ती असणारे होते. या बाधित बियाण्यांच्या पेरणीमुळे यंदा सोयाबीनवर पिवळ्या ‘मोझॅक’ रोगाचा प्रादुर्भाव झाला. प्रतिकूल हवामानामुळे ७० टक्के सोयाबीन करपले, शेंगा पोचट राहिल्या. एकरी एक पोत्याची झडती सध्या होत आहे. मागील वर्षीपेक्षाही यंदाचे सोयाबीन खराब असल्यामुळे ते पेरणीयोग्य नाही. परिणामी खरीप २०१५ च्या हंगामात सोयाबीन बियाण्यांची तीव्र टंचाई राहण्याची शक्यता आहे व याला कृषी विभागाने दुजोरा दिला आहे. सध्या सोयाबीन कापणी व मळणीचा हंगाम सुरू आहे. यापूर्वी सोयाबीनवर झालेल्या पिवळ्या ‘मोझॅक’च्या अटॅकमुळे किमान ७० टक्के क्षेत्रामधील सोयाबीन करपले. शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पाऊस न आल्याने शेंगा पोचट राहिल्या. दाणेही बारीक झाले. यामुळे मळणीमध्ये एकरी एक किंवा दोन पोते सोयाबीन झडत आहे. एकरी १५ हजार रूपये खर्च झाल्यावर जर उत्पन्न अडीच ते तीन हजार मिळत असेल तर त्या सोयाबीन उत्पादकाने जगावे तरी कसे? हा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे.सद्यस्थितीत २० टक्के संरक्षित सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यां व्यतिरिक्त ८० टक्के सोयाबीन उत्पादक मरणासन्न आहेत. मागील वर्षी सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात ४० टक्क्यांनी घट आली. यंदा त्याहूनही बिकट परिस्थिती आहे. यंदाच्या सोयाबीन उत्पादनात किमान ७० टक्क्यांनी कमी उत्पादन होणार आहे. सलग २ वर्षांपासून सोयाबीन उत्पादकांची ही स्थिती आहे. दरवर्षी उत्पादन कमी व बियाणे निकृष्ट यामुळे २०१५ च्या हंगामात सोयाबीन बियाणेच उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. महाबीजचे प्लॉटदेखील निकृष्ट आहेत. अन्य बियाणे कंपन्याची देखील हीच स्थिती आहे. राज्यात सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादकांचीदेखील अशीच व्यथा आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतामधून उपलब्ध होणारे सोयाबीन दरवर्षीप्रमाणे बनावटच राहणार आहे. यामुळे १०० दिवसांचे कॅश क्रॉप (नगदी) यानंतर दुर्लभ होईल. शेतकऱ्यांना यापुढे परंपरागत पिकांवरच मदार ठेवावी लागणार आहे. सोयाबीन हे नगदी पीक असले तरी शेतकऱ्यांना आता त्यावर अधिक भिस्त ठेवता येणार नाही. त्यामुळे अन्य पर्यायांचा वापर करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असे जाणकारांचे म्हणणे आहे. सोयाबीनचा पुढचा हंगामदेखील फारसा समाधानकारक राहणार नाही, असे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे.