शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार

By admin | Updated: October 26, 2014 22:32 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे. गेल्या वर्षीचे सोयाबीन अतिपाऊस, परतीचा पाऊस आणि गारपीट यामुळे गारद झाले. यंदा खंडित पावसामुळे दीड महिना उशिरा झालेली पेरणी व नंतर पावसाची दडी

२०१३-१४ मधील बियाणे निकृष्ट : यंदा शेंगा पोचट, दाणे झाले बारीक गजानन मोहोड - अमरावतीजिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे. गेल्या वर्षीचे सोयाबीन अतिपाऊस, परतीचा पाऊस आणि गारपीट यामुळे गारद झाले. यंदा खंडित पावसामुळे दीड महिना उशिरा झालेली पेरणी व नंतर पावसाची दडी यामुळे सोयाबीन बाधित झाले. मागीलवर्षीचे सोयाबीन डागी व केवळ ५० टक्के उगवण शक्ती असणारे होते. या बाधित बियाण्यांच्या पेरणीमुळे यंदा सोयाबीनवर पिवळ्या ‘मोझॅक’ रोगाचा प्रादुर्भाव झाला. प्रतिकूल हवामानामुळे ७० टक्के सोयाबीन करपले, शेंगा पोचट राहिल्या. एकरी एक पोत्याची झडती सध्या होत आहे. मागील वर्षीपेक्षाही यंदाचे सोयाबीन खराब असल्यामुळे ते पेरणीयोग्य नाही. परिणामी खरीप २०१५ च्या हंगामात सोयाबीन बियाण्यांची तीव्र टंचाई राहण्याची शक्यता आहे व याला कृषी विभागाने दुजोरा दिला आहे. सध्या सोयाबीन कापणी व मळणीचा हंगाम सुरू आहे. यापूर्वी सोयाबीनवर झालेल्या पिवळ्या ‘मोझॅक’च्या अटॅकमुळे किमान ७० टक्के क्षेत्रामधील सोयाबीन करपले. शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पाऊस न आल्याने शेंगा पोचट राहिल्या. दाणेही बारीक झाले. यामुळे मळणीमध्ये एकरी एक किंवा दोन पोते सोयाबीन झडत आहे. एकरी १५ हजार रूपये खर्च झाल्यावर जर उत्पन्न अडीच ते तीन हजार मिळत असेल तर त्या सोयाबीन उत्पादकाने जगावे तरी कसे? हा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे.सद्यस्थितीत २० टक्के संरक्षित सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यां व्यतिरिक्त ८० टक्के सोयाबीन उत्पादक मरणासन्न आहेत. मागील वर्षी सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात ४० टक्क्यांनी घट आली. यंदा त्याहूनही बिकट परिस्थिती आहे. यंदाच्या सोयाबीन उत्पादनात किमान ७० टक्क्यांनी कमी उत्पादन होणार आहे. सलग २ वर्षांपासून सोयाबीन उत्पादकांची ही स्थिती आहे. दरवर्षी उत्पादन कमी व बियाणे निकृष्ट यामुळे २०१५ च्या हंगामात सोयाबीन बियाणेच उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. महाबीजचे प्लॉटदेखील निकृष्ट आहेत. अन्य बियाणे कंपन्याची देखील हीच स्थिती आहे. राज्यात सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादकांचीदेखील अशीच व्यथा आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतामधून उपलब्ध होणारे सोयाबीन दरवर्षीप्रमाणे बनावटच राहणार आहे. यामुळे १०० दिवसांचे कॅश क्रॉप (नगदी) यानंतर दुर्लभ होईल. शेतकऱ्यांना यापुढे परंपरागत पिकांवरच मदार ठेवावी लागणार आहे. सोयाबीन हे नगदी पीक असले तरी शेतकऱ्यांना आता त्यावर अधिक भिस्त ठेवता येणार नाही. त्यामुळे अन्य पर्यायांचा वापर करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असे जाणकारांचे म्हणणे आहे. सोयाबीनचा पुढचा हंगामदेखील फारसा समाधानकारक राहणार नाही, असे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे.