शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

वनजमिनींवरील प्रकल्पांचे होणार ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:16 IST

नोडल अधिकाऱ्यांचे पत्र, विकासकामांसाठी घेतलेल्या २०० जमिनींचा लेखाजोखा तपासणार अमरावती : राज्य अथवा केंद्र शासनाने विविध विकासकामांसाठी घेतलेल्या वनजमिनींवर ...

नोडल अधिकाऱ्यांचे पत्र, विकासकामांसाठी घेतलेल्या २०० जमिनींचा लेखाजोखा तपासणार

अमरावती : राज्य अथवा केंद्र शासनाने विविध विकासकामांसाठी घेतलेल्या वनजमिनींवर प्रस्तावित प्रकल्प झाले अथवा नाही, याचे वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत ऑडिट केले जाणार आहे. त्याअनुषंगाने राज्याचे वनखात्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेंद्र झुरमुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार चालविला आहे. राज्यात २०० वनजमिनी विकासकामांच्या नावे देण्यात आल्या आहेत.

नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. बदलत्या काळानुसार पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत आहे. मात्र, केंद्र व राज्य शासनाने यापूर्वी विकासाच्या नावे मोठ्या प्रमाणात वनजमिनी ताब्यात घेतल्या आहेत. या जमिनीवर प्रस्तावित विकासकामे झाल्याबाबत आता ऑडिट करण्यात येणार आहे, गत २० वर्षाच्या वनजमिनींचा शोध घेण्यात येणार आहे. ज्या कामांसाठी वनजमिनी ताब्यात घेतल्या, अशा २०० प्रकल्प प्रस्तावाचे प्रमाणपत्र वनखात्याकडे प्राप्त झाले नाही. त्यामुळे आता वनखात्याने जिल्हानिहाय दिलेल्या जमिनींचा महसूल विभागाच्या सहकाऱ्यांनी ऑडिट करण्यात येणार आहे.

--------------------------

या विकासकामांसाठी दिल्या वनजमिनी

केंद्र अथवा राज्य शासनाच्या प्रस्तावानुसार रेल्वे, पूल, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, कम्युनिटी हॉल, सिंचन तलाव, जलकुंभ निर्मिती, उद्याने आदी विकासकामांसाठी वनजमिनी दिल्या आहेत. मात्र, वनजमिनीच्या मोबदल्यात संबंधित विभागाने जमीन परत केली अथवा नाही, याचाही शोध घेण्यात येणार आहे.

---------------

केंद्रीय पर्यावरण, वने मंत्रालयाकडून ताशेरे

राज्याच्या वनखात्याने विकासकामांसाठी वनजमिनी दिल्या असताना, त्या जमिनींचा वापर योग्य स्वरूपात झाला अथवा नाही, याचा तपास न घेतल्याबाबत केंद्रीय पर्यावरण, वने, वातावरण बदल मंत्रालयाचे एआयजी संदीप शर्मा यांनी ६ सप्टेंबर रोजी राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून वनजमिनीबाबत ताशेरे ओढले आहेत.