शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

वनजमिनींवरील प्रकल्पांचे होणार ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:16 IST

नोडल अधिकाऱ्यांचे पत्र, विकासकामांसाठी घेतलेल्या २०० जमिनींचा लेखाजोखा तपासणार अमरावती : राज्य अथवा केंद्र शासनाने विविध विकासकामांसाठी घेतलेल्या वनजमिनींवर ...

नोडल अधिकाऱ्यांचे पत्र, विकासकामांसाठी घेतलेल्या २०० जमिनींचा लेखाजोखा तपासणार

अमरावती : राज्य अथवा केंद्र शासनाने विविध विकासकामांसाठी घेतलेल्या वनजमिनींवर प्रस्तावित प्रकल्प झाले अथवा नाही, याचे वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत ऑडिट केले जाणार आहे. त्याअनुषंगाने राज्याचे वनखात्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेंद्र झुरमुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार चालविला आहे. राज्यात २०० वनजमिनी विकासकामांच्या नावे देण्यात आल्या आहेत.

नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. बदलत्या काळानुसार पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत आहे. मात्र, केंद्र व राज्य शासनाने यापूर्वी विकासाच्या नावे मोठ्या प्रमाणात वनजमिनी ताब्यात घेतल्या आहेत. या जमिनीवर प्रस्तावित विकासकामे झाल्याबाबत आता ऑडिट करण्यात येणार आहे, गत २० वर्षाच्या वनजमिनींचा शोध घेण्यात येणार आहे. ज्या कामांसाठी वनजमिनी ताब्यात घेतल्या, अशा २०० प्रकल्प प्रस्तावाचे प्रमाणपत्र वनखात्याकडे प्राप्त झाले नाही. त्यामुळे आता वनखात्याने जिल्हानिहाय दिलेल्या जमिनींचा महसूल विभागाच्या सहकाऱ्यांनी ऑडिट करण्यात येणार आहे.

--------------------------

या विकासकामांसाठी दिल्या वनजमिनी

केंद्र अथवा राज्य शासनाच्या प्रस्तावानुसार रेल्वे, पूल, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, कम्युनिटी हॉल, सिंचन तलाव, जलकुंभ निर्मिती, उद्याने आदी विकासकामांसाठी वनजमिनी दिल्या आहेत. मात्र, वनजमिनीच्या मोबदल्यात संबंधित विभागाने जमीन परत केली अथवा नाही, याचाही शोध घेण्यात येणार आहे.

---------------

केंद्रीय पर्यावरण, वने मंत्रालयाकडून ताशेरे

राज्याच्या वनखात्याने विकासकामांसाठी वनजमिनी दिल्या असताना, त्या जमिनींचा वापर योग्य स्वरूपात झाला अथवा नाही, याचा तपास न घेतल्याबाबत केंद्रीय पर्यावरण, वने, वातावरण बदल मंत्रालयाचे एआयजी संदीप शर्मा यांनी ६ सप्टेंबर रोजी राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून वनजमिनीबाबत ताशेरे ओढले आहेत.