शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

मेळघाटात पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:25 IST

उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच मेळघाटातील जीवनदायिनी तापी, गडगा, सिपना, खंडू, खापरा या नद्यांचे पात्र कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीकाठावर वसलेल्या व नदीवरच विसंबून राहणाऱ्या गावांना जनावरांसाठी पाण्याचीच नव्हे, शरीर स्वच्छ करण्यासाठीही समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी नदीपात्रात झरे बनवून तृष्णातृप्ती करावी लागत आहे.

ठळक मुद्देनदी-नाले आटले : धारणी शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा

श्यामकांत पाण्डेय ।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच मेळघाटातील जीवनदायिनी तापी, गडगा, सिपना, खंडू, खापरा या नद्यांचे पात्र कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीकाठावर वसलेल्या व नदीवरच विसंबून राहणाऱ्या गावांना जनावरांसाठी पाण्याचीच नव्हे, शरीर स्वच्छ करण्यासाठीही समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी नदीपात्रात झरे बनवून तृष्णातृप्ती करावी लागत आहे.मेळघाटची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणाºया धारणी शहरातही आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पाण्याच्या वापरात काटकसर करावयाची सूचना धारणी नगरपंचायतच्या अध्यक्ष रजियाबी सरफुद्दीन यांनी केली आहे. यंदाचा उन्हाळा अत्यंत तापदायक व त्रासदायक ठरणार असल्याचा अंदाज जलसंधारण विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे तालुकावासीयांनी आजपासूनच काटकसरी करण्याची आवश्यकता आहे.अवैध उपसा नद्यांसाठी अभिशापमेळघाटातील वीज समस्या १३२ के.व्ही. वाहिनीमुळे संपुष्टात आली. त्यामुळे २४ तास वीजपुरवठा उपलब्ध होत असल्याने विहिरी व बोअरवेलचे जाळे गावोगावी निर्माण झाले आहे. पाण्याचा पर्याय जेथे उपलब्ध नाही, तेथे नदी-नाल्यांचे पात्र लक्ष्य करण्यात आले. रबी पिकासाठी नदी-नाल्यातून विना परवानगी सर्रास अवैधरीत्या पाणी उपसा करण्यात आला. आता उन्हाळी मुगासाठीही अवैध उपसा सुरू असल्याने नदी-नाल्यांचे पात्र कोरडे पडल्याने त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विजेअभावी रखडल्या योजनामेळघाटातील जवळपास सर्वच गावांमध्ये जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. काही गावांमध्ये तर दोन-तीन योजना अस्तित्वात आहे. मात्र, पाण्याचे योग्य स्रोत नसल्याने अनेक गावांना आतापासूनच पाणीटंचाईचा झळ बसणे सुरू झाले आहे. या योजना पूर्वी विजेअभावी रखडत असताना, आता विहिरीचे पाणी संपल्याने गावकºयांना पाण्यासाठी एक-दोन किमी पायपीट करावी लागत आहे.धारणी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी वाचविण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यास गावालगतच्या विहिरी व बोअरवेल अधिग्रहण करण्याची योजना आहे. त्यासाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. सध्या एकही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केले नाही.- उमेश देशमुख, गटविकास अधिकारी, पं. स. धारणी.