शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
3
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
4
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
5
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
6
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
7
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
8
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
9
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
10
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
11
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
12
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
13
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
14
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
15
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
16
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
17
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
18
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
19
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
20
Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."

मेळघाटात पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:25 IST

उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच मेळघाटातील जीवनदायिनी तापी, गडगा, सिपना, खंडू, खापरा या नद्यांचे पात्र कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीकाठावर वसलेल्या व नदीवरच विसंबून राहणाऱ्या गावांना जनावरांसाठी पाण्याचीच नव्हे, शरीर स्वच्छ करण्यासाठीही समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी नदीपात्रात झरे बनवून तृष्णातृप्ती करावी लागत आहे.

ठळक मुद्देनदी-नाले आटले : धारणी शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा

श्यामकांत पाण्डेय ।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच मेळघाटातील जीवनदायिनी तापी, गडगा, सिपना, खंडू, खापरा या नद्यांचे पात्र कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीकाठावर वसलेल्या व नदीवरच विसंबून राहणाऱ्या गावांना जनावरांसाठी पाण्याचीच नव्हे, शरीर स्वच्छ करण्यासाठीही समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी नदीपात्रात झरे बनवून तृष्णातृप्ती करावी लागत आहे.मेळघाटची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणाºया धारणी शहरातही आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पाण्याच्या वापरात काटकसर करावयाची सूचना धारणी नगरपंचायतच्या अध्यक्ष रजियाबी सरफुद्दीन यांनी केली आहे. यंदाचा उन्हाळा अत्यंत तापदायक व त्रासदायक ठरणार असल्याचा अंदाज जलसंधारण विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे तालुकावासीयांनी आजपासूनच काटकसरी करण्याची आवश्यकता आहे.अवैध उपसा नद्यांसाठी अभिशापमेळघाटातील वीज समस्या १३२ के.व्ही. वाहिनीमुळे संपुष्टात आली. त्यामुळे २४ तास वीजपुरवठा उपलब्ध होत असल्याने विहिरी व बोअरवेलचे जाळे गावोगावी निर्माण झाले आहे. पाण्याचा पर्याय जेथे उपलब्ध नाही, तेथे नदी-नाल्यांचे पात्र लक्ष्य करण्यात आले. रबी पिकासाठी नदी-नाल्यातून विना परवानगी सर्रास अवैधरीत्या पाणी उपसा करण्यात आला. आता उन्हाळी मुगासाठीही अवैध उपसा सुरू असल्याने नदी-नाल्यांचे पात्र कोरडे पडल्याने त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विजेअभावी रखडल्या योजनामेळघाटातील जवळपास सर्वच गावांमध्ये जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. काही गावांमध्ये तर दोन-तीन योजना अस्तित्वात आहे. मात्र, पाण्याचे योग्य स्रोत नसल्याने अनेक गावांना आतापासूनच पाणीटंचाईचा झळ बसणे सुरू झाले आहे. या योजना पूर्वी विजेअभावी रखडत असताना, आता विहिरीचे पाणी संपल्याने गावकºयांना पाण्यासाठी एक-दोन किमी पायपीट करावी लागत आहे.धारणी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी वाचविण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यास गावालगतच्या विहिरी व बोअरवेल अधिग्रहण करण्याची योजना आहे. त्यासाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. सध्या एकही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केले नाही.- उमेश देशमुख, गटविकास अधिकारी, पं. स. धारणी.