शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

मेळघाटात पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:25 IST

उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच मेळघाटातील जीवनदायिनी तापी, गडगा, सिपना, खंडू, खापरा या नद्यांचे पात्र कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीकाठावर वसलेल्या व नदीवरच विसंबून राहणाऱ्या गावांना जनावरांसाठी पाण्याचीच नव्हे, शरीर स्वच्छ करण्यासाठीही समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी नदीपात्रात झरे बनवून तृष्णातृप्ती करावी लागत आहे.

ठळक मुद्देनदी-नाले आटले : धारणी शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा

श्यामकांत पाण्डेय ।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच मेळघाटातील जीवनदायिनी तापी, गडगा, सिपना, खंडू, खापरा या नद्यांचे पात्र कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीकाठावर वसलेल्या व नदीवरच विसंबून राहणाऱ्या गावांना जनावरांसाठी पाण्याचीच नव्हे, शरीर स्वच्छ करण्यासाठीही समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी नदीपात्रात झरे बनवून तृष्णातृप्ती करावी लागत आहे.मेळघाटची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणाºया धारणी शहरातही आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पाण्याच्या वापरात काटकसर करावयाची सूचना धारणी नगरपंचायतच्या अध्यक्ष रजियाबी सरफुद्दीन यांनी केली आहे. यंदाचा उन्हाळा अत्यंत तापदायक व त्रासदायक ठरणार असल्याचा अंदाज जलसंधारण विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे तालुकावासीयांनी आजपासूनच काटकसरी करण्याची आवश्यकता आहे.अवैध उपसा नद्यांसाठी अभिशापमेळघाटातील वीज समस्या १३२ के.व्ही. वाहिनीमुळे संपुष्टात आली. त्यामुळे २४ तास वीजपुरवठा उपलब्ध होत असल्याने विहिरी व बोअरवेलचे जाळे गावोगावी निर्माण झाले आहे. पाण्याचा पर्याय जेथे उपलब्ध नाही, तेथे नदी-नाल्यांचे पात्र लक्ष्य करण्यात आले. रबी पिकासाठी नदी-नाल्यातून विना परवानगी सर्रास अवैधरीत्या पाणी उपसा करण्यात आला. आता उन्हाळी मुगासाठीही अवैध उपसा सुरू असल्याने नदी-नाल्यांचे पात्र कोरडे पडल्याने त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विजेअभावी रखडल्या योजनामेळघाटातील जवळपास सर्वच गावांमध्ये जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. काही गावांमध्ये तर दोन-तीन योजना अस्तित्वात आहे. मात्र, पाण्याचे योग्य स्रोत नसल्याने अनेक गावांना आतापासूनच पाणीटंचाईचा झळ बसणे सुरू झाले आहे. या योजना पूर्वी विजेअभावी रखडत असताना, आता विहिरीचे पाणी संपल्याने गावकºयांना पाण्यासाठी एक-दोन किमी पायपीट करावी लागत आहे.धारणी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी वाचविण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यास गावालगतच्या विहिरी व बोअरवेल अधिग्रहण करण्याची योजना आहे. त्यासाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. सध्या एकही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केले नाही.- उमेश देशमुख, गटविकास अधिकारी, पं. स. धारणी.