शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मेळघाटात पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:25 IST

उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच मेळघाटातील जीवनदायिनी तापी, गडगा, सिपना, खंडू, खापरा या नद्यांचे पात्र कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीकाठावर वसलेल्या व नदीवरच विसंबून राहणाऱ्या गावांना जनावरांसाठी पाण्याचीच नव्हे, शरीर स्वच्छ करण्यासाठीही समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी नदीपात्रात झरे बनवून तृष्णातृप्ती करावी लागत आहे.

ठळक मुद्देनदी-नाले आटले : धारणी शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा

श्यामकांत पाण्डेय ।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच मेळघाटातील जीवनदायिनी तापी, गडगा, सिपना, खंडू, खापरा या नद्यांचे पात्र कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीकाठावर वसलेल्या व नदीवरच विसंबून राहणाऱ्या गावांना जनावरांसाठी पाण्याचीच नव्हे, शरीर स्वच्छ करण्यासाठीही समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी नदीपात्रात झरे बनवून तृष्णातृप्ती करावी लागत आहे.मेळघाटची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणाºया धारणी शहरातही आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पाण्याच्या वापरात काटकसर करावयाची सूचना धारणी नगरपंचायतच्या अध्यक्ष रजियाबी सरफुद्दीन यांनी केली आहे. यंदाचा उन्हाळा अत्यंत तापदायक व त्रासदायक ठरणार असल्याचा अंदाज जलसंधारण विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे तालुकावासीयांनी आजपासूनच काटकसरी करण्याची आवश्यकता आहे.अवैध उपसा नद्यांसाठी अभिशापमेळघाटातील वीज समस्या १३२ के.व्ही. वाहिनीमुळे संपुष्टात आली. त्यामुळे २४ तास वीजपुरवठा उपलब्ध होत असल्याने विहिरी व बोअरवेलचे जाळे गावोगावी निर्माण झाले आहे. पाण्याचा पर्याय जेथे उपलब्ध नाही, तेथे नदी-नाल्यांचे पात्र लक्ष्य करण्यात आले. रबी पिकासाठी नदी-नाल्यातून विना परवानगी सर्रास अवैधरीत्या पाणी उपसा करण्यात आला. आता उन्हाळी मुगासाठीही अवैध उपसा सुरू असल्याने नदी-नाल्यांचे पात्र कोरडे पडल्याने त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विजेअभावी रखडल्या योजनामेळघाटातील जवळपास सर्वच गावांमध्ये जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. काही गावांमध्ये तर दोन-तीन योजना अस्तित्वात आहे. मात्र, पाण्याचे योग्य स्रोत नसल्याने अनेक गावांना आतापासूनच पाणीटंचाईचा झळ बसणे सुरू झाले आहे. या योजना पूर्वी विजेअभावी रखडत असताना, आता विहिरीचे पाणी संपल्याने गावकºयांना पाण्यासाठी एक-दोन किमी पायपीट करावी लागत आहे.धारणी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी वाचविण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यास गावालगतच्या विहिरी व बोअरवेल अधिग्रहण करण्याची योजना आहे. त्यासाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. सध्या एकही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केले नाही.- उमेश देशमुख, गटविकास अधिकारी, पं. स. धारणी.