शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

रस्ते, नळाचे पाणी नाही; नाल्याही तुंबल्या!

By admin | Updated: May 8, 2016 00:09 IST

शहराची वाढती लोकसंख्या पाहता दाट वस्तीतून विरळ वस्तीकडे नागरिक आगेकूच करीत आहेत. मात्र नवीन वस्त्यांना पाहिजे तशा मूलभूत सुविधा मिळत नाही.

महापौरांच्या प्रभागात मूलभूत सुविधांची वानवा : हरिशांती कॉलनी, खंडेलवालनगर, सीतारामदासबाबा नगरअमरावती : शहराची वाढती लोकसंख्या पाहता दाट वस्तीतून विरळ वस्तीकडे नागरिक आगेकूच करीत आहेत. मात्र नवीन वस्त्यांना पाहिजे तशा मूलभूत सुविधा मिळत नाही. शहराच्या शेवट वसलेल्या या वस्त्यांमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न 'लोकमत आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत शनिवारी घेण्यात आला.लोकमत चमुने मध्यवस्तीपासून ७ किमी अंतरावरीला खंडेलवाल ले-आऊटमधील संत सीतारामदास बाबा नगरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. परिसरात व्यवस्थित रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नाही तसेच सांडपाण्याची विल्हेवाट योग्यरीत्या लागत नाही. विशेष म्हणजे हा नेमाणी प्रभाग क्रमांक ३९ हा महापौरांच्या देखरेखित असतानाही नागरिक मुलभुत सुविधापासून वंचीत आहे. बडनेरानजीकच्या संत सीताराम बाबा नगर हे २००५ मध्ये वसलेले आहे. विरळ वस्तीचा या भाग जवळपास ७० कुटुंबीयांचे ४०० सदस्य वास्तव्यास आहते. मध्यवर्गीय नागरिकांच्या वस्त्या वाढत आहेत, मात्र, विकासांच्या व मूलभूत सुविधांपासून आजही हा भाग वंचित असल्याची ओरड नागरिकांमध्ये होत आहे. विशेष म्हणजे हा प्रभाग महापौरांचा आहे, त्यांनी लक्ष देऊन नागरिकांच्या समस्यां जाणून घ्याव्यात, अशी एकमुखी प्रतिक्रिया नागरिकांची आहे. मात्र, महापौर केवळ विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगीच प्रभागात येतात, असा आरोपही नागरिकांचा आहे. साईनगरातून अकोलीकडे जाणाऱ्या मार्गावरून संत सीतारामदास बाबा नगरात जाण्यासाठी रस्ता आहे. तेथूनच पुढील परिसरातील रस्त्यांची दुर्दशा बघायला मिळते. या नगरात जाण्यासाठी बडनेरामार्गावरून रस्ता आहे, मात्र, एकेरी वाहन जाईल इतकाच तो रस्ता आहे, त्यातच त्याच रस्त्यावर एक छोटासा पूल आहे. पुलाला कठडे नसल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. रस्त्याचे खस्ता हाल पाहता रहिवाशांना घरापर्यंत जाणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात नागरिकांना या मार्गावरून जाताना नाहक त्रास सहन करावा लागतो. या परिसरापासून कोसोदूर रुग्णालये आहेत. त्यामुळे आपात्कालीन स्थिती नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. परिसरात कचरा कन्टेंनर नसल्यामुळे ढिगारे बनले आहे. काही घराना नाल्या आहेत, तर काहीना नाल्या सुध्दा नाहीत, त्यातच नाल्यांमध्ये स्वच्छता होत नसल्यामुळे सांडपाण्यांनी नाल्या तुंबल्या आहेत. अनेकदा तर नाल्यातील सांडपाणी नागरिकांच्या घरात सुध्दा घुसल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. सांडपाणी व कचऱ्यांची विल्हेवाट योग्यरित्या होत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)