शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
4
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
5
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
6
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
7
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
8
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
9
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
10
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
11
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
12
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
13
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
14
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
15
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
16
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
17
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
18
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
19
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
20
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले

राजुराबाजारात पाणीपुरवठा नाही

By admin | Updated: June 22, 2016 00:14 IST

राजुराबाजार ग्रामपंचायतीला ११ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरविले जाते. परंतु १२ दिवसांपासून पाणीपुरवठा योजनेने पुरवठा बंद केल्याने नागरिकांचे हाल होत आहे.

नागरिक संतप्त : ११ गाव पाणीपुरवठा योजनेवर धडक आंदोलन राजुराबाजार : राजुराबाजार ग्रामपंचायतीला ११ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरविले जाते. परंतु १२ दिवसांपासून पाणीपुरवठा योजनेने पुरवठा बंद केल्याने नागरिकांचे हाल होत आहे. ग्रामपंचायतीने विनवण्या करूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याने उपसरपंचासह शेकडो नागरिक व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व्हाल्व्ह सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर ठाणेदार दिवेच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले. पाच दिवसांत पाणीपुरवठा सुरू न झाल्यास तीव्र्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. राजुराबाजार गाव सात हजार लोकवस्तीचे आहे. येथे ११ गाव राजुराबाजार ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. परंतु मागील १२ दिवसांपासून गावाचा पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांमध्ये असंतोष उफाळला असून त्यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अखेर नागरिकांचा असंतोष अनावर होऊन शेकडोे नागरिकांसह सरपंचा रेखा साबळे, उपसरपंच शिवा शिवहरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर काळे, तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे, गजू ढोकेसह शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी दुपारी साडेचार वाजतादरम्यान पाणीपुरवठा योजनेवर धडक देऊन व्हॉल्व्ह सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार गोरख दिवेंसह पोलीस कर्मचारी राजुराबाजारात दाखल होऊन समस्या समजावून घेतली. यावेळी पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष पांडुरंग निकम उपस्थित नसल्याने माजी अध्यक्ष किशोर गोमकाळे यांनी माहिती दिली. नागरिकांची समजूत घातल्यांनतर पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. परंतु पाच दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)