शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

राजुराबाजारात पाणीपुरवठा नाही

By admin | Updated: June 22, 2016 00:14 IST

राजुराबाजार ग्रामपंचायतीला ११ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरविले जाते. परंतु १२ दिवसांपासून पाणीपुरवठा योजनेने पुरवठा बंद केल्याने नागरिकांचे हाल होत आहे.

नागरिक संतप्त : ११ गाव पाणीपुरवठा योजनेवर धडक आंदोलन राजुराबाजार : राजुराबाजार ग्रामपंचायतीला ११ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरविले जाते. परंतु १२ दिवसांपासून पाणीपुरवठा योजनेने पुरवठा बंद केल्याने नागरिकांचे हाल होत आहे. ग्रामपंचायतीने विनवण्या करूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याने उपसरपंचासह शेकडो नागरिक व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व्हाल्व्ह सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर ठाणेदार दिवेच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले. पाच दिवसांत पाणीपुरवठा सुरू न झाल्यास तीव्र्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. राजुराबाजार गाव सात हजार लोकवस्तीचे आहे. येथे ११ गाव राजुराबाजार ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. परंतु मागील १२ दिवसांपासून गावाचा पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांमध्ये असंतोष उफाळला असून त्यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अखेर नागरिकांचा असंतोष अनावर होऊन शेकडोे नागरिकांसह सरपंचा रेखा साबळे, उपसरपंच शिवा शिवहरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर काळे, तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे, गजू ढोकेसह शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी दुपारी साडेचार वाजतादरम्यान पाणीपुरवठा योजनेवर धडक देऊन व्हॉल्व्ह सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार गोरख दिवेंसह पोलीस कर्मचारी राजुराबाजारात दाखल होऊन समस्या समजावून घेतली. यावेळी पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष पांडुरंग निकम उपस्थित नसल्याने माजी अध्यक्ष किशोर गोमकाळे यांनी माहिती दिली. नागरिकांची समजूत घातल्यांनतर पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. परंतु पाच दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)