शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

सात महिन्यांत शासनाकडून रुपयाही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:29 PM

शासनाकडून निधी आणि मार्गदर्शनाबाबत होणाºया दिरंगाईमुळे मागील सात महिन्यांपासून जिल्हा परिषदेत एक दमडीचाही निधी आलेला नाही. जो अखर्चित आहे, त्यालाही खर्चाची मान्यता देण्याची तत्परता शासनाने दाखवलेली नाही.

ठळक मुद्देझेडपीची स्थिती : अखर्चित निधीलाही मान्यता नसल्याने विकासकामे ठप्प

जितेंद्र दखने ।आॅनलाईन लोकमतअमरावती : शासनाकडून निधी आणि मार्गदर्शनाबाबत होणाºया दिरंगाईमुळे मागील सात महिन्यांपासून जिल्हा परिषदेत एक दमडीचाही निधी आलेला नाही. जो अखर्चित आहे, त्यालाही खर्चाची मान्यता देण्याची तत्परता शासनाने दाखवलेली नाही. निधी नसल्याने सदस्य आणि ठेकेदारांना तोंड देताना पदाधिकारी, अधिकाºयांची पंचाईत होत आहे. निधीअभावी जिल्हा परिषद अंतर्गत होणारी विकासकामे ठप्प झाली आहेत.विकासकामांतील ३० टक्के निधीची कपात, अखर्चित रक्कम परत मागवली. जीएमटीसह निविदा काढण्यासाठी पूर्वीची निविदा रद्द, खर्चास मान्यता देण्यातील प्रशासकीय दिरंगाई, डीपीडीसीला निधी वाटपाचे आदेश न देणे, लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांच्या निधी खर्चास मान्यात न देणे, बांधकाम, जनसुविधा पेयजल योजनांसाठी केंद्राच्या हिश्श्याची लावलेली आडकाठी या सर्वांमुळे जिल्हा परिषदेचा दरवर्षीप्रमाणे मंजूर असतानाही निधी मिळालेला नाही. ३० टक्क््यांच्या नियमामुळे ३०० कोटींपैकी २०० कोटींपर्यंत विकास निधी मिळण्याची शक्यता आहे.सत्ताधारी हतबलअखर्चित रक्कम मात्र ३० कोटींवर परत मागवून घेतली असून, त्याच्या फेरखर्चाची मागणी जिल्हा परिषदेने करूनही याची दखल घेतलेली नाही. लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या कामांची तसेच अपंग कल्याण योजनेंतर्गत करावयाच्या खर्चात फेरमान्यता देण्याचाही विषय प्रलंबित आहे. परिणामी मान्यतेअभावी कामे अडकून पडली आहेत.रस्त्याच्या बाबतीतही निधी मागणी करुन एक दमडीही दिलेली नाही. डीपीसीकडून जो निधी मंजूर आहेत. पण त्यातील निधीसुद्धा मिळत नाही, तर काही निधी खर्चासाठी शासनाचे आदेशच नसल्यामुळे पडून आहे. एकंदरीत जिल्हा परिषदेत निधी नाही अन् कामेही नसल्याने सदस्यांमध्ये नाराजी आहे. यामुळे नागरिकांच्या रोषाला पदाधिकाºयांना बळी पडावे लागत आहे.केवळ चर्चा : पदाधिकाऱ्यांची व्यथाजिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन आठ महिने झाले आहेत. सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यापलीकडे सदस्यांना मतदारसंघात एक रुपयाचेही काम अजून करता आलेले नाही. जिल्हा नियोजन समितीची निवडणूक होऊन दोन ते तीन महिने होत आले तरीही अजून बैठक झालेली नसल्यामुळे निधी मंजुरी प्रकरणे अडकून पडली आहेत. ठेकेदारांची बिले अडकली आहेत. सदस्यांवर मतदारसंघातून दबाव येत असल्याने ते पदाधिकाऱ्यांसमोर येऊन आपली व्यथा मांडत आहेत.