शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-परतवाडा मार्गावर सहा वर्षापासून जॉबवर्क नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:14 IST

परतवाडा : वरिष्ठांच्या आदेशान्वये अमरावती-परतवाडा राज्य महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरच्या अधिकाऱ्यांना सन २०१५ पासून जॉबवर्क घेताच आले नाही. ...

परतवाडा : वरिष्ठांच्या आदेशान्वये अमरावती-परतवाडा राज्य महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरच्या अधिकाऱ्यांना सन २०१५ पासून जॉबवर्क घेताच आले नाही. त्यामुळे या राज्य महामार्गाची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. खड्ड्यांचे या रस्त्यावर साम्राज्य पसरले आहे.

सन २०१५ मध्ये राष्ट्रीय महामार्गाचे स्वप्न नागरिकांनसह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे ठेवले गेले. या स्वप्नपूर्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या मार्गाचे सर्वेक्षण केले गेले. डीपीआर मंजूर केला गेला. एवढेच नव्हे तर बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हे स्वप्न भावले. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लागलीच या रस्त्यावर कुठलेही काम, कुठलाही जॉबवर्क घेण्यात येऊ नये, असे निर्देश अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावर अचलपूरच्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे वरिष्ठांचे निर्देश पाळलेत. बघता बघता रस्त्यांची दुर्दशा शब्दांपलीकडे पोहोचली. दरम्यान मांजर आडवी गेली आणि राष्ट्रीय महामार्गाचे स्वप्न धुळीस मिळाले.

दरम्यान २०१५ पासून या रस्त्याचे भिजतघोंगडे असतानाच सन २०१८ मध्ये या रस्त्याच्या अनुषंगाने एशियन डेव्हलपमेंट बँकेचे दुसरे स्वप्न दाखवल्या गेले. या स्वप्नपूर्तीकरिता एशियन डेव्हलपमेंट बँकेने या रस्त्याचे सर्वेक्षण करून घेतले. डीपीआरही बनविला. हे स्वप्न पूर्णत्वास जाण्याच्या अंतिम टप्प्यात असतानाच परत एकदा मांजर आडवी गेल्याने रस्त्याची दुर्दशा त्यापेक्षाही अधिक झाली.

अमरावती-परतवाडा असा ५४ किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून एकापेक्षा अधिक विधानसभा क्षेत्रातून तो जातो. या रस्त्याची स्थिती बघता अमरावती वरून वलगाव, वायगाव, आष्टी, पूर्णा नगर पर्यंत या रस्त्यावर संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जॉब वर्क घेतल्यामुळे, त्या दरम्यानची रस्त्याची स्थिती व्यवस्थित आहे. खड्ड्यांचे प्रमाण नगण्य आहे.पुढे हाच रस्ता अचलपूर विधानसभा क्षेत्रातून जातो. तेव्हा या दरम्यानची या मार्गाची स्थिती अत्यंत बिकट बनविला आहे. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

बॉक्स

वाहतूक वाढली

अमरावती परतवाडा बऱ्हाणपूर इंदोर या आंतरराज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. यात जड वाहनांची वाहतूक लक्षवेधक ठरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोंदीनुसार हजारो वाहनांची या रस्त्याने ये जा असून हजारो मॅट्रिक टन वजनाची ही वाहतूक आहे.