शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-परतवाडा मार्गावर सहा वर्षापासून जॉबवर्क नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:14 IST

परतवाडा : वरिष्ठांच्या आदेशान्वये अमरावती-परतवाडा राज्य महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरच्या अधिकाऱ्यांना सन २०१५ पासून जॉबवर्क घेताच आले नाही. ...

परतवाडा : वरिष्ठांच्या आदेशान्वये अमरावती-परतवाडा राज्य महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरच्या अधिकाऱ्यांना सन २०१५ पासून जॉबवर्क घेताच आले नाही. त्यामुळे या राज्य महामार्गाची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. खड्ड्यांचे या रस्त्यावर साम्राज्य पसरले आहे.

सन २०१५ मध्ये राष्ट्रीय महामार्गाचे स्वप्न नागरिकांनसह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे ठेवले गेले. या स्वप्नपूर्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या मार्गाचे सर्वेक्षण केले गेले. डीपीआर मंजूर केला गेला. एवढेच नव्हे तर बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हे स्वप्न भावले. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लागलीच या रस्त्यावर कुठलेही काम, कुठलाही जॉबवर्क घेण्यात येऊ नये, असे निर्देश अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावर अचलपूरच्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे वरिष्ठांचे निर्देश पाळलेत. बघता बघता रस्त्यांची दुर्दशा शब्दांपलीकडे पोहोचली. दरम्यान मांजर आडवी गेली आणि राष्ट्रीय महामार्गाचे स्वप्न धुळीस मिळाले.

दरम्यान २०१५ पासून या रस्त्याचे भिजतघोंगडे असतानाच सन २०१८ मध्ये या रस्त्याच्या अनुषंगाने एशियन डेव्हलपमेंट बँकेचे दुसरे स्वप्न दाखवल्या गेले. या स्वप्नपूर्तीकरिता एशियन डेव्हलपमेंट बँकेने या रस्त्याचे सर्वेक्षण करून घेतले. डीपीआरही बनविला. हे स्वप्न पूर्णत्वास जाण्याच्या अंतिम टप्प्यात असतानाच परत एकदा मांजर आडवी गेल्याने रस्त्याची दुर्दशा त्यापेक्षाही अधिक झाली.

अमरावती-परतवाडा असा ५४ किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून एकापेक्षा अधिक विधानसभा क्षेत्रातून तो जातो. या रस्त्याची स्थिती बघता अमरावती वरून वलगाव, वायगाव, आष्टी, पूर्णा नगर पर्यंत या रस्त्यावर संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जॉब वर्क घेतल्यामुळे, त्या दरम्यानची रस्त्याची स्थिती व्यवस्थित आहे. खड्ड्यांचे प्रमाण नगण्य आहे.पुढे हाच रस्ता अचलपूर विधानसभा क्षेत्रातून जातो. तेव्हा या दरम्यानची या मार्गाची स्थिती अत्यंत बिकट बनविला आहे. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

बॉक्स

वाहतूक वाढली

अमरावती परतवाडा बऱ्हाणपूर इंदोर या आंतरराज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. यात जड वाहनांची वाहतूक लक्षवेधक ठरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोंदीनुसार हजारो वाहनांची या रस्त्याने ये जा असून हजारो मॅट्रिक टन वजनाची ही वाहतूक आहे.