शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चांदूररेल्वे तालुक्यात मृगधारा बरसल्याच नाही

By admin | Updated: June 20, 2015 00:49 IST

तालुक्यातील खरिपाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करीत आहे.

खरिपाची पेरणी खोळंबली : शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत प्रभाकर भगोले चांदूररेल्वेतालुक्यातील खरिपाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. खरिपाच्या पेरणीचे मुहूर्त मृग नक्षत्राच्या सुरुवातीचा आठवड्यात करतात. परंतु गेल्या दोन वर्षांपासून मृग नक्षत्र कोरडे जात असल्याने खरिपाची पेरणीत खोळंबा निर्माण होत आहे. या चालू वर्षात आजपर्यंत पावसाची नोंद ३८.४४ मिली लिटरची आहे. मागील २०१४ च्या जून महिन्यात ५३.२४ मिली लिटरची नोंद आहे. या तुलनेने या वर्षी अगदी थोडा थोडकाच पाऊस झाला. चांदूर रेल्वे तालुक्यात ८२ टक्के जमीन कोरडवाहू व १८ टक्के शेती ओलिताखाली आहे. सिंचन व्यवस्था तालुक्यात आणल्याचा गवगवा होता. परंतु त्या सिंचन योजना अपुऱ्या असून त्या निधीअभावी भकास अवस्थेत आहेत. शेतकऱ्याला सिंचनाची व्यवस्था नसल्याने वरच्याच पावसावर विसंबून रहावे लागत असल्याने व पावसाने दडी मारल्यास पीक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून चालुक्यातील शेतकरी डबघाईस आला आहे.पावसाने दडी मारली असली तरी कृषी सेवा केंद्रावरही मागील वर्षीच्या तुलनेने बियाण्याची ३८ टक्के विक्री आजपर्यंत झाली आहे. मृग नक्षत्र कोरडे राहिले तर खरीप पिक पेरणी गंभीर परीणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी लांबल्याने शेतकरी वर्गात विवचनेचे वातावरण निर्माण झाले. राज्यात इतरत्र समाधानकारक पाऊस असताना तालुका मात्र ह्या पावसाच्या नोंदीला अपवाद ठरला आहे. बियाणे दरात भरमसाठ वाढ झाली असताना यावर्षी कापूस व सोयाबीन पीक पेरणीवर शेतकऱ्यांचा विशेष भर आहे. हे महागडे बियाणे आणून कोरडवाहू शेतात पेरणी केल्यास अपुऱ्या पावसाची शेतकरी वर्गात धास्ती निर्माण झाली आहे. कारण बियाणे आणि रासायनिक खतांचे भाव प्रचंड वधारल्याने दुबार पेरणीचा खर्च शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. कृषी विभागाचे प्रत्येक ग्रामपातळीवर कृषी सहायकाची नेमणूक असली तरी पेरणीसाठी अपुऱ्या पावसात कोणत्या बियाण्यांची पेरणी करावी यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता कृषी खाते अद्यापही प्रभावी ठरल्याचे दिसत नसल्याची शेतकरी वर्गात चर्चा सुरु आहे. बियाणे खरेदीसाठी चालविली लगबगअमरावती शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊ स कोसळत असताना चांदूररेल्वे तालुक्यात मात्र, पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आहेत. शुक्रवारी ७.३० वाजेपर्यंत शहरात पाऊ स नव्हता. शेतकऱ्यांनी शेत पेरणीसाठी सज्ज ठेवले आहे. बियाणे खरेदीसाठीसुध्दा बळीराजाने लगबग चालविली आहे. परंतु यंदा मात्र तालुक्यात दमदार पाऊ स कोसळल्याची नोंद झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह आहे.