शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

चांदूररेल्वे तालुक्यात मृगधारा बरसल्याच नाही

By admin | Updated: June 20, 2015 00:49 IST

तालुक्यातील खरिपाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करीत आहे.

खरिपाची पेरणी खोळंबली : शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत प्रभाकर भगोले चांदूररेल्वेतालुक्यातील खरिपाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. खरिपाच्या पेरणीचे मुहूर्त मृग नक्षत्राच्या सुरुवातीचा आठवड्यात करतात. परंतु गेल्या दोन वर्षांपासून मृग नक्षत्र कोरडे जात असल्याने खरिपाची पेरणीत खोळंबा निर्माण होत आहे. या चालू वर्षात आजपर्यंत पावसाची नोंद ३८.४४ मिली लिटरची आहे. मागील २०१४ च्या जून महिन्यात ५३.२४ मिली लिटरची नोंद आहे. या तुलनेने या वर्षी अगदी थोडा थोडकाच पाऊस झाला. चांदूर रेल्वे तालुक्यात ८२ टक्के जमीन कोरडवाहू व १८ टक्के शेती ओलिताखाली आहे. सिंचन व्यवस्था तालुक्यात आणल्याचा गवगवा होता. परंतु त्या सिंचन योजना अपुऱ्या असून त्या निधीअभावी भकास अवस्थेत आहेत. शेतकऱ्याला सिंचनाची व्यवस्था नसल्याने वरच्याच पावसावर विसंबून रहावे लागत असल्याने व पावसाने दडी मारल्यास पीक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून चालुक्यातील शेतकरी डबघाईस आला आहे.पावसाने दडी मारली असली तरी कृषी सेवा केंद्रावरही मागील वर्षीच्या तुलनेने बियाण्याची ३८ टक्के विक्री आजपर्यंत झाली आहे. मृग नक्षत्र कोरडे राहिले तर खरीप पिक पेरणी गंभीर परीणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी लांबल्याने शेतकरी वर्गात विवचनेचे वातावरण निर्माण झाले. राज्यात इतरत्र समाधानकारक पाऊस असताना तालुका मात्र ह्या पावसाच्या नोंदीला अपवाद ठरला आहे. बियाणे दरात भरमसाठ वाढ झाली असताना यावर्षी कापूस व सोयाबीन पीक पेरणीवर शेतकऱ्यांचा विशेष भर आहे. हे महागडे बियाणे आणून कोरडवाहू शेतात पेरणी केल्यास अपुऱ्या पावसाची शेतकरी वर्गात धास्ती निर्माण झाली आहे. कारण बियाणे आणि रासायनिक खतांचे भाव प्रचंड वधारल्याने दुबार पेरणीचा खर्च शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. कृषी विभागाचे प्रत्येक ग्रामपातळीवर कृषी सहायकाची नेमणूक असली तरी पेरणीसाठी अपुऱ्या पावसात कोणत्या बियाण्यांची पेरणी करावी यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता कृषी खाते अद्यापही प्रभावी ठरल्याचे दिसत नसल्याची शेतकरी वर्गात चर्चा सुरु आहे. बियाणे खरेदीसाठी चालविली लगबगअमरावती शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊ स कोसळत असताना चांदूररेल्वे तालुक्यात मात्र, पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आहेत. शुक्रवारी ७.३० वाजेपर्यंत शहरात पाऊ स नव्हता. शेतकऱ्यांनी शेत पेरणीसाठी सज्ज ठेवले आहे. बियाणे खरेदीसाठीसुध्दा बळीराजाने लगबग चालविली आहे. परंतु यंदा मात्र तालुक्यात दमदार पाऊ स कोसळल्याची नोंद झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह आहे.