शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

डेंग्यूच्या आजारात उपाययोजनापेक्षा ‘चमकोगिरी’ अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:11 IST

दरदिवशी रुग्ण वाढतच, खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च व कालावधी आवाक्याबाहेर..! अमित कांडलकर - गुरुकुंज (मोझरी) : डेंग्यूचे रुग्ण तिवसा ...

दरदिवशी रुग्ण वाढतच, खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च व कालावधी आवाक्याबाहेर..!

अमित कांडलकर - गुरुकुंज (मोझरी) : डेंग्यूचे रुग्ण तिवसा तालुक्यात दरदिवशी वाढतच असून आरोग्य विभागाच्यावतीने एक दिवस धूरळणी करून ‘चमकोगिरी’ करण्यात ही यंत्रणा वेळ खर्ची घालत आहे. अनेक गावांमध्ये डेंग्यू रुग्ण झपाट्याने वाढत असून, प्रामुख्याने गुरुकुंज मोझरी, तिवसा व अन्य गावांचा यात समावेश आहे.

डेंग्यू आजारात प्रथमोपचार घेण्यात अधिक दिवस घालवल्यास ग्रामस्थांना अनेक जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीला ताप काही तासांच्या अंतराने परत येतो. नंतर उलट्या, डोकेदुखीसारखी लक्षणे दिसतात. योग्य प्रतिजैविके तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वेळी मिळणे आवश्यक आहे. सोबतच सातत्याने उपचाराधीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्ण राहिल्यास आजारातून यशस्वी सुटका मिळते. गावपातळीवर आजार का पसरतोय, याची मिमांसा आवश्यक आहे. एकीकडे आरोग्य विभागाने एक दिवस कोरडा पाळा, असा धोशा चालवला आहे. पण, प्रत्यक्षात ‘आजरापेक्षा इलाज भारी’ अशी अवस्था आहे. गुरुदेवनगरसारख्या सुसंस्कृत नगरीत कित्येक वर्षांपासून नियमीत पाणीपुरवठा होत नसल्याचे विदारक सत्य आहे. निवडणूक काळात प्रत्येक उमेदवार नियमित पाणीपुरवठ्याचे आश्वासन देतो. प्रत्यक्षात कोणालाच या जनतेच्या अत्यावश्यक प्रश्नांचे देणे-घेणे नाही. प्रत्येकाने आपल्यापुरत्या सुविधा उपलब्ध करून घेतल्या आहेत. त्यामुळे एक दिवस घरात नळाला आलेले पाणी आठ-आठ दिवस साठवणूक करून पुरवावे लागते.

दुसरीकडे डेंग्यूच्या आजाराचे मूळ कारण असलेल्या डासांची निर्मितीच पाण्यावर होते. नागरी वस्तीत आज मोठे उकीरडे उघड्यावर आहेत.वसूल करण्यात येणाऱ्या आरोग्य करातून गावातील प्रत्येक सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यामध्ये डास प्रतिबंधक औषध फवारणी किमान महिन्यातून दोनदा झालीच पाहिजे. या पद्धतीच्या उपाययोजना वीस वर्षांआधीच्या कालखंडात नियमितपणे करण्यात येत होत्या. ऑईल मिश्रित औषधी दरमहा विशिष्ट तारखेला संपूर्ण गावात फवारली जायची. त्यामुळे डास निर्मितीला आळा बसायचा. त्यासाठी गावपातळीवर आवश्यक कर्मचारी प्रशासनाच्यावतीने नेमलेला राहायचा. आज ही योजनाच बासनात गुंडाळलीआहे. त्यामुळे डासांची पैदास नियंत्रित राहिली नाही. सर्वत्र चोरपावलांनी हा आजार दरदिवशी फोफावत असून, तिवसा तालुक्यातील या आजारातील बळीची संख्या बघता फारशा उपायोजनाच झालेल्या नाहीत.