शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूच्या आजारात उपाययोजनापेक्षा ‘चमकोगिरी’ अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:11 IST

दरदिवशी रुग्ण वाढतच, खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च व कालावधी आवाक्याबाहेर..! अमित कांडलकर - गुरुकुंज (मोझरी) : डेंग्यूचे रुग्ण तिवसा ...

दरदिवशी रुग्ण वाढतच, खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च व कालावधी आवाक्याबाहेर..!

अमित कांडलकर - गुरुकुंज (मोझरी) : डेंग्यूचे रुग्ण तिवसा तालुक्यात दरदिवशी वाढतच असून आरोग्य विभागाच्यावतीने एक दिवस धूरळणी करून ‘चमकोगिरी’ करण्यात ही यंत्रणा वेळ खर्ची घालत आहे. अनेक गावांमध्ये डेंग्यू रुग्ण झपाट्याने वाढत असून, प्रामुख्याने गुरुकुंज मोझरी, तिवसा व अन्य गावांचा यात समावेश आहे.

डेंग्यू आजारात प्रथमोपचार घेण्यात अधिक दिवस घालवल्यास ग्रामस्थांना अनेक जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीला ताप काही तासांच्या अंतराने परत येतो. नंतर उलट्या, डोकेदुखीसारखी लक्षणे दिसतात. योग्य प्रतिजैविके तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वेळी मिळणे आवश्यक आहे. सोबतच सातत्याने उपचाराधीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्ण राहिल्यास आजारातून यशस्वी सुटका मिळते. गावपातळीवर आजार का पसरतोय, याची मिमांसा आवश्यक आहे. एकीकडे आरोग्य विभागाने एक दिवस कोरडा पाळा, असा धोशा चालवला आहे. पण, प्रत्यक्षात ‘आजरापेक्षा इलाज भारी’ अशी अवस्था आहे. गुरुदेवनगरसारख्या सुसंस्कृत नगरीत कित्येक वर्षांपासून नियमीत पाणीपुरवठा होत नसल्याचे विदारक सत्य आहे. निवडणूक काळात प्रत्येक उमेदवार नियमित पाणीपुरवठ्याचे आश्वासन देतो. प्रत्यक्षात कोणालाच या जनतेच्या अत्यावश्यक प्रश्नांचे देणे-घेणे नाही. प्रत्येकाने आपल्यापुरत्या सुविधा उपलब्ध करून घेतल्या आहेत. त्यामुळे एक दिवस घरात नळाला आलेले पाणी आठ-आठ दिवस साठवणूक करून पुरवावे लागते.

दुसरीकडे डेंग्यूच्या आजाराचे मूळ कारण असलेल्या डासांची निर्मितीच पाण्यावर होते. नागरी वस्तीत आज मोठे उकीरडे उघड्यावर आहेत.वसूल करण्यात येणाऱ्या आरोग्य करातून गावातील प्रत्येक सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यामध्ये डास प्रतिबंधक औषध फवारणी किमान महिन्यातून दोनदा झालीच पाहिजे. या पद्धतीच्या उपाययोजना वीस वर्षांआधीच्या कालखंडात नियमितपणे करण्यात येत होत्या. ऑईल मिश्रित औषधी दरमहा विशिष्ट तारखेला संपूर्ण गावात फवारली जायची. त्यामुळे डास निर्मितीला आळा बसायचा. त्यासाठी गावपातळीवर आवश्यक कर्मचारी प्रशासनाच्यावतीने नेमलेला राहायचा. आज ही योजनाच बासनात गुंडाळलीआहे. त्यामुळे डासांची पैदास नियंत्रित राहिली नाही. सर्वत्र चोरपावलांनी हा आजार दरदिवशी फोफावत असून, तिवसा तालुक्यातील या आजारातील बळीची संख्या बघता फारशा उपायोजनाच झालेल्या नाहीत.