शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

डेंग्यूच्या आजारात उपाययोजनापेक्षा ‘चमकोगिरी’ अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:11 IST

दरदिवशी रुग्ण वाढतच, खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च व कालावधी आवाक्याबाहेर..! अमित कांडलकर - गुरुकुंज (मोझरी) : डेंग्यूचे रुग्ण तिवसा ...

दरदिवशी रुग्ण वाढतच, खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च व कालावधी आवाक्याबाहेर..!

अमित कांडलकर - गुरुकुंज (मोझरी) : डेंग्यूचे रुग्ण तिवसा तालुक्यात दरदिवशी वाढतच असून आरोग्य विभागाच्यावतीने एक दिवस धूरळणी करून ‘चमकोगिरी’ करण्यात ही यंत्रणा वेळ खर्ची घालत आहे. अनेक गावांमध्ये डेंग्यू रुग्ण झपाट्याने वाढत असून, प्रामुख्याने गुरुकुंज मोझरी, तिवसा व अन्य गावांचा यात समावेश आहे.

डेंग्यू आजारात प्रथमोपचार घेण्यात अधिक दिवस घालवल्यास ग्रामस्थांना अनेक जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीला ताप काही तासांच्या अंतराने परत येतो. नंतर उलट्या, डोकेदुखीसारखी लक्षणे दिसतात. योग्य प्रतिजैविके तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वेळी मिळणे आवश्यक आहे. सोबतच सातत्याने उपचाराधीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्ण राहिल्यास आजारातून यशस्वी सुटका मिळते. गावपातळीवर आजार का पसरतोय, याची मिमांसा आवश्यक आहे. एकीकडे आरोग्य विभागाने एक दिवस कोरडा पाळा, असा धोशा चालवला आहे. पण, प्रत्यक्षात ‘आजरापेक्षा इलाज भारी’ अशी अवस्था आहे. गुरुदेवनगरसारख्या सुसंस्कृत नगरीत कित्येक वर्षांपासून नियमीत पाणीपुरवठा होत नसल्याचे विदारक सत्य आहे. निवडणूक काळात प्रत्येक उमेदवार नियमित पाणीपुरवठ्याचे आश्वासन देतो. प्रत्यक्षात कोणालाच या जनतेच्या अत्यावश्यक प्रश्नांचे देणे-घेणे नाही. प्रत्येकाने आपल्यापुरत्या सुविधा उपलब्ध करून घेतल्या आहेत. त्यामुळे एक दिवस घरात नळाला आलेले पाणी आठ-आठ दिवस साठवणूक करून पुरवावे लागते.

दुसरीकडे डेंग्यूच्या आजाराचे मूळ कारण असलेल्या डासांची निर्मितीच पाण्यावर होते. नागरी वस्तीत आज मोठे उकीरडे उघड्यावर आहेत.वसूल करण्यात येणाऱ्या आरोग्य करातून गावातील प्रत्येक सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यामध्ये डास प्रतिबंधक औषध फवारणी किमान महिन्यातून दोनदा झालीच पाहिजे. या पद्धतीच्या उपाययोजना वीस वर्षांआधीच्या कालखंडात नियमितपणे करण्यात येत होत्या. ऑईल मिश्रित औषधी दरमहा विशिष्ट तारखेला संपूर्ण गावात फवारली जायची. त्यामुळे डास निर्मितीला आळा बसायचा. त्यासाठी गावपातळीवर आवश्यक कर्मचारी प्रशासनाच्यावतीने नेमलेला राहायचा. आज ही योजनाच बासनात गुंडाळलीआहे. त्यामुळे डासांची पैदास नियंत्रित राहिली नाही. सर्वत्र चोरपावलांनी हा आजार दरदिवशी फोफावत असून, तिवसा तालुक्यातील या आजारातील बळीची संख्या बघता फारशा उपायोजनाच झालेल्या नाहीत.