शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

डेंग्यूच्या आजारात उपाययोजनापेक्षा ‘चमकोगिरी’ अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:11 IST

दरदिवशी रुग्ण वाढतच, खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च व कालावधी आवाक्याबाहेर..! अमित कांडलकर - गुरुकुंज (मोझरी) : डेंग्यूचे रुग्ण तिवसा ...

दरदिवशी रुग्ण वाढतच, खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च व कालावधी आवाक्याबाहेर..!

अमित कांडलकर - गुरुकुंज (मोझरी) : डेंग्यूचे रुग्ण तिवसा तालुक्यात दरदिवशी वाढतच असून आरोग्य विभागाच्यावतीने एक दिवस धूरळणी करून ‘चमकोगिरी’ करण्यात ही यंत्रणा वेळ खर्ची घालत आहे. अनेक गावांमध्ये डेंग्यू रुग्ण झपाट्याने वाढत असून, प्रामुख्याने गुरुकुंज मोझरी, तिवसा व अन्य गावांचा यात समावेश आहे.

डेंग्यू आजारात प्रथमोपचार घेण्यात अधिक दिवस घालवल्यास ग्रामस्थांना अनेक जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीला ताप काही तासांच्या अंतराने परत येतो. नंतर उलट्या, डोकेदुखीसारखी लक्षणे दिसतात. योग्य प्रतिजैविके तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वेळी मिळणे आवश्यक आहे. सोबतच सातत्याने उपचाराधीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्ण राहिल्यास आजारातून यशस्वी सुटका मिळते. गावपातळीवर आजार का पसरतोय, याची मिमांसा आवश्यक आहे. एकीकडे आरोग्य विभागाने एक दिवस कोरडा पाळा, असा धोशा चालवला आहे. पण, प्रत्यक्षात ‘आजरापेक्षा इलाज भारी’ अशी अवस्था आहे. गुरुदेवनगरसारख्या सुसंस्कृत नगरीत कित्येक वर्षांपासून नियमीत पाणीपुरवठा होत नसल्याचे विदारक सत्य आहे. निवडणूक काळात प्रत्येक उमेदवार नियमित पाणीपुरवठ्याचे आश्वासन देतो. प्रत्यक्षात कोणालाच या जनतेच्या अत्यावश्यक प्रश्नांचे देणे-घेणे नाही. प्रत्येकाने आपल्यापुरत्या सुविधा उपलब्ध करून घेतल्या आहेत. त्यामुळे एक दिवस घरात नळाला आलेले पाणी आठ-आठ दिवस साठवणूक करून पुरवावे लागते.

दुसरीकडे डेंग्यूच्या आजाराचे मूळ कारण असलेल्या डासांची निर्मितीच पाण्यावर होते. नागरी वस्तीत आज मोठे उकीरडे उघड्यावर आहेत.वसूल करण्यात येणाऱ्या आरोग्य करातून गावातील प्रत्येक सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यामध्ये डास प्रतिबंधक औषध फवारणी किमान महिन्यातून दोनदा झालीच पाहिजे. या पद्धतीच्या उपाययोजना वीस वर्षांआधीच्या कालखंडात नियमितपणे करण्यात येत होत्या. ऑईल मिश्रित औषधी दरमहा विशिष्ट तारखेला संपूर्ण गावात फवारली जायची. त्यामुळे डास निर्मितीला आळा बसायचा. त्यासाठी गावपातळीवर आवश्यक कर्मचारी प्रशासनाच्यावतीने नेमलेला राहायचा. आज ही योजनाच बासनात गुंडाळलीआहे. त्यामुळे डासांची पैदास नियंत्रित राहिली नाही. सर्वत्र चोरपावलांनी हा आजार दरदिवशी फोफावत असून, तिवसा तालुक्यातील या आजारातील बळीची संख्या बघता फारशा उपायोजनाच झालेल्या नाहीत.