शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अमरावती विभागातील १७४९ सहकारी दुग्ध संस्था अवसायनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 11:31 IST

अमरावती विभागातील १७४९ सहकारी दुग्ध संस्था जून २०१८ च्या अहवालानुसार अवसायनात निघाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे१०७ संस्था बंद संस्था पुनरुज्जीवनाकरिता प्रयत्न शून्य

लोकमत न्यूज नेटवर्कसंदीप मानकर/अमरावती : विभागातील १७४९ सहकारी दुग्ध संस्था जून २०१८ च्या अहवालानुसार अवसायनात निघाल्याची माहिती आहे. यामध्ये १०७ प्राथमिक संस्था बंद अवस्थेत, तर फक्त १२१ प्राथमिक संस्था पश्चिम विदर्भात कार्यरत आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील नोंदणीकृत ४० संस्थांचा समावेश आहे. मात्र, अवसायनात निघालेल्या संस्था पुनर्जीवित करणे गरजेचे आहे. मात्र, यासाठी संबंधित विभागाचे प्रयत्न शून्य दिसून येत आहे. विदर्भात हजारो लीटर दुधाची रोजची आवक होत आहे.अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यांत १९७७ प्राथमिक संस्था नोंदणीकृत होत्या. त्यापैकी १७४९ संस्था जून २०१८ पर्यंत अवसायनात निघाल्यामुळे दुग्ध व्यवसायला शासकीय पातळीवर उतरती कळा आली आहे. सहकार विभागाकडे नोंदणीकृत प्राथमिक सहकारी दुग्ध संस्थेचे आॅडिट न करणे, नियमानुसार दर पाच वर्षाला संस्थेच्या निवडणुका न घेणे, सहकार कायदा १९६० नियम १९६१ नुसार तरतुदीचे पालन न करणे, नियमित दुग्ध संकलन न करणे, संस्थेचे नियमित रेकॉर्ड न ठेवणे आदी बाबींमुळे त्या-त्या सोसायटीच्या सहायक निबंधकांनी सदर संस्था अवसायनात काढल्या आहेत. अनेक संस्थांवर नियमानुसार अवसायकाची निवडसुद्धा करण्यात आली आहे. मात्र, सदर संस्था, पुनर्जीवित करण्यासाठी शासनाचे प्रयत्न शून्य असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला शासनाकडूनच प्रोत्साहन दिले जात आहे, तर दुसरीकडे शासकीय यंत्रणेपेक्षा खासगीत दुधाला चांगले भाव मिळत असल्याने अनेक दुग्ध व्यवसायकांनी या व्यवसायाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अवसायनात निघालेल्या संस्था पुन्हा कशा सुरू करता येतील? त्यांना मुख्य प्रवाहात कसे आणता येतील? याकरिता दुग्ध विकास विभागाने प्रयत्न करावे, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.                                                                नोंदणीकृत प्राथमिक संस्था      सुरू संस्था              बंद संस्था         अवसायनातील संस्था(जुन २०१८ पर्यंत) अमरावती                                                                 ५२३                                     ४०                           ०१                        ४८२अकोला                                                                      १७१                                   १८                         ४९                               १०४वाशिम                                                                       ११२                                    १४                        ०२                                ९६यवतमाळ                                                                    ५९५                                २५                        ११                             ५५९बुलडाणा                                                                   ५७६                                  २४                           ४४                            ५०८एकूण                                                                        १९७७                               १२१                             १०७                          १७४९संस्थेच्या सभासदांना जर संस्था पुनर्जीवित कराव्याची असेल तर त्यांनी नियमानुसार आवश्यक अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. त्यांनी सहकार कायद्यातील तरतुदींची पालन केल्यास संस्था पुनर्जीवित करणे शक्य आहे.- अनिरुद्ध राऊत, सहायक निबंधक सह. संस्था (पदुम)

टॅग्स :agricultureशेती