शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

विद्युत प्रवाहाने १४ जनावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:03 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर परिसरात १०, तर दर्यापूर तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात चार जनावरे विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने २४ तासांत दगावली. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या परिणामी वरूड तालुक्यात लाखोंचे नुकसान झाले. याशिवाय उमरी मंदिर येथे आठ ते दहा घरांची पडझड झाली.

ठळक मुद्देवादळी पावसाचा फटका : शिरपूर येथे १० जनावरांचा मृत्यू; येवदा, सावंगीतही थैमान

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर/येवदा/सावंगी जिचकार : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर परिसरात १०, तर दर्यापूर तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात चार जनावरे विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने २४ तासांत दगावली. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या परिणामी वरूड तालुक्यात लाखोंचे नुकसान झाले. याशिवाय उमरी मंदिर येथे आठ ते दहा घरांची पडझड झाली.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर येथे शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे गावठाण फीडरच्या उच्चदाब वाहिनीचे फेज तार गुंतल्याने शाॉर्ट सर्कीट झाले. त्यामुळे वीज प्रवाह खांब तसेच तणावाच्या तारांमधून ओल्या जमिनीत संचारला. यावेळी शिवारात आसपास चरत असलेल्या १० गाई वीजप्रवाहाच्या संपर्कात आल्याने दगावल्या. यामध्ये विश्वेश्वर पुसदकर, किसनराव पुसदकर, महेंद्र चव्हाण, दिगंबर उके, मनोहर ढोरे, माया सोनोने, दामोजी सोनोने, निवृत्ती सोनोने यांची प्रत्येकी एक, तर मुकुंदराव बर्डे यांच्या दोन गाई आहेत. गुराखी उकंडराव बर्डे यांनी प्रसंगावधान राखून आपला जीव वाचविला. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विलास शिंदे, कनिष्ठ अभियंता प्रतीक ढवळे यांच्या उपस्थितीत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.येवद्यातही पावसाचा कहरयेवदा परिसरातील पिंपळखुटा शिवारात शुक्रवारी सायंकाळी ४ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी प्रवीण ढोरे यांच्या शेतातील झाड विद्युत तारेवर पडले. जमिनीवर आलेल्या विद्युत तारांचा विनोद कराड, दिलीप काळे यांच्या गार्इंना स्पर्श झाल्यामुळे त्या ठार झाल्या. मालाबाई टापरे यांच्या दोन बकऱ्याही दगावल्या. तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी पंचनामा केला. लगतच्या उमरी मंदिर येथील आठ ते दहा घरांची पडझड झाली असून, गावकºयांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.सावंगी परिसरात थैमानवरूड तालुक्यातील सावंगी (जिचकार) सह गणेशपूर,जामठी, एकलविहीर परिसरात वादळी पावसाने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास थैमान घातले. यामुळे सावंगी गावातील घरावरील छप्पर, टिन, कौल उडाले, तर घरेसुद्धा कोलमडून पडली. तर शेखर वानखडे यांच्या घराचे छत उडाल्याने साठवून ठेवलेला चणा पाण्याने पूर्णत: खराब झाला. शंकर शेळके यांच्या घरासह अनेकांचे घरांचे छत उडाले. किशोर बूब यांच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळल्याने कडबा, कुटार तसेच कृषिअवजारे भस्मसात झाली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. गावातील घराची पडझड आणि छप्पर उडाल्याने अनेकांना बेघर होण्याची वेळ आली. झाडेसुद्धा उन्मळून पडली. यामुळे काही काळ वाहतूक बंद पडली असल्याचे सांगण्यात येते. गणेशपूर, जामठी, एकलविहीर परिसरातसुद्धा मोठया प्रमाणात नुकसान झाले.