शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

विद्युत प्रवाहाने १४ जनावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:03 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर परिसरात १०, तर दर्यापूर तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात चार जनावरे विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने २४ तासांत दगावली. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या परिणामी वरूड तालुक्यात लाखोंचे नुकसान झाले. याशिवाय उमरी मंदिर येथे आठ ते दहा घरांची पडझड झाली.

ठळक मुद्देवादळी पावसाचा फटका : शिरपूर येथे १० जनावरांचा मृत्यू; येवदा, सावंगीतही थैमान

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर/येवदा/सावंगी जिचकार : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर परिसरात १०, तर दर्यापूर तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात चार जनावरे विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने २४ तासांत दगावली. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या परिणामी वरूड तालुक्यात लाखोंचे नुकसान झाले. याशिवाय उमरी मंदिर येथे आठ ते दहा घरांची पडझड झाली.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर येथे शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे गावठाण फीडरच्या उच्चदाब वाहिनीचे फेज तार गुंतल्याने शाॉर्ट सर्कीट झाले. त्यामुळे वीज प्रवाह खांब तसेच तणावाच्या तारांमधून ओल्या जमिनीत संचारला. यावेळी शिवारात आसपास चरत असलेल्या १० गाई वीजप्रवाहाच्या संपर्कात आल्याने दगावल्या. यामध्ये विश्वेश्वर पुसदकर, किसनराव पुसदकर, महेंद्र चव्हाण, दिगंबर उके, मनोहर ढोरे, माया सोनोने, दामोजी सोनोने, निवृत्ती सोनोने यांची प्रत्येकी एक, तर मुकुंदराव बर्डे यांच्या दोन गाई आहेत. गुराखी उकंडराव बर्डे यांनी प्रसंगावधान राखून आपला जीव वाचविला. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विलास शिंदे, कनिष्ठ अभियंता प्रतीक ढवळे यांच्या उपस्थितीत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.येवद्यातही पावसाचा कहरयेवदा परिसरातील पिंपळखुटा शिवारात शुक्रवारी सायंकाळी ४ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी प्रवीण ढोरे यांच्या शेतातील झाड विद्युत तारेवर पडले. जमिनीवर आलेल्या विद्युत तारांचा विनोद कराड, दिलीप काळे यांच्या गार्इंना स्पर्श झाल्यामुळे त्या ठार झाल्या. मालाबाई टापरे यांच्या दोन बकऱ्याही दगावल्या. तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी पंचनामा केला. लगतच्या उमरी मंदिर येथील आठ ते दहा घरांची पडझड झाली असून, गावकºयांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.सावंगी परिसरात थैमानवरूड तालुक्यातील सावंगी (जिचकार) सह गणेशपूर,जामठी, एकलविहीर परिसरात वादळी पावसाने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास थैमान घातले. यामुळे सावंगी गावातील घरावरील छप्पर, टिन, कौल उडाले, तर घरेसुद्धा कोलमडून पडली. तर शेखर वानखडे यांच्या घराचे छत उडाल्याने साठवून ठेवलेला चणा पाण्याने पूर्णत: खराब झाला. शंकर शेळके यांच्या घरासह अनेकांचे घरांचे छत उडाले. किशोर बूब यांच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळल्याने कडबा, कुटार तसेच कृषिअवजारे भस्मसात झाली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. गावातील घराची पडझड आणि छप्पर उडाल्याने अनेकांना बेघर होण्याची वेळ आली. झाडेसुद्धा उन्मळून पडली. यामुळे काही काळ वाहतूक बंद पडली असल्याचे सांगण्यात येते. गणेशपूर, जामठी, एकलविहीर परिसरातसुद्धा मोठया प्रमाणात नुकसान झाले.