शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

-तर गुरूवारपासून कचऱ्याची वाहने परत पाठवू

By admin | Updated: February 2, 2015 22:58 IST

नजिकच्या सुकळी येथे महापालिकेच्यावतीने साकारण्यात आलेल्या कंपोस्ट डेपो इतरत्र हलविला नाही तर गुरूवारी ५ फेब्रुवारीपासून कचऱ्याची वाहने परत पाठवू, असा निर्वाणीचा इशारा

अमरावती : नजिकच्या सुकळी येथे महापालिकेच्यावतीने साकारण्यात आलेल्या कंपोस्ट डेपो इतरत्र हलविला नाही तर गुरूवारी ५ फेब्रुवारीपासून कचऱ्याची वाहने परत पाठवू, असा निर्वाणीचा इशारा परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. या अनुषंगाने सोमवारी आयुक्त अरूण डोंगरे यांना निवेदन सादर करण्यात आले.नगरसेवक प्रवीण हरमकर, माजी नगरसेवक बबन रडके, अब्दुल रफिक, अब्दुल गफ्फार राराणी, राजेश अंबाडकर, विलास पवार, आशीष अतकरे, राजा खारकर, मोहम्मद शकील, मधुकर खारकर, नितीन नाथे आदींच्या नेतृत्वात महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात पेठ अमरावती येथे सुकळी परिसरात साकारलेला कंपोस्ट डेपो इतरत्र हलविण्यात यावा, शहरातील कचऱ्याची पाचही झोनमध्ये विभागणी करावी, पेठ अमरावती कंपोस्ट डेपो येथे प्रस्तावित कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प थांबवून दुसरीकडे स्थानांतरित करावा, अशा विविध मागण्या यावेळी प्रशासनाकडे रेटून धरण्यात आल्या. यापूर्वी महापालिका प्रशासनाने घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शहरात झोननिहाय जागेची व्यवस्था करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे ठरविले होते. मात्र आमसभेत झालेल्या या निर्णयाला बगल देत केवळ पेठ अमरावती सुकळी परिसरातच कचरा डेपो निर्माण करण्यात आला आहे. दर दिवसाला कचरा डेपोकडे येणारी वाहने ही परिसरातील नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. कचऱ्याची टेकडी निर्माण झाल्यामुळे आरोग्य, शेती, पर्यावरण धोक्यात आले आहे. परकोटाच्या आत आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये या तुंबलेल्या कचऱ्यामुळे रोगराई पसरत असल्याचा आरोप नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी केला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी घेण्यात आलेली शेती ही सुपीक आहे. असे असताना तोकडे दर शेतकऱ्यांच्या हाती देण्यात आले, असा आरोपही करण्यात आला. शेती गेल्यामुळे बेरोजगारी निर्माण होऊन स्थानिकांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. कचरा डेपो इतरत्र हलविल्या गेला नाही तर याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे. यावेळी भानुदास लंगडे, अक्षय वाळके, कुसूम लंगडे, भावना नांदूरकर, वंदना अंबाडकर, रेखा देवे, राहूल लकडे, चंद्रशेखर फुलाडी, पवन भांगे, विशाल वानखडे आदी उपस्थित होते. यापूर्वी कचरा डेपोचे आरक्षण गायब झाल्याचा आरोपही प्रवीण हरमकर यांनी केला. (प्रतिनिधी)