शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

... तर दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:14 IST

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. या परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी शाळेतील ...

अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. या परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी शाळेतील अंतर्गत मूल्यमापनाने उत्तीर्ण होणार आहे. या पद्धतीने मिळालेल्या गुणांबाबत ते समाधानी नसतील, तर त्यांना गुण सुधारण्याची संधी शासन देणार आहे. बारावीच्या परीक्षेचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.

बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेर घेण्याचे नियोजन चालविल्याचे शिक्षण मंडळातून सांगण्यात येते. जिल्ह्यात बारावीचे विद्यार्थी संख्या आहे. बारावीचे नवे वेळापत्रक लवरच जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी, पालकांकडून होत आहे.

------------------

विद्यार्थी, पालक काय म्हणतात?

दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतिम मू्ल्यमापन करताना पूर्व परीक्षेबरोबरच नववीतील गुणांचाही विचार करावा.

- नंदिनी मराठे, बडनेरा.

परीक्षा पुढे गेल्याने विद्यार्थ्यांच्घया मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे परीक्षचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर व्हावे.

- श्रृती शर्मा, अमरावती.

बारावीची परीक्षा घेणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले. त्याचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केल्यास आम्हा विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येणार नाही.

- संघदीप चव्हाण, मोर्शी.

-----------------

शिक्षक संघटनेला काय वाटते?

राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्यच आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण, अभ्यासावरही परिणाम झाला आहे.

-राजेश सावरकर, प्रसिद्धी प्रमुख, प्राज्य राथमिक शिक्षक संघटना

दहावीची परीक्षा रद्दचा निर्णय दुर्देवी आहे. त्या रद्द करण्याऐवजी उशिरा घ्यायला हव्या होत्या. बारावीच्या परीक्षा होणार आहेत. त्यांच्याबाबत कोरोनाची भीती नाही का?

- विकास भालेराव, सदस्य राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती.

--------------------

मू्ल्यमापनात अडचण

काही शाळांमध्ये दहावीच्या पूर्वपरीक्षा झाल्या आहेत, तर काही शाळांमधील या परीक्षांना विद्यार्थ्यांना उपस्थित राहता आले नाही. त्याचे मूल्यमापन करण्यात अडचण येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील आकडेवारी

दहावीचे विद्यार्थी : ४०६६३

बारावीचे विद्यार्थी: ३५१३२