शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

तत्कालीन तहसीलदारावर होणार फौजदारी कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:16 IST

तालुक्यातील ७५ टक्के जमीन ओलिताखाली असताना सर्वच शेतकऱ्यांची जमीन जिरायती दाखवून चुकीची माहिती प्रशासनाला पाठविल्याने अनेक शेतकरी योग्य लाभापासून वंचित राहिले. याला तत्कालीन तहसीलदार कारणीभूत समजून फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबोंडअळीच्या अनुदानात घोळ : सिंचनापासून शेतकऱ्यांना ठेवले वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : तालुक्यातील ७५ टक्के जमीन ओलिताखाली असताना सर्वच शेतकऱ्यांची जमीन जिरायती दाखवून चुकीची माहिती प्रशासनाला पाठविल्याने अनेक शेतकरी योग्य लाभापासून वंचित राहिले. याला तत्कालीन तहसीलदार कारणीभूत समजून फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल मागितला.राज्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांना राज्य सरकारने आर्थिक मदत घोषित केली होती. यात तालुक्यातील २६ हजार ९०७ शेतकरी पात्र ठरले होते. शासनाने कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार ८००, तर ओलिताखालील जमिनीला १३ हजार ५०० रुपये हेक्टरी अनुदान घोषित केले. तत्कालीन तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी सर्वच शेतकºयांची जमीन जिरायती दाखविल्याने ओलिताखालील भागधारकांचे मोठे नुकसान झाले. यासंदर्भात आमदार वीरेंद्र जगताप यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून तत्कालीन तहसीलदारावर कारवाई करावी व ओलिताखालील भूधारकांना त्वरित अनुदान देण्याची मागणी केली होती.धामणगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात हे प्रकरण मांडले होते. तालुक्यात ७० टक्के जमीन ओलिताखाली असताना प्रशासनाने चुकीची माहिती देऊन शेतकºयांना शासनाच्या अनुदानापासून वंचित ठेवल्याची वस्तुस्थिती प्रताप अडसड यांनी मांडली होती. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट चौकशीचे आदेश दिले होते.विभागीय आयुक्तांनी मागितला अहवालभारतीय किसान संघाचे तालुकाध्यक्ष शंकर कुर्वे व पदाधिकाऱ्यांनी गत आठवड्यात विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांवरील अन्यायाची कैफियत मांडली. सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तत्कालीन तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांची चौकशी करून त्वरित अहवाल पाठविण्याचे पत्राद्वारे कळविले. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानंतर तत्कालीन तहसीलदारांवर फौजदारी कारवाईचे संकेत महसूल विभागाने दिले आहे.शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या तत्कालीन तहसीलदारावर महसूल प्रशासनाने फौजदारी कारवाई करावी, अन्यथा न्यायालयीन लढाईचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागणार आहे.- सुभाष देशमुख संघटनमंत्री, भारतीय किसान संघ