शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

हीच काय संस्कृती?

By admin | Updated: October 1, 2015 00:27 IST

समाजाचा आधार असलेले ज्येष्ठ नागरिक परावलंबी झाल्याचे चित्र आज आहे.

ज्येष्ठ श्रेष्ठच !व्यक्तीने वयाचे ६० वर्षे पूर्ण केले की, त्यांची गणना ‘ज्येष्ठ नागरिक’ म्हणून केली जाते. या ज्येष्ठ नागरिकांनी अनेक-उन्हाळे-पावसाळे पाहिले असल्याने नव्या पिढीसाठी ते मार्गदर्शकाची भूमिका वठवतात. अशा अनुभवसंपन्न ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ १ आॅक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर वृद्धांच्या एकूणच समस्यांचा घेतलेला हा धांडोळा !आईवडील : अडगळ नव्हे समृद्धीअमरावती : समाजाचा आधार असलेले ज्येष्ठ नागरिक परावलंबी झाल्याचे चित्र आज आहे. भौतिकतेच्या आहारी जाऊन अतिप्रतिष्ठा जपण्यासाठी घरातील वृद्ध व्यक्तींना वृद्धाश्रमात पाठविणारी एक पिढीच निर्माण झाली आहे. ज्या काळात शाळा - महाविद्यालयांची संख्या वाढायला हवी, त्या संगणक युगात आज वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे. अमरावतीसारख्या शहरातच आज तीनपेक्षा अधिक वृद्धाश्रमांतून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली जात आहे. घरातील वृद्ध सदस्याला वृद्धाश्रमात पाठविणे हीच का आमुची संस्कृती, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करावासा वाटतो. मुलगा, सून, नातू असे सर्वच नोकरी करणारे, कधी कुणाशी पटत नाही, तरी कधी वृद्धाला त्याला हवी असलेली ‘स्पेस’ मिळत नाही. कधी सुनेचा टोमणा वर्णी लागतो. कधी टोकाचे वाद होतात. वृद्धाश्रमासाठीचे मार्गक्रमण त्यातूनच सुरू होते. अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख ८८ हजारांच्या घरात असून २०११ च्या जणगणनेनुसार जिल्ह्यात ६० वर्षांवरील तीन लाख २१ हजार वृद्ध व्यक्ती आहेत. यातील बहुतांश जणांचे जीणे सुखावह असला तरी हजारो जणांना आज निराधार निराश्रित म्हणून जीवन जगावे लागते. तडजोड म्हणून हे वृद्ध व्यक्ती वृद्धाश्रमात समाधानी दिसत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या मनात एकंदरीतच कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्थेविषयी चीड निर्माण झाली आहे. गुरुवार १ आॅक्टोबरला होणाऱ्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्वूमीवर ‘दीन’वाने जीवन जगणाऱ्या वृद्धांचा हालहवाल जाणून घेतला असता भयावह परिस्थिती समोर आली. कमावती मुलं, मुली असताना घरदार असताना अनेक जण पेन्शनर असताना वृद्धाश्रमात लाचारीचे जीणे जगत आहेत. त्याची कारणमीमांसा होऊन आजच्या प्रगत पिढीने अंतर्मुखाने मंथन करणे गरजेचे आहे. वृद्धावस्था म्हणजे खरे तर वार्धक्यावस्थेतील सुवर्णकाळ. नातवांसोबत मस्त आयष्य जगण्याचे दिवस. कुठलेही बंधने नसलेले मुक्त जीवन जगण्याचा काळ. मात्र याच वृद्धावस्थेत अनेकांना वृद्धाश्रमाला सोबती करावे लागले. नजीकच्या वलगाव येथील संत गाडगेबाबा निर्वाणभूमित संत गाडगेबाबा मिशनद्वारे वृद्धाश्रम चालवला जातो. या वृद्धाश्रमात वय वर्षे ७० ते ९० वयोगटातील ३० लोक एकत्र राहतात. आणि दु:ख हे त्यांच्यातील समान धागा. या धाग्यानेच कौटुंबिक सदस्यांपासून दूर वार्धक्य अवस्थेतील शेवटचा काळ या ठिकाणी ते काढत आहेत.वलगाव येथील वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला असता उघड झाले. कमालीचे नैराश्य आणि परिस्थितीने दिलेले चटके सहन करीत हे वृद्ध आज म्हणायला समाधानी असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या अन् सुरकुत्यांमधून डोकावणाऱ्या वेदना अलगद बोलून जातात.कृष्णराव आणि लिलाताई भांगे या दाम्पत्यासारखे दु:ख अनेकांच्या वाट्याला आलेले. मात्र हे वृद्ध त्याबद्दल बोलणे टाळतात. आता हेच आपले संचित, असे सांगणारे जळगाव जिल्ह्यातील बोदवड गावातील किसन पंडित असोत की बहिरम गोविंदपूरचे भीमराव असोत. सर्वांच्या कथा वेगवेगळ्या, मात्र व्यथा एकच!