शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

एसआरपीएफ बँड पथकाच्या जयघोषात चौकाचौकांत नागरिकांचे आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना संसर्गाच्या काळात समाजाच्या सर्वच घटकांचे सहकार्य जिल्हा प्रशासनाला लाभत आहे. या जाणिवेेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्याच्या ...

अमरावती : कोरोना संसर्गाच्या काळात समाजाच्या सर्वच घटकांचे सहकार्य जिल्हा प्रशासनाला लाभत आहे. या जाणिवेेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह एसआरपीएफचे बँड पथक शहराच्या चौकाचौकांत देशभक्तीपर धून वाजवून आभार व्यक्त करीत करीत आहे व याचसोबत कोरोना संसर्गाविषयीची जनजागृती करीत आहे.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, एसडीओ उदयसिंह राजपूत, अमरावती तहसीलदार व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, मंडळ अधिकारी ढोक यांची यावेळी उपस्थिती होती. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने काढलेल्या आदेशाला अमरावतीकरांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. याबाबत अनेक नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व जिल्हा प्रशासनाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. या संकल्पनेला राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ अमरावती या विभागातील बँड पथकाने देशभक्तीपर धून वाजवून स्वागत आणि आभार व्यक्त केले. पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघमारे यांच्या मार्गदर्शनात राज्य राखीव पोलीस बल गट ९ अमरावती येथील बँड पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी जिल्हा शोध व बचाव पथकातील कर्मचाऱ्यांसह हेमंत सरकटे, अमित बुले, भूषण वैद्य, उदय मोरे, देवानंद भुजाडे, अर्जुन सुंदरडे, आकाश निमकर, बँड पथकातील कर्मचारी तसेच पोलीस निरीक्षक एम. बी. नेवारे, ए.के. खडसे, एम.सी. हिवराळे, ए.एस.जाधव, के.एस, घाटोळे, पी.एस. नवाळे, एम.आर.ठाकरेड, कौशल मोरघडे आदींचे सहकार्य लाभले.

बॉक्स

त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन

कोरोना काळात, मास्क वापरणे, फिजिकल डिस्टंसिंगचा वापर, सॅनिटायझरने हात वारंवार धुणे, पात्र नागरिकांनी कोरोनाची लस घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी नागरिकांमध्ये जागृतीदेखील करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची ही संकल्पना आहे. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी सांगितले.