शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
3
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
4
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
5
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
6
या कंपनीला AI वरील अहवाल देणे महागात पडले; ऑस्ट्रेलियाला द्यावा लागला भरमसाठ दंड
7
Shopping: शॉपिंग हा खर्च नाही, तर ही आहे तुमच्या भविष्याची खास गुंतवणूक; कशी ते पहा!
8
Test Rankings: आयसीसी टेस्ट क्रमवारीत बुमराहची बादशाहत कायम; मोहम्मद सिराजचेही मोठी झेप!
9
गुंतवणूकदार 'गार', टांगा पलटी घोडे फरार...! बाजारात येताच 40% आपटला शेअर, लोकांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
10
EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना?
11
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
12
Video - देवदूत! भूस्खलनानंतर रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टरने स्वत:चा जीव घातला धोक्यात
13
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
14
खान कुटुंबात आली परी! अरबाज खान लेकीला घेऊन निघाला; रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ व्हायरल
15
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
16
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
17
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
18
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
19
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
20
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली

-तरच बांधकाम परवानगी

By admin | Updated: November 9, 2016 00:11 IST

घनकचऱ्याच्या शास्त्रीय विल्हेवाटीसाठी महापालिका हद्दीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंधनकारक करण्यात आले असून ...

महापालिकेच्या सूचना : सांडपाण्याचा पुनर्वापर अनिवार्य अमरावती : घनकचऱ्याच्या शास्त्रीय विल्हेवाटीसाठी महापालिका हद्दीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंधनकारक करण्यात आले असून त्या अनुषंगाने मोठ्या इमारतींमध्ये ‘वेस्ट वॉटर रियूज’ प्रकल्प उभारणे देखील बंधनकारक करण्यात यावे, त्याशिवाय बांधकामाची परवानगीच देऊ नये, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी सहायक संचालक, नगररचना विभागाला दिले आहेत. ८ एप्रिल २०१६ रोजी जारी निर्देशांनुसार मोठ्या इमारती, ग्रुप हाऊसिंग, फ्लॅट्स, अपार्टमेंट, हॉटेल्स, मंगल कार्यालय, लॉन्स अशा इमारतींमधून बाहेर पडणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गिकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासनासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ त्यासाठी आग्रही आहे. त्यासाठी कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानाची अमलबजावणी करताना अतिरिक्त आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापनाला प्राधान्य दिले आहे. त्याअनुषंगाने मनपाक्षेत्रात ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत, द्रवखत किंवा बायोगॅस निर्मिती करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. सुक्या कचऱ्याचे पुनर्वर्गिकरण (रिड्यूस, रियूज, रिसायकल) करणे सुद्धा बंधनकारक आहे. मोठ्या इमारतींमध्ये किचन, बेसिन, बाथरूम, वॉशरूममधून निर्माण होणाऱ्या पाण्यावर ‘पुनर्प्रक्रिया प्रकल्प’ उभारणी करणे बंधनकारक करण्यात यावे, असे निर्देश ‘एडीटीपींना देण्यात आले आहेत. इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी भूगर्भामध्ये जिरविण्याकरिता किंवा ते पाणी पुन्हा शौचालयाच्या वापराकरिता स्वतंत्र पाईप लाईनची व्यवस्था करण्यात यावी, याव्यतिरिक्त अधिकच्या पाण्याचा बागेकरीता वापर करणे बंधनकारक करावे, बांधकाम परवानगी देताना यासर्व बाबी आनिवार्य कराव्यात, तसेच पूर्णत्वाचा दाखला व भोगवट प्रमाणपत्र देताना यासर्व बाबींच्या पूर्ततेची खात्री करावी आणि मगच इमारतीचा वापर करण्यास परवानगी द्यावी, असे सूचनावजा निर्देश एडीटीपींना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)मंगल कार्यालयाचे किचन जप्त वारंवार नोटीस आणि सूचना देऊनही बायागॅस प्रकल्प न उभारणाऱ्या मंगल कार्यालयांच्या किचनवर जप्ती आणली जाणार आहे. मंगल कार्यालये, लॉन आणि हॉटेल्समधील कचऱ्यांचे वर्गिकरण करुन त्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्या-त्या प्रतिष्ठानांची असल्याचे महापालिकेकडून निश्चित करण्यात आले होते. महापालिका क्षेत्रातील हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि लॉन्समधील कचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रतिष्ठानधारकांचे समुपदेशन करण्यात आले होते. मात्र, त्या आवाहनाला दाद न मिळाल्याने आता पहिल्या टप्प्यात मंगल कार्यालय आणि लॉनच्या किचनला सिल करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेचा आदर्श प्रयोग राबविणार पुणे महापालिकेद्वारे स्वच्छ भारत अभियानासंदर्भात जोरदार जनजागृती करण्यात आली. प्रत्येक घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जबाबदारी संबंधित घरमालकांवरच निश्चित केल्याने तेथे ठिकठिकाणी सांघिक स्वरूपाचे गटनिहाय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आले आहेत. ‘स्वच्छ’ अ‍ॅपचा वापर वाढला असून घरातील कचरा महापालिका उचलणार नाही, असे बजावल्याने तेथे सकारात्मक बदल घडून आला आहे. हा प्रयोग अमरावतीत राबविण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी पुणे येथे जावून घनकचरा व्यवस्थापचे धडे गिरविले.